Home Blog Page 2940

डीईएसमध्ये ‘शासन निर्णय कार्यशाळा’

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) घटक संस्थांमधील प्राचार्य, उपप्राचार्य, मु‘याध्यापक, उपमु‘याध्यापक, पर्यवेक्षक आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी दोन दिवसांच्या ‘शासन निर्णय कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची गरज असते. त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, प्रशिक्षणाची गरज असते. त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याचे डॉ. कुंटे यांनी यावेळी सांगितले. राखीव जागा धोरण, पवित्र प्रणाली, शालार्थ आणि सातवा वेतन आयोग, शिक्षण हक्क कायदा एस. एस. कोड, संच मान्यता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण विभागातील माजी सह-संचालक लक्ष्मीकांत पांडे, उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. के. एम. कुलकर्णी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक प्रकाश गायकवाड, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा देशमुख, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अनिल गावडे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण विभागाचे माजी सह-संचालक लक्ष्मीकांत पांडे यांनी विविध शासन निर्णयांबाबत माहिती दिली.
   उपप्राचार्या स्वाती जोगळेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी स्वागत आणि तिलोत्तमा रेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले. शंभरहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये : डॉ.कुमार सप्तर्षी

दलित स्वयंसेवक संघाच्या ३४७ व्या  व्याख्यानाला चांगला प्रतिसाद*
पुणे :’सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये’, असे आवाहन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी रविवारी केले.
दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या  संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे ३४७ वे पुष्प आयोजित करण्यात आले हाेते. रविवार दि. ५ मे  रोजी सायंकाळी  ५  वाजता दलित स्वयंसेवक संघ मुख्यालय, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम येथे हे व्याख्यान झाले.
‘ सध्याची सामाजिक – राजकीय परिस्थिती आणि आपल्यासमोरील आव्हाने ‘ या विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘जात, धर्म यामुळे माणसा -माणसातील अंतर वाढते, आपण माणसातील अंतर कमी केले पाहिजे. जातीच्या अस्मिता कमी झाल्याशिवाय भारतीयत्व मोठे होणार नाही.प्रामाणिकपणाच दूरवर आपल्याला साथ देतो, हा सर्वांचाच अनुभव आहे’.
‘संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला’,
‘सत्तेकरता समाजात विभाजन करण्यासाठी द्वेष वाढविला जात आहे. फक्त मोदींना घालवून चालणार नाही, मनुस्मृतीचा पगडा नाहिसा केला पाहिजे’,असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी प्रा.पवार हे  होते.दादासाहेब सोनवणे यांनी स्वागत केले.प्रल्हाद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुजित रणदिवे, (कार्यालयीन सचिव ) यांनी सूत्रसंचालन केले.लक्ष्मण लोंढे , संदीप बर्वे, प्रसन्न मराठे उपस्थित होते. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ही व्याख्याने आयोजित केली जातात.

राजीव गांधींचा अपमान म्हणजे देशाचा अपमान – मोहन जोशी

पुणे-‘राजीव गांधी हे मिस्टर क्लीन असल्याचे सुरूवातीला सांगितले जात राहिले आणि ‘भ्रष्टाचारी नं. 1’ अशी त्यांची जीवनाची अखेर झाली’ अशी विपर्यस्त आणि जहरी टीका दुसर्‍यांदा पंतप्रधानपद मिळावे यासाठी वेडेपिसे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व शहिदांना सदैव वंदन करणारा प्रत्येक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धिक्कार करेल ही खात्री व्यक्त करतो. देशातील जनता आता आपल्याला झिडकवणारं आणि सत्ताबदल झाल्यानंतर राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघड होईल या भितीने गांगरून गेल्यामुळेच ते अशी बेछूट विधाने करीत आहेत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत गेल्या 5 वर्षात आपल्या सरकारने काय केले हे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेला सामोरे जायला हवे होते. मात्र देशापुढील कोणतेच प्रश्न सोडवता न आल्यामुळे वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका करीत वणवण भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहीद पंतप्रधान राजीव गांधींवरील टीका हा असाच वैफल्यग्रस्तेतून केलेला प्रयत्न आहे. 1984-85 मध्येच देशात संगणक क्रांती करून आधुनिक भारताचा पाया रचणार्‍या कर्तबगार पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलीदान दिले, देशासाठी ते शहीद झाले. राजकीय हेतुने प्रेरीत होऊन त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामधूनही न्यायालयाने त्यांची मरणोत्तर निर्दोष मुक्तता केली. हा इतिहास माहित असूनही पुन्हा पंतप्रधानपद मिळावे त्यासाठी उताविळ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर अशी टीका करून शहीदांचा अपमानच केला आहे.

शहीदांचा अपमान करायचा ही भाजपची विकृत संस्कृती आता लपून राहिली नाही. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांना त्यांनी शाप दिल्यामुळेच ते मारले गेले असे बेताल वक्तव्य केले होते. शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले द्वेषाने भरलेले विधानही हीच विकृत परंपरा दाखवते. विशेष म्हणजे पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागताना याच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात वावगे वाटले नाही. ‘काहीही करा पण मला पुन्हा पंतप्रधान करा’ असा आक्रोश करीत ते सध्या देशभर फिरत आहेत. 23 मे रोजी देशातील जनता मात्र या अपयशी आणि हुकूमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही आणि ‘सर्वात अपयशी पंतप्रधान’ अशी नोंद त्यांच्याबद्दल इतिहासात कायमची नोंदवली जाईल हे निश्चित.

महापालिकेचे कामगार सल्लागार जागे झाले ..कंत्राटी कामगारांचे वेतन बँकेत जमा करा म्हणाले..

पुणे -कंत्राटी कामगारांची  आर्थिक पिळवणूक करणारी महापालिका असा  पुरस्कार खरे तर कोणी या महापालिकेला देत का नाही ? असा प्रश्न कधी कधी पडतो , बोगस कामगार दिमतीला ठेवणे , ते उघडकीस आणूनहि  त्याबