Home Blog Page 3667

उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे – बाळा नांदगावकर

0

ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी प्रामाणिक इछ्या आहे .असे झाले तर मला आनंदच होईल उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हि माझी आणि कार्यकर्त्यांची हि भूमिका आहेच. दोघे भावू समंजस आहेत अशी प्रतिक्रिया म न से आमदार बाळा नांदगावकर यांनी दिल्याने आता खळबळ उडाली आहे
दोघे भावू संपर्कात आहेत पण राजकारणाबद्दल तेच आपसात निर्णय घेतील मी सुरुवातीपासून ठाकरे घराण्याशी प्रामाणिक आणि निष्ठेने राहिलो आहे आणि राहील अगदी कोणी मला मुख्यमंत्रीपद दिले तरी मी ठाकरे घराण्यालाच प्राधान्य देईल मी ते पद स्वीकारणार नाही उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे आहेत असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे

उद्धवराज महाराष्ट्रात येणार काय ? बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार काय ?

0

मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद केवळ ठाकरे बंधूंमध्ये असून हे बंधू एकत्र येवून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला तर तमाम मराठी माणूस एकत्र येवू शकतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू शकतो असा विश्वास सेना -मनसे च्या अनेक कार्यकर्त्यांना असून गेल्या १८ सप्टेंबरलाच अमित शहा यांनी मांडलेली वेगळी चूल लक्षात घेवून या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी आपापले विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला होता . उद्धव आणि राज यांनी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत आपापला योग्य सहभाग नोंदवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे अशी हि मागणी काहीजणांनी केली आहे , युती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यानंतर राज्यात लगेचच या नुसार नव्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार हवा राजकीय वर्तुळात पसरली आहे. योगायोग म्हणजे गेल्या आठवडाभरात आजारपणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन वेळा फोनवरून बोलणंही झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज आणि उद्धव यांची युती होणार की नाही याचं उत्तर येणारा काळचं देईल पण या दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू झाल्याची मात्र पक्की बातमी मिळाली आहे.उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची मुंबई वगळता राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मोजक्या लोकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर, मनसेने बहुतेक उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबवले आहे. राज यांनी काल सायंकाळीच 153 जागांवर उमेदवार जाहीर केले. मनसे आज किमान 50-60 जागांवर उमेदवार जाहीर करणार होते मात्र ही यादी थांबविण्यात आल्याचे कळते आहे.उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करीत आहेत. तसेच राज यांच्याशी वारंवार संपर्कात आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत या दोघांत काही चर्चा होऊ शकते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ 24 तास शिल्लक आहेत. दुसरीकडे, सेना-मनसेत निवडणूकपूर्व युती होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात ते एकमेंकांच्या उमेदवारांना सहकार्य करू शकतात. तसेच निवडणुकीनंतरही ते एकत्र येऊ शकतात. अशी हि शक्यता आहे

नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ”सिद्धांत”

0

r

सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न मराठीतील एक सिनेनिर्मिती संस्था करत असून त्यांच्या या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांची ही तेवढीच वाहवा मिळत आहे. आजवर शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृतीतून तयार करून केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर सामाजिक संदेश दिणारी सिनेनिर्मिती संस्था म्हणजे ‘नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल’.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा ‘सिद्धांत’ सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून ‘शाळा’ सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
‘सिद्धांत’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या ‘सिद्धांत’ सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयरमध्ये ‘टाइमपास’

0

q
रविवार या शब्दातच एका अर्थाने टाइमपास हा शब्द दडलेला असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रविवार म्हणजे हक्काची सुट्टी आणि टाइमपास करण्यासाठीचा हक्काचा दिवस. प्रत्येक रविवार हा तसा खासच असतो पण २८ सप्टेंबरचा रविवार हा जरा जास्तच स्पेशल असणार आहे कारण या दिवशी साजरा होणार आहे “वर्ल्ड टाइमपास डे” ज्यासाठी निमित्त असणार आहे यावर्षीचा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट “टाइमपास”. यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत यशाचे सर्व विक्रम मोडणारा आणि नवे विक्रम रचणारा “टाइमपास” हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रविवारी रात्री ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
“आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ”… “चला हवा येऊ द्या”… “नया है वह” सारखे तुफान धमाल संवाद, “मला वेड लागले प्रेमाचे”, “दाटले रेशमी धुके” सारखी रोमॅंटीक गाणी, दगडु-प्राजक्ताची इनोसंट लव्ह स्टोरी , प्राजुच्या वडील लेलेंचा त्याला विरोध, त्यातून येणारी जुदाई , प्रेमाची परिक्षा असा सगळा मसाला या चित्रपटात होता. टाइमपास म्हणून सुरू झालेल्या प्रेमात दगडू सिरीयस होतो आणि त्यातून मिळणा-या आनंदाची आणि दुखःचीही कथा म्हणजे टाइमपास हा चित्रपट. वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे फॅन बनले होते. चित्रपटाचे संवाद, गाणी सोशल नेटवर्क साइट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. यात दगडूची भूमिका प्रथमेश परबने तर प्राजक्ताची भूमिका केतकी माटेगावकरने साकारली होती. याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ सारखे सुपरहीट चित्रपट देणा-या रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.
झी मराठीवरून या चित्रपटाचा आता वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेंव्हा अनेकांनी चित्रपटगृहांत जाऊन तो बघितला होता. याशिवाय हा चित्रपट अनेकवेळा बघणा-या प्रेक्षकांची संख्याही खूप जास्त होती. ज्यांनी तेव्हा बघितला त्यांना अजून एकदा आनंद देण्यासाठी आणि ज्यांना त्यावेळी बघता नाही आला अशा प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. झी मराठीचे प्रेक्षक केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आहेत. अशा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी टाइमपासचा टीव्ही प्रिमीयर हा खास नजराणा ठरणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. टाइमपासचा हा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.

ॐ कारांनी दुमदुमली पुण्यनगरी

0

q
अथर्वशिर्ष व श्रीसुक्ताचे पवित्र शब्द १२३ शाळेतील १३,००० चिमुकल्यां च्या मुखी

· पुण्यातील सारसबागेसमोरील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रसच्या महालक्ष्मी मंदिरा तर्फे १२३ शाळेतील १३,००० विद्यार्थ्यांसाठी अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , शोभा धारिवाल, खासदार अनिल शिरोळे , प्रताप परदेशी,उपस्थित होते.
यावेळी खासदार अनिल शिरोळे म्हणाले “मला अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाच्या मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित राहता आले त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठण याचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे आणि याच्या पठणामुळे विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडण्यास मदत होते.”
१३,००० विद्यार्थ्यांनी केलेल्या पवित्र स्तोत्र पठणांनी पुण्यनगरी अधिकच पावन झाली व भक्ती रसात न्हाऊन निघाली.उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन प्रार्थनेतून भक्ती देवीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने हा धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आला होता. उद्याचे भवितव्य असणार्‍या या विद्यार्थांना धार्मिक कार्यक्रमात तल्लीन झालेले पाहून उपस्थितांनाही अभिमान वाटला.
श्री गणेश व महालक्ष्मी हे बुद्धी व वैभवाचे दैवत आहेत. असीम बुद्धीमत्ता व वैभव हवे असणार्‍यानी यांची आराधना करणे अनिवार्य आहे. आज मुलांनी केलेली आराधना भविष्यात नक्कीच त्यांना काहीतरी गोड फळ देईल हे निश्चित. असेही ते म्हणाले

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

0

शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. शिवसेनेने माजी महापौर सुनील प्रभु यांच्यासह विद्यमान चार आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.

शिवसेनेचे उमेदवार-
शिवडी – अजय चौधरी
माहिम – सदा सरवणकर
अंधेरी (पूर्व) – रमेश लटके
अंधेरी (पश्चिम) – जयवंत परब
वरळी – सुनील शिंदे
दिंडोशी – सुनिल प्रभु
कांदिवली पूर्व – अमोल कीर्तिकर
गोरेगाव – सुभाष देसाई
वांद्रे पूर्व – बाळा सावंत
जोगेश्वरी – रवींद्र वायकर
दहिसर – विनोद घोसाळकर
धारावी – बाबुराव माने
विलेपार्ले – शशिकांत पाटकर
कल्याण (प.) – विजय साळवी

‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…राज ठाकरे

0

raj-thakare_00080119
महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला हवी, बिल्डरांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसआरए योजना सरकारनेच राबवली पाहिजे, गुन्हेगारी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व वाहनांना डिजिटल नंबरप्लेट लावल्या पाहिजेत, मराठी संस्कृतीची १०० मंदिरे उभारली पाहिजेत, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ, तरुणांना रोजगार मिळावे यासाठी रोजगार कार्ड आदी असलेली म न से ची ब्ल्यू प्रिंट राज ठाकरे यांनी सादर केली महाराष्ट्र स्वायत्त करण्याचा, महिलांच्या नावावर घरांची नोंदणी केल्यास करात माफी देण्याचा अशा अनेक विषयांचा समावेश या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…हो, हे शक्य आहे’, अशी ‘कॅचलाइन’ घेऊन मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून सुमारे दोन ते अडीच तास या ब्ल्यू प्रिंटचे षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरे यांनी सादरीकरण केले. गेली नऊ वर्षे यासंदर्भात अभ्यास सुरू होता, या आराखड्याची वेबसाइट तयार करण्यात आली असून सुमारे तीन ते साडेतीन लाख शब्दांचा मजूकर त्यावर आहे, अशी माहिती राज यांनी यावेळी दिली.

सायकल रैली वर प्रचार करीत निम्हण यांचा अर्ज दाखल

0

nimhan

घटस्थापनेच्या दिवशीच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा व लेक वाचवा चा संदेश देत आ. विनायक निम्हण यांनी पूर्ण मतदार संघात सायकलवऱ फिरून उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांकडे २१ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असून पन्नासहून अधिक ठिकाणी निम्हण यांच्याकडे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. उमेदवारी अर्ज भरताना निम्हण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे
आमदार निम्हण यांच्या नावावर सोळा कोटी रुपयांची मालमत्ता असून यामध्ये २ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर, निम्हण यांच्या पत्नी स्वाती यांच्याकडे ५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. निम्हण कुटुंबीयांकडे ७१ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या चांदीच्या वस्तू, दागदागिने आहेत. यामध्ये हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. शहर आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी निम्हण कुटुंबीयांकडे १०० हेक्टरहून अधिक जमीन असल्याचे निम्हण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
१६ मोटारी –
आमदार विनायक निम्हण यांच्याकडे सोळा चारचाकी गाड्या असून यासर्वांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. निम्हण यांच्याकडे ७ हायवा, दोन आयशर, आय १०, टोरँग, डस्टर, होंडा ब्रायो, यासह टाटा टेम्पो आणि एक मर्शिडीज बेंन्स यांचा समावेश आहे. इतक्या गाड्या असतानाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र निम्हण यांनी सायकल रॅली काढून अर्ज भरणे पसंत केले.

श्री जगद्गुरू शंकराचार्य- विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना आणि सरकारी वकीलउज्ज्वल निकम यांच्या हस्ते पूजा संपन्न

0

ujjwal
nikamsir

दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला विविध रंगांची उधळण, दिव्यांची सजावट, प्रवचन या सर्व गोष्टींनी युक्त अशा मंगलमय वातावरणाने सारसबागेजवळील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टचे महालक्ष्मी मंदिर उजळुन निघाले. हजारोंच्या संख्येने भक्त देवीची, सरस्वतीची,महालक्ष्मीची, कालीची पुजा मनोभावाने, प्रेमाने करण्यासाठी एकत्रित आले होते. पार्वतीची पुजा या उत्सवाचा महत्वाचा भाग मानतात, तसेच माता शैलापुरी उजव्या हातात त्रिशुळ धारण आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैलावर विराजमान असते या देवीची पुजा करणे आणि हा उत्सव साजरा करणे हा प्रत्येक भक्ताला खुप मोठा आनंदाचा क्षण होता .
श्री. जगद्गुरू शंकराचार्य- श्री. विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थित घटस्थापनेचा विधी करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि काली यांना खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी करावयास मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि धार्मिक मंदिराची स्थापना केल्याबद्दल मी विश्वकर्मा कुटुंबाचा आभारी आहे.’
संध्याकाळची आरती सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.श्री. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘या भक्तीपूर्ण उत्सवात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. यादेवळात तीन आदिशक्तींचा वास असून त्या तुम्हाला शांती आणि समृद्धी देतील.’
मंदिराच्या सर्व कर्मचारयानी अविरत घेतलेल्या कष्टामुळे मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण होते. तसेच मंदिरात येणारया सर्व भक्तांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या मंदिराच्या सर्व कर्मचारयानी रात्रंदिवस मेहनत घेतली. या मंदिरात सर्व पंथाचे, जाती धर्माचे, भक्त एकत्रित आले त्यामुळे या मंदिरात विविधतेत एकता दिसली.

२५ वर्षांच्या अहंकारी नेतृत्वाचा अस्त होणार – आढळराव पाटील

0

q
आंबेगाव-शिरुर मतदार संघामध्ये इतिहास घडणार आहे.पंचवीस वर्षांचे अहंकारी व हुकुमशाही नेतृत्वाचा अस्त आता होणार असून अरुण गिरेंच्या रूपाने अरूणोदय होत या मतदार संघावर भगवा फडकणार आहे असा ठाम विश्‍वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मलठण (ता. शिरुर)येथे व्यक्त केला. शिवसेनेने ३९ गावातील तरुणांचा मेळावा आयोजीत केला होता.
या भागातील विकासाठी रावडेवडी येथे साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव रद्द करायला लावला. लोकप्रतिनिधी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. डिंभा धरणाचे काम लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या कारकिर्दीत झाले. डिंभा धरण स्वत: बांधल्याच्या अविर्भावात सांगतात. या वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे प्रचाराला माणसे नाही. त्यांचा प्रचार भीमाशंकरचे संचालक त्यातले ही काही आपलाच प्रचार करत आहे.
शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे म्हणाले की, लोकांना फार काळ फसवता येत नाही. त्यामुळे आता मतदार संघात बदलाचे वारे वाहत आहे. दुष्काळी भागातील जनतेला झुलवत ठेवले म्हणजे चार-पाच निवडणुका पाणी देतो, म्हणून सांगत जिंकता येतात ही त्यांची वृत्ती आहे.
सह-संपर्कप्रमुख अविनाश रहाणे, प्रा. राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांनी आपले विचार मांडले. या वेळी उपजिल्हा प्रमुख संजय सातव पाटील, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, युवासेनेचे गणेश जामदार, बाळासाहेब वाघ, विक्रम पाचुंदकर, गुलाबराव धुमाळ, बबनराव पोकळे, किरण देशमुख, सोपानराव जाधव, राज गायकवाड, माउली घोडे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.

वळसे पाटील यांचा झंजावती प्रचार सुरु

0

घटस्थापनेच्या मुहूर्तावर वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आज सहाव्यांदा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी तुतारीची ललकारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा, जोश भरणारी गाणी, टाळ्यांचा कडकडाट सर्वत्र फडकणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज आणि ओसंडून वाहणारी गर्दी अशा उत्सवी वातावरणात वळसे पाटील यांच्या यांच्या प्रचाराचा जोरदार आरंभ झाला
शिरूरचे आ. अशोक पवार, आ. जयदेव गायकवाड, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन भोर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व पराग मिल्क फुड्सचे चेअरमन देवेंद्रशेठ शहा, खेडचे माजी आ. अँड़ रामभाऊ कांडगे, शिरूरचे माजी आ. पोपटराव गावडे, आंबेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गुजर, सूर्यकांत थोरात, गंगूताई वाघ, विष्णूकाका हिंगे, बाळासाहेब घुले, प्रमोद वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, शंकरराव ढोबळे, पुंडलिकदादा थोरात, सुदाम खिलारे तसेच वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे हे उपस्थित होते. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले तेवढेच आंबेगाव तालुक्यातील सर्वच समाजाच्या लोकांनी दिले. उत्तर पुणे जिल्ह्यात झालेली सर्व विकासकामे तुमच्या समोर आहेत. त्या जोरावर मी आणखी एक संधी मागत असल्याचे आवाहन वळसे पाटील यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, वळसे पाटील यांनी निरगुडसर, अवसरी खुर्द व अवसरी बुद्रुक या भागांचा दौरा केला व भैरवनाथ मंदिरात नारळ फोडला . वळसे पाटील म्हणाले, आजपर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. मात्र, त्या प्रत्येकवेळी मी केवळ विकासावर भर दिला. छोट्यातील छोट्या माणसाला मोठे करण्याची ताकद शरद पवार यांच्या विचारात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मी स्वत:, अजित पवार व सुनील तटकरे या मंत्र्यांनी काम केल्यामुळे आज राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. खुद्द भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय वीजमंत्री पियूष गोयल यांनी या कामाचे कौतुक करून अन्य राज्यांना या कामापासून धडा घेण्याचे आवाहन केले आहे.walse patil

राष्ट्रवादी ने हि सोडली काँग्रेस ची साथ

0

शिवसेना-भाजपची 25 वर्षे जुनी युती संपुष्टात आल्यानंतर अर्ध्या तासामध्येच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे जुनी आघाडीही तुटली. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ला पटेल यांनीच पत्रकार माहिती दिली यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील चारही प्रमुख पक्ष आणि म न से नेही १५३ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने हे पाचही पक्ष स्वबळावर विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, “गेली १५ वर्षे राज्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री यांनी कॉंग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. २००४मध्ये कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. तरीही राष्ट्रवादीने सौम्य भूमिका स्वीकारली. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दीड-दोन महिन्यांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाली. त्यावेळी आघाडी करू इच्छितो आणि जागावाटपाची चर्चा लवकर झाली पाहिजे, असे सांगितले. सोनिया गांधी यांनी त्यास अनुकुलता दर्शविली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची भूमिका मांडली. २००९ मध्ये लोकसभेचे खासदार जास्त असल्याने विधानसभामध्ये कमी जागा देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. २००४मधील फॉर्म्युला कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसपेक्षा दुप्पट जागा निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादीचेच सर्वाधिक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले आहेत. ही ताकद लक्षात घेऊन निम्म्या जागा देण्याची मागणी केली होती. हे जागावाटप लवकरात लवकर झाले पाहिजे, अशी मागणी आम्ही करत होतो. कधी ना कधी हा पेच सुटेल, अशी आशा होती.. १५ वर्षे सातत्याने तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला. पण दिल्लीवरून किंवा राज्यातूनही चर्चा झाली नाही.

मॉडेल मृण्मयीचे ‘मिस मॅच’ सिनेमातून अभिनयात पदार्पण!!

0

सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. सिनेमाची कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय याच्या जोरावर मराठी सिनेमाला छान दिवस आले आहेत. दिग्दर्शकही सिनेमाच्या मुख्य पात्रासाठी जुन्या चेहऱ्यांपेक्षा नवीन चेहऱ्यांना पसंती देत असल्याचे चित्र सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये पहायला मिळत आहे.
‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमात ‘मृण्मयी कोलवालकर’ हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता भूषण प्रधान आणि मृण्मयी कोळवलकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.
‘मिस मॅच’ या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेज वर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट त्याच्या असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
सिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून मानस यांचे संगीत लाभले आहे. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या गायकांनी या सिनेमातील गाणी गायली असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘मिस मॅच’ सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.

