पुणे ः राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाने दीपावलीनिमित्त कैलास स्मशानभूमीत केलेल्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला. ढोले-पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्मशानभूमीत व स्वच्छता विभागात काम करणार्या ३० कर्मचार्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नगरसेविका लता राजगुरु, महापालिकेचे सह-आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त संजय गावडे, आरोग्य निरीक्षिका नीलिमा काकडे, विभागीय आरोग्य निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदार रांजेकर, सागर राऊत, गणेश माने, मंगेश तडके, मिलिंद येद्रे, विजय बढे, अक्षय माने यांनी संयोजन केले.
फार्मा क्रिकेट चेम्पियन राज्य स्तरीय स्पर्धेत अल्लाना कॉलेज विजयी
आयुष काटे ‘कला की खोज ‘ नृत्य गायन स्पर्धेत वरिष्ठ गटात विजयी
माझ्यातील संगीतकारावर गीतरामायणाचे संस्कार – प्रभाकर जोग -गदिमांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्नशील रहाणार – उपमहापौर आबा बागूल
पुणे – गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आणि बाबुजींनी स्वरसाज चढवलेले गीतरामायण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या गीतरामायणात पहिल्यापासून माझा सहभाग होता. सुरूवातीला गीतरामायणात बाबुजींचा सहाय्यक आणि नंतर कार्यक्रमातील साथीदार म्हणून गीतरामायणाला मी त्याला चिकटूनच बसलो होतो. त्यामुळेच माझ्यातील संगीतकारावर गदिमा आणि बाबुजींच्या गीतरामायणाचे संस्कार आहेत अशी दिलखुलास प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी येथे केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
गीतरामायणाच्या हिरक महोत्सवीवर्षानिमित्त यंदाचा मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचा स्वरप्रतिभाचा दिवाळी अंक गीतरामायणावर काढण्यात आलेला आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ट गायक श्रीधऱ फडके, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते झाले. लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून जोग बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आबा बागूल उपस्थित होते. यावेळी प्रभाकर जोग, श्रीधर फडके आणि श्रीधर माडगूळकर यांचा स्वरप्रतिभा दिवाळी अंकातर्फे पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे, सहसंपादक राजा महाजन आणि अमृता संभूस उपस्थित होते.
प्रभाकर जोग म्हणाले, गीतरामायणाच्या प्रतिभेला तोड नाही. गदिमांनी साध्या सरळ शब्दात मांडलेले भावविश्व आणि तितक्याच सुरेल पद्धतीने बाबुजींनी त्याला दिलेली चाल यामुळे गीतरामायणाची गोडी अधिकच वाढली अन रसिकांच्या जिभेवरून मनात उतरली. आकाशवाणीवर गीतरामायणाच्या सुरूवातीपासून मी बाबूजींचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर सुमारे गीतरामायणाच्या ५०० कार्यक्रमांमध्ये बाबूजींना मी व्हायोलिनची साथ केलेली आहे. यावेळी त्यांनी चला राघवा बघाया जनकाची मिथिला….या गाण्याच्या वेळी घडलेल्या प्रसंगाला उजाळा दिला. ज्येष्ट तुझा पुत्र मला देई दशरथा…या गाण्याच्या निमित्ताने आपल्यातील संगीतकाराला कशी संधी बाबुजींनी दिली हे उलगडून सांगितले. या सगळ्याचा आपल्या संगीतजीवनावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
संगीतकार श्रीधर फडके म्हणाले, ३१ मार्च १९५५ या दिवशी गीतरामायणाचा प्रारंभ झाला. याच निमित्ताने गदिमा आणि बाबुजी एकत्र आले. त्यावेळी गाण्याची हस्तलिखिते आणण्यावरून थोडा वाद झाला होता. आणि असे वाद पुढेही होत राहिले पण त्यात गीतरामायणाबद्दलचे प्रेमच होते. पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होते त्या दिवशी मला ताप आल्याने नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबूजी गाण रेकॉर्ड करून रात्री अडीचवाजता मला बघायला रूग्णालयात आले होते. गदिमा आणि बाबुजींकडे मोठी प्रतिभा होते. त्यामुळे जेवढे सोपे शब्द गदिमांनी लिहिले त्याला पूर्णत: महत्व देत बाबुजींनी चाली बांधल्या. गीतरामायणातील सर्वच्यासर्व म्हणजे ५६ गाणी ही वेगवेगळ्या रागांवर आधारित आहे. एकही राग पुन्हा वापरलेला नाही.
स्व. यशवंतराव चव्हाण हे नेहमी भेटले की सांगायचे त्यांच्यावर जेव्हा दडपण येत असे किंवा एकटेपणा जाणवत असे किंवा मानसिक ताण येई तेव्हा ते “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” हे गाणं कायम ऐकायचे आणि गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होत असे, अशी आठवणही फडके यांनी सांगितली. दुसरी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण सांगताना ते म्हणाले, सावरकरांच्या समोर शिवाजी मंदीरात गीतरामायणाचा कार्यक्रम नलावडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने झाला. त्यावेळी पराधीन आहे जगती या गाण्याचे सातवे कडवे झाल्यावर समोर बसलेल्या सारवकरांच्या डोळ्यात पाणी आलेले बाबूजींनी बघितले आणि काय झाले अशी विचारणा केली. त्यावर सावरकरांनी सांगितले की कुणाचे मी कौतुक करू तुझे की गदिमांचे ! याच गाण्याला बाबूजींनी चाल लावली त्यावेळी ते भारत गायन समाजात रहात होते. चाल लावून ते रिक्षाने निघाले आणि त्यांनी रिक्षेत नविन चाल सुचली. नवी चाल शोधण्याचे कारण त्यांनी असे दिले की गदिमांनी जीवनाचे जे वर्णन केले आहे त्याल सुयोग्य अशीच स्वररचना झाली पाहीजे आणि अवघ्या पंधरा मिनिटात त्यांनी गाण्याला नवी चाल बांधली असे श्रीधर फडके यांनी सांगितले.
श्रीधर माडगूळकर यांनी गदिमा हे घरच्या परिस्थितीमुळे धारवाडहून पुण्याला आले आणि उपाशी पोटीच हिंडत होते. मोरोपंतांचे वंशज असलेले पंत पराडकर यांनी त्यांना मंडई परिसरात बघितले आणि त्यांच्या रहाण्याची जेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आकाशवाणी केंद्राचे संचालक सीताराम लाड यांनी रसिकांना काही तरी वेगळे वर्षभर चालेल असा कार्यक्रम देण्याचे ठरविले आणि त्यासाठी गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणाची निवड केली. या गीतांना चाली बाबूजीच बांधणार असेही त्यांनी त्याचवेळी जाहीर केले आणि गदिमा – बाबूजी एकत्र आले. पुढे टिळकवाड्यात दत्तो वामन पोतदार यांनी गदिमांचा अधुनिक वाल्मिकी असा गौरव केला. गदिमांचे पुण्यात स्मारक व्हावे आणि त्यात गीतरामायणाचे खास दालन असावे अशी मागणी स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी केली त्याचा संदर्भ देऊन या मागणीचा पाठपुरावा व्हावा असे त्यांनी सांगितले.
उपमहापौर आबा बागूल यांनी गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन आपल्याच उपमहापौर पदाच्या कारकिर्दीत होईल आणि स्मारक नक्की उभे राहील अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की इतक्या वर्षात पुण्यात हे स्मारक का नाही झाले याची मला खंत आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून माझ्या उपमहापौरपदाच्या कारकिर्दीतच या प्रकल्पाचे भूमीपूजन व्हावे यासाठी मी कटिबद्ध राहीन. सध्या वाचणारे बघणारे झाले आहेत त्यामुळे वाचणारे कमी झाले आहेत. मात्र असे दिवळी अंक विकत घेऊनच वाचा असे आवाहन त्यांनी केले.
गीतरामायणाचे ऍप तयार करणा-या सुमित्र माडगूळकर या गदिमांच्या नातवाचा खास सत्कार करण्यात आला.
अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या अंकाच्या निर्मितीवेळी सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्रींमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी सुमारे शंभऱ वर्षांपूर्वी सन १९११ मध्ये चितारलेल्या चित्र रामायणातील निवडक पेंटिग्ज स्वरप्रतिभाच्या या दिवाळी अंकांत वापरण्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहायल विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. तसेच पुण्यात गदिमांचे स्मारक व्हायलाच पाहिजे त्यासाठी पुढाकार किमान या ६० व्या वर्षी तरी घेतला जावा असे आवाहन केले. अंकाच्या सहसंपादिका अमृता संभूस यांनी अंकाविषयी महिती दिली. या अंकातील पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला लेख म्हणजे गीतरामायणाची उत्तम समीक्षा आहे. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमातील भाषणाचाही समावेश अंकात आहे. गदिमांची गीतरामायणाची हस्तलिखितेही आहेत. कार्यक्रमाची सुरूवात प्रख्यात गायिका पदमजा लामरूड यांनी म्हटलेल्या ईशस्ववनाने आणि सादर केलेल्या राम जन्मला ग सखी राम जन्मला या गाण्याने झाली. आभार मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे सरचिटणीस व स्वरप्रतिभा अंकाचे संदीप वाळींबे यांनी मानले. या प्रसंगी पुणे फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, माजी आमदार मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, प्रकाश पायगुडे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे आदींसह संस्कृतिक साहित्य व समाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्वोत्कर्ष ट्रस्ट आणि संस्कार ग्रुप आयोजीत स्वरमयी दिवाळी पहाट
सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या १२ नोव्हेंबर गुरुवारी पहाटे ५ वाजता शनिवार वाडा पटांगण येथे दीपावली पाडवा पहाट निमित्ताने स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वोत्कर्ष ट्रस्टचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा उपक्रम गेली चार वर्षे नियमितपणे राबवत असून रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या वर्षी हि स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दीपोत्सव २०१५’ या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात रामेश्वरी वैशमपायन, मीनल पोंक्षे, राधा मंगेशकर आणि राजेश दातार यांचे गायन, सिद्धी कोळवणकर यांच्या तर्फे समूह नृत्याचे सादरीकरण तसेच दिपाली कदम यांच्या समूह नृत्याचे सादरीकरण, दगडू शेठ हलवाई ट्रस्टच्या अनाथ मुलांच्या धनगरी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
त्याच बरोबर सुशीलकुमार यांच्या हास्य विनोदाचे सादरीकरण आणि विजय जोशी यांचा लोकमान्य टिळक यांच्या वेशातील अभिनय असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून नाट्य व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम विनामुल्य असून काही जागा निमंत्रीत मान्यवरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्वोत्कर्ष ट्रस्ट हा गेली ५ वर्षे सांस्कृतिक, सामाजीक आणि अध्यात्मिक क उपक्रम राबवत आहे. सांस्कृतिक उपक्रमा अंतर्गत सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या हि पुढे असे अनेक उपक्रम राबवण्याचा ट्रस्टचा मानस असून रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सर्वोत्कर्ष ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. ट्रस्टच्या आध्यत्मिक उपक्रमा अंतर्गत संस्कार ग्रुपच्या वतीने कार्यक्रम स्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेश दातार व संस्कार ग्रुपचे वैकुंठ कुंभार यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कचरा हटविण्यासाठी आंदोलन
महिलांना अधिकाधिक सक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक : खासदार अॅड.वंदना चव्हाण
‘सर्व प्रकारच्या मुलांना मिसळू दिले तर ते भेदभाव करणार नाहीत’ – विलास वाघ
सलाम पुणे च्या व्यासपीठावर गाजला ‘पारू ‘ चा वाढदिवस
पप्पी दे पारू ला या गाण्यात नाचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकरने सलाम पुणे च्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थिती लावली आणि तिला आश्चर्याचा धक्का च बसला ती चा वाढदिवस सलाम पुणे च्या व्यासपीठावर केक कापून साजरा झाला -५ नोव्हे.२०१५ यावेळी … यलो सिनेमाची नायिका गौरी गाडगीळ अभिनेते मनोज जोशी , निलेश साबळे , देवेंद्र भगत,मयूर लोणकर संगीतकार हर्षित अभिराज , मोहनकुमार भंडारी , ऐश्वर्या भंडारी , सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर . उपाध्यक्ष अभिनेत्री राधा कुलकर्णी , पूजा पुरंदरे , दिग्दर्शक शिव कदम दीपक सवाखंडे तसेच सलाम पुणेचे कार्याध्यक्ष -सूत्रसंचालक संतोष चोरडिया, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर , प्रीती व्हिक्टर निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलखा आदींनी तिला यावेळी शुभेछ्या दिल्या ….
