‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्ती महोत्सवास प्रारंभ
नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यात दूर करण्याचे आयुक्तांचे आदेश
जागवल्या नौशाद अली-मजरुह सुलतानपुरींच्या आठवणी
दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल, दिप्तीला मिळालं पहिलं मराठी ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केले आहे.
7 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतेच सोशल मीडियावरून लाँच झाले आहे. यो (सचिन पाठक) ने लिहीलेल्या गीताला पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे.
ह्या गाण्याविषयी फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “बॉलीवूड आणि तमिळ सिनेमांमध्ये हिरोइनला लाँच करताना, तिचे पहिले गाणे खूप स्पेशल असावे, ह्यावर भर दिला गेलेला मी पाहिलाय. पण मराठीत असे साँग मी पाहिले नव्हते. फिल्ममध्ये लावणीने हिरोइनची एन्ट्री झालेली आहे. पण तिचा पहिला-वहिला सिनेमा असताना तिचे खास इंट्रोडक्शन करण्यासाठी कधी साँग बनवले गेले नव्हते. माझ्या हिरोइनचीही कधी अशी एन्ट्री व्हावी असं मला नेहमी वाटायचं. दिप्ती उत्तम डान्सर आहे. ती कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तर हिपहॉप आणि फ्री स्टाइल डान्सिंगही तिला खूप चांगली जमते. त्यामूळे मी माझी खूप वर्षांपासूनची ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँगची इच्छा ‘जी ले जरा’ गाण्याने पूर्ण केली.”
‘जी ले जरा’ गाणे कालाघोडा, मुंबई सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, मुंबई युनिव्हर्सिटी, सोफिया कॉलेज अशा भागांमध्ये चित्रीत झालंय. दिप्ती सतीसोबत ह्या गाण्यामध्ये सूमारे 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. ह्याविषयी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “मुंबईतल्या सर्वात जास्त वर्दळ असलेल्या भागात आम्ही हे गाणे चित्रीत करत होतो. हे गाणे जरी आम्ही रविवारी चित्रीत केले असले तरी, ह्या ठिकाणी रविवारी येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असते. जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांच्या जमावासमोर न विचलीत होता दिप्ती सतीने ह्या गाण्याचे चित्रीकरणे केले. त्यामूळे मला तिचे कौतुक वाटते. ”
दिप्ती सती म्हणते, “ कोणत्याही अभिनेत्रीसाठी सिनेसृष्टीत असे लाँच मिळणे, हे स्वप्नवत आहे. त्यामूळे मी संजयदादांची खूप ऋणी आहे, की त्यांनी मला एवढ्या धमाकेदार एनर्जेटिक गाण्याने सिनेसृष्टीत लाँच केले.”
ह्या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी विचारल्यावर दिप्ती म्हणते, “गाण्याचे चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केले. ह्या गाण्यात माझे बरेच चेंजेसही आहेत. त्यात गाण्याचे कोरीओग्राफर उमेश जाधव होते. त्यांच्या एनर्जीला मॅच करत, डान्स-स्टेप आत्मसात करत, भर-भर कपडे चेंज करत, गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करणे चॅलेंजिंग होते. पण मला आम्ही ते गाणे वेळेत पूर्ण केले. आणि ते खूप छान आकाराला आलंय, याचे मला खूप समाधान आहे.”
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.
थकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय पर्यायच नाही; मोहीम आक्रमकपणे राबवा -संजय ताकसांडे
पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीची अतिशय विदारक स्थिती आहे. सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वसुलीची मोहीम आक्रमकपणे राबवावी, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
महावितरणच्या प्रकाशभवनमध्ये पुणे परिमंडलातील सुमारे 1500 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) श्री. शंकर तायडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंते श्री. सुंदर लटपटे, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. राजेंद्र पवार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. आर्थिक कोंडी वाढत आहे. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी सर्व अभियंते व जनमित्रांनी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या मानसिकतेप्रमाणे काम करावे व संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी असे निर्देश त्यांनी दिले. वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.
यासोबतच सर्वच 12 विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीचा आढावा घेण्यात आला व वसुली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 7 लाख 3 हजार थकबाकीदारांकडून 133 कोटी 52 लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. कार्यकारी अभियंते, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख, लेखा अधिकारी व कर्मचारी आणि जनमित्रांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन
नवी दिल्लीत १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन
पुणे :- क्रेडाई नैशनलकडून येत्या १३ व १४ फेब्रुवारी ला नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे क्रेडाई युथकॉन२०१९चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ३००० हून अधिक विकासकांसोबत संवाद साधणार आहेत. १३ फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.ते पुढे म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन हा क्रेडाईच्या युथविंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील तरुण विकासकांसाठी एक सुयोग्य व्यासपीठ ठरणार आहे. हेच तरुण विकसक भविष्यातील बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीचे चालक ठरणार आहेत.
यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांसारखे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
परवडणाऱ्या घरे , रेरामुळे बांधकाम क्षेत्रात आलेली पारदर्शकता,पायाभूत सुविधांची प्रगती, भारतीय अर्थव्यवस्थेची सध्य स्थितीचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम अशा महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे.
क्रेडाई नैशनलचे प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन २०१९ हि भारतातील सर्वात मोठी व भव्य रियल इस्टेट परिषद आहे. भारतातील बांधकाम क्षेत्राच्या विकासाठी क्रेडाई अविरत प्रयत्न करत आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.