पुणे नवरात्रो महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

0

abba

aaba
उपमहापौर आबा बागुल यांच्या ‘ पुणे नवरात्रो महोत्सवाचे आज शानदार उद्घाटन झाले . या वेळी महापौर दत्ता धनकवडे , माजी खासदार सुरेश कलमाडी , सचिन पिळगावकर , दिपाली सय्यद तसेच नंदकुमार बानगुडे घनश्याम सावंत आदी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले
मातृभक्ती ही माझ्या स्वभावातच असून, गेले ५८ वर्षे मी आईची पूजा करत आहे. आई हेच खरे ‘देवीचे’ स्वरूप असून, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच मी मजल मारू शकलो, अशी भावना सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी व्यक्त केली.
. नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात सिनेअभिनेते अनंत जोग, दै.पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन बोरा, प्रकाश मुलाबागल,दीपाली सय्यद, मोतीलाल निनारीया यांना लक्ष्मीमाता कला संस्कृ ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
पिळगांवकर म्हणाले की, माझी आई ही माझ्यासाठी आदर्श मैत्रीण, मार्गदर्शिका तसेच सर्वकाही आहे. पुण्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी तब्बल ५0 हजार जणांना काशी यात्रेला नेवून मातृप्रेमाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सध्याच्या काळात अशा प्रकारचे राजकीय पुढारी अभावानेच आढळतात. पुण्याचे प्रेक्षक हे रसिक प्रेक्षक असून, त्यांच्याकडून दिलेली दाद ही मनाला चांगलीच सुखावून जाते. यामुळेच पुण्यात बागूल यांच्या कार्याला मिळालेला उदंड प्रतिसाद ही त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने करण्यात आली. रत्नाकर शेळके यांच्या डान्स अँकॅडमीने सादर केलेल्या ‘भारतीय पारंपरिक नृत्य’ लावणी नृत्य, पाश्‍चिमात्य नृत्यांचा सुंदर मेळ घालत सादर केलेल्या ‘फ्युजनला’ प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. नवरात्रीच्या संध्येला ‘लेझर शो’ ने व्यासपीठावर चांगलीच रंगत आणली होती. तसेच ‘देवीच्या गोंधळाने’ प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली.

घटस्थापनेच्या दिवशीच शिवसेनेशी असलेला 25 वर्षांपासूनचा घरोबा भाजपने तोडला

0

मुंबई- शिवसेना- भाजपचा 25 वर्षांपासूनचा घरोबा -मैत्री जी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी कायम जतन केली होती ती अमित शहा यांच्या भाजप अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घटस्थापनेच्या दिवशीच आज गुरुवारी सायंकाळी अखेर तुटली. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत ज्येष्‍ठ नेते प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे यांनी सेना आणि भाजपची 1989 मध्ये युती केली होती. अखेर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपने घटस्फोट घेतला.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला आणि ठाकरे यांना हिरवा कंदील दाखवायचाच नाही यावरून हि ताणाताणी अखेर तुटली .
शिवसेना – भाजपची युती संपुष्टात आल्याची माहीती भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. खडसे म्हणाले, भाजपला मुख्यमंत्रीपद हवे, असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आम्ही ११९ जागा पहिल्यापासून लढवत होतोच, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आता काय करायचे असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.असे ते म्हणाले
दरम्यान युती तोडण्याचा निर्णय मुंबईतून नव्हे तर आतापर्यंत स्पष्ट झाले आहे . अमित सहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा प्रत्येक भाषणात ‘ महाराष्ट्रात सरकार भाजपचे येईल असे सेना – ठाकरे आणि महायुतीचा उल्लेख जाणूनबुजून टाळला, तेव्हाच हि युती तुटल्याच चित्र निर्माण झाले होते . पण काही महाराष्ट्रातील दिल्लीत बसलेल्या नेत्यांनी युती तोडणे चांगले नाही असा सल्ला दिल्लीश्वरांना दिला आणि चर्चा होत राहिली अखेर घटस्थापनेच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा झाली