जात,पात ,धर्म, गाव पाहून कलावंताची किंमत करू नका -प्रा. वसंतराव पुरके ;बहारदार कार्यक्रमाने रंगभूमीदिनी रंगला ‘सलाम पुणे’ चा पुरस्कार सोहळा
जात,पात धर्म . गाव पाहून कलावंताची किंमत करू नका ,त्याने कलेची केलेली साधना, तपश्चर्या पहा ,घेतलेली मेहनत पहा… असे आवाहन केले आणि सर्व सलाम पुणे पुरस्कारार्थी कलावंतांचे कौतूक केले
-पं . नंदकिशोर कपोते यांचे कथ्थक सादरीकरण ,नवीन प्रभाकर यांची दिलखुलास मिमिक्री , ज्येष्ठ ऑर्केस्ट्रा संयोजक मोहनकुमार भंडारी यांनी फरमाईश वर सादर केलेली गाणी , संगीतकार हर्षित अभिराज यांचे सादरीकरण , अभिनेत्री स्मिता गोंदकर हिची अदाकारी ,सतार वादन आणि तबला यांची जुगलबंदी , चांगलाच रंगतदार ठरला
मराठी आणि हिंदी सिनेनाट्य सृष्टीतील नामवंत कलाकार , निर्माते , दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके आणि पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले . अभिनेता मनोज जोशी दिग्दर्शित चाणक्य आणि अभिजित साटम निर्मित प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित सुसाट या २ नाटकांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कपोते , भंडारी , नवीन प्रभाकर आणि ‘चल हवा येवू द्या ‘ चा दिग्दर्शक अभिनेता निलेश साबळे यांना हि ‘सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर पुण्यातील उत्कृष्ट महिला शिल्पकार म्हणून सुप्रिया शिंदे यांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
पुणे युथ आयडॉल पुरस्काराने यावेळी अजित बाबर यांना तर शासकीय स्तरावरील विशेष सेवा पुरस्कार मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे आणि सामाजिक कार्याबद्दल सागर भागवत यांना सन्मानित करण्यात आले . सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर ,उपाध्यक्षा अभिनेत्री राधा कुलकर्णी ,म न से चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर, उपाध्यक्ष प्रीती व्हीक्टर ,निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलाखा , योगेश वणवे , , दिग्दर्शक शिव कदम , अभिनेता मयुर लोणकर , देवेंद्र भगत , योगेश तनपुरे , वैभव पगारे , दिनेश नेरुने ,दक्षिणेकडील ख्यातनाम अभिनेत्री डिम्पल चोपडे . यलो ची नायिका गौरी गाडगीळ , पूजा पुरंदरे,भाग्यश्री पेंध्ये ,सोनिया बर्वे आदी कलावंत उपस्थित होते . अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा वाढदिवस यावेळी केक कापून साजरा करण्यात आला
यावेळी बोलताना श्री पुरके म्हणाले ,जिवन आनंददायी बनविण्यात कलाक्षेत्राचे मोठे योगदान आहे . १० वर्षे मी नाटकात काम केले आहे मधुसूदन कानेटकरांच्या नाटकात स्त्रीची भूमिका केली , गाणी म्हणण्याचा हि शौक आहे , ताणतणावाच्या जीवनात आनंदाचे क्षण भरण्याचे काम कलावंत करतात रंगभूमी , सिनेमा आणि टी व्ही आणि संगीत क्षेत्रातील मंडळी त्यासाठी आपले कसब पणाला लावतात ,आयुष्य वेचतात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे अशा कलाकारांच्या पाठीवर थाप देवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे काम करणाऱ्या ‘सलाम पुणे’ ला माझा सलाम …. हि वैभवशाली परंपरा अशीच पुढे न्यावीअसे आवाहन माजी शिक्षणमंत्री प्रा . वसंतराव पुरके यांनी येथे केले. वादक भाग्यश्री पेंध्ये ,अभिनेता नवीन प्रभाकर , अभिनेत्री राधा सागर नर्तक विद्यासागर , साहिल मरगजे,संगीतकार हर्षित अभिराज आदींनी यावेळी आपली कला सदर केली . सलाम पुणे चे कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले
प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत शिशु कर्ज योजनेचे वाटप
पुणे कॅम्प भागातील नेपियर रोडवरील प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिलानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत शिशु कर्ज योजनेचे वाटप करण्यात आले . विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे मुख्य व्यवस्थापक सतीश पाटकर यांच्याहस्ते हे कर्ज वाटप करण्यात आले . यावेळी विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे सहायक व्यवस्थापक देवेश्वरी बिस्ट व नेहा वानखेडे यांनी विशेष सहकार्य केले . यावेळी प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षां रंजना सोनावणे यांच्याहस्ते बँकेच्या अधिकारीचा शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी आशा राठोड , शीतल सोनावणे , प्रमिला जकेरिया , मंगल कांबळे , वैशाली भिसे , अंबिका पोनय्या , लक्ष्मी चौघुले आदि महिला बचतगटाच्या महिला व मनोहर चव्हाण , विकास हिवाळे , संतोष सोनावणे , राहुल जगताप , महेंद्र गायकवाड , दीपक काळे उपस्थित होते .
यावेळी विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे मुख्य व्यवस्थापक सतीश पाटकर यांनी सांगितले कि , प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत सर्व कर्ज योजनेला प्रतिसाद चांगला मिळत आहे , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून बँकेच्यामार्फत कर्ज वाटप करण्यात येत आहे , यामध्ये शिशु , किशोर , तरुण अशा तीन प्रकारची कर्ज योजना आहे
संमेलनाच्या संकेतस्थळासह मोबईल ऍपद्वारे तरुणांशी संवाद वाढवावा सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा
पुणे, ५ नोव्हेंबर: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथे होणार्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानेही मराठी भाषेच्या प्रसारासाठी तांत्रिक दृष्ट्या दोन पावले पुढे गेले पाहिजे. त्यातून मराठी साहित्याचा प्रसार संमेलनाच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाईल ऍपच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत जास्तीत जास्त पोचवला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे संस्कृतिक कार्य तसेच शालेय व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
तावडे यांच्या हस्ते संमेलनाच्या संकेतस्थळाचे तसेच रेडिओ ध्वनीफितीचेही उद्घाटन माऊसच्या क्लीकने त्यांनी केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या घटनेचे स्वागत केले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, सचिव प्रकाश पायगुड, खजिनदार सुनील महाजन तसेच राजेश पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ुुु.ीरहळींूरीरााशश्ररप.र्विी.