प्रदूषण नियंत्रण संशोधनाबद्दल अमोल चाफेकर यांना शिष्यवृत्ती
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन-12 देशातील प्रतिनिधींचा सहभाग
पुणे :वाय अॅण्ड एम अंजूमन खैरूल इस्लामच्या पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स वतीने ‘न्यू ट्रेंडस् इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकींग, कोऑपरेशन, मॅनेजमेंट, कॉम्पुटर सायन्स, आय टी अॅण्ड एन्हार्यनमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी ही परीषद सेमिनार हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती डॉ. आफताब अन्वर शेख (प्राचार्य, पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स) यांनी पत्रकाद्वारे दिली.
उद्या शुक्रवार, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता परिषदेचे उदघाटन होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 देशातून 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये बाहरीन, मोझांबिक, इराक, अफगाणिस्तान, नामिबीया, नायझेरियन, यामेन, युएसए, जर्मनी, श्रीलंका, थायलंड, रवांडा या देशांचा समावेश आहे.
वाणिज्य, अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रातील सर्वात प्रभावी आणि प्रचलित ट्रेंडचा आढावा घेणे तसेच विविध देशांतील तज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणणे हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे.
डॉ. आब्बास लोखंडवाला (कॉमर्स अॅण्ड रिसर्च सेंटर विभाग प्रमुख), नसरीन परवेज खान आणि वाफीया वाहिद हे परिषद संयोजन समितीमध्ये आहेत.
या परिषदेमध्ये वनिडा वडीचारोइन (थाई – नीचि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुआनुंग, बँकॉक), डॉ. रविंद्र डिसानायके (मार्केटींग मॅनेजमेंट विभाग केलॅनिया विद्यापीठ, श्रीलंका), क्लेरन्स फर्नांडीस (रूवांडा रेनेसान्स चे अध्यक्ष), चित्राल बेनिल्डस फर्नांडो(श्रीलंका), प्रा. मॅपा थिलकार्तने (केलॅनिया विद्यापीठ, श्रीलंका) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘१३ पॉईंट रोस्टर’प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तीव्र निदर्शने
पुणे : नोकर भरतीत १३ पॉईंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (ए) जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार करून घालून आंदोलनाला सुरुवात झाली. आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले.
या आंदोलनात पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रियदर्शिनी निकाळजे, बसवराज गायकवाड, नीलेश आल्हाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तहसीलदार हेमंत निकम यांनी हे निवेदन स्वीकारले. तर कार्यकर्त्यांवरील ३५३ कलमांतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निवेदन पोलीस उपयुक्त मितेश घट्टे यांनी स्वीकारले.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पूर्वीच्या २०० पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती जमातींना व ओबीसीला ४९ टक्के मिळत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास एससी, एसटी व ओबीसींना लाभ मिळणार नाही. परिणामी समाजात बेकारी वाढेल. त्यामुळे ही १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू करू नये. तसेच केंद्र शासनाने अध्यादेश काढून या नोकर भरतीला स्थगिती द्यावी. तसेच सदरची नोकरभरती पूर्वीप्रमाणे २०० पॉईंट रोस्टरनुसार करावी”
बाळासाहेब जानराव म्हणाले, “आंबेडकरी कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनेकांवर ३५३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.” परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.
मोदी भागिले दीदी = मोदी … परेश रावलचा हिसाब …
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असा वाद चर्चेत आला आहे. या वादावरुन भाजपाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी एक टि्वट केले आहे.
परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गणित मांडले आहे. मोदी आणि दीदी नावांचा भागाकार (मोदी/दीदी = मोदी) केला आहे. तसेच, फोटोला ‘हिसाब बराबर’ अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, परेश रावल यांच्या ट्विटला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 2300 लोकांनी रिट्विट केले आहे. तर 9700 लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय काही लोकांनी त्यांच्या गणित ज्ञानाविषयी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, गेल्या रविवारी शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. या प्रकारानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावे समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने अनेकदा केला.
दत्तक मुलींना विसरली प्रीती झिंटा, त्यांचा खर्च करत नाही अन भेटत हि नसल्याचा आरोप
प्रीती झिंटाने 10 वर्षापुर्वी म्हणजेच 2009 मध्ये 34 मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. पण आता वृत्त आहे की, प्रीती आपल्या या दत्तक घेतलेल्या मुलींना विसरली आहे. ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, 34 मुलींचे पालन पोषण आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन देऊन प्रिती आता विसरली आहे.
– शाइना म्हणते की, प्रीती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंट नाराज आहे.
– लग्नापुर्वी 2009 मध्ये प्रितीने आपल्या 34 व्या वाढदिवशी शाळेत शिकणा-या विद्यार्थिनींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी तिला परवाणगी देण्यात आली होती. तिने अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत येथे आली होती. शाइना म्हणते की, काही वर्षापुर्वी ती शाळेत आली, तेव्हा फक्त मुलींसोबत फोटो काढून निघून गेली.
– हम बने तुम बने- देणार पालकत्वाचे धडे
सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर
झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे.मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिकाटि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली.
सगळं चांगलं चालू असताना आता मालिका एक रंजक वळण घेणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्यापद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळेजालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे कि काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल. या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाचचेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचं समोर येतं. पण विक्रांतने असं का केलं?त्याच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? यासगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्यायेत्या काही भागात होईल आणि हे पाहणं खूप रंजक ठरेल यात शंकाच नाही.
ऋतुजा जोगदंड ची अंतर भारतीय नेटबाँल संघात निवड
राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित
मुंबई – सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन १९७६ पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी खालील मान्यवरांची शिफारस केली होती.
पुरस्काराचे रु. १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप असून नाटक विभागासाठी श्री रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्री. श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी श्रीमती उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी श्री मोहन कदम आणि कलादानसाठी श्री. श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे. पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.