सांस्कृतिक मंत्री हा मंचावर दिसण्यापेक्षा त्याने राबवलेल्या धोरणातून दिसला पाहिज, असे सांगून तावडे म्हणाले की, मराठी साहित्य व साहित्यिकाची स्वायत्तता ही जपली गेली पाहिजे. म्हणूनच मंत्रालयात खेटे घालण्याआधीच ८९व्या संमेलनाचा सरकारी निधी दसर्याच्या आदल्या दिवशीच आम्ही बँकेत जमाही केला. हा जनतेचा पैसा असून त्यातून साहित्यासाठी चांगली कामेच होऊ शकतात.
मराठी साहित्य व साहित्यिकांचे स्थान टिकवणे हे राजव्यवस्थेचे काम असून मराठीतले चांगले साहित्य हे भारतीय तसेच इंग‘जीत नेण्याचा मोठा कॅनव्हास (अवकाश) मिळणे आवश्यक आहे. यासंबंधी बोलताना तावडे पुढे म्हणाले की, रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली डब्ल्यू. बी. येट्स याने इंग‘जीत आणल्यानेच त्यास नोबेल पुरस्कार मिळाला, तसे मराठीतले चांगले साहित्यही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुवादित व्हायला हवे. मराठी साहित्याचा खर्या अर्थाने प्रसार व्हावा यासाठी वाईजवळील बिलार येथे पुस्तकांचे गाव तयार करण्यात येणार असून तिथे सुमारे पाच लाख पुस्तके आणि सुटीच्या दिवसांमध्ये आवडत्या साहित्यिकांबरोबर साहित्यावर चर्चा व संवाद साधण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळावी याचीही व्यवस्था केली जाणार आहे. मराठी वाचनाची आवड वाढावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने केवळ मराठी पुस्तक विक‘ीसाठी एक हजार चौरस फुटची जागा कमी दरात उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही तावडे यांनी केले.
स्वागताध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले की, यापूर्वी संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मुंबईत राज्यपालांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते घडण्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यापाठोपाठ संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात व्हावे, ही इच्छाही आता पूर्ण झाली आहे. आमच्या विद्यापीठाला ८९वे संमेलन आयोजित करण्याची संधी मिळत असून आमचा खारीचा वाटा आम्ही उचलू आणि या संधीचे सोने करू. भविष्यातही मराठी साहित्यप्रसाराचे आमचे काम चालूच राहील.
मराठी भाषा समृद्ध असली तरी तिच्यातला संवाद मात्र कमी होत असल्याचे सांगून डॉ. मोरे म्हणाले की, संमेलनाच्या संवाद साधणार्या संकेतस्थळामुळे संवादसंस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तर माहिती व प्रेरणा या दोन्ही दृष्टीने ते संमेलनाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. वैद्य म्हणाल्या की, शिक्षणमंत्री तावडे यांनी कलाशाखेकडे जास्त लक्ष पुरवणे गरजेचे आहे, कारण साहित्य माणसाला घडवते, मनाची मशागत करत असल्यामुळे या शाखेचा विस्तार कसा होईल, याचा विचार व्हायला हवा. तसेच अभ्यासक‘मातून हद्दपार झालेले मराठी वैचारिक साहित्य पुन्हा कसे समाविष्ट होईल, याकडेही लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले, तर सोमनाथ पाटील यांनी आभार मानले.
पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साचला कचरा , परिसरात दुर्गंधी, डासांचे प्रमाणदेखील वाढले
पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे , यंदा पाऊससुद्धा कमी झाल्याने गेले अनेक दिवसापासून नव्या कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह नसल्याने हा कचरा साचत आहे , त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे . हा कालवा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधून वाहत असून कालव्याचे व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याकडे आहे , येथील नागरिक रणजित परदेशी , महेंद्र गायकवाड , मनिष सोनिग्रा यांनी नवा कालवा स्वछ करण्याची मागणी केली आहे . या कालव्यास जाळी बसविण्याची मागणी हेमंत मुळे यांनी केली आहे
‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक : विजय पांढरे
‘त्रिदल’ पुणे च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांची प्रातःकालीन संगीत मैफल

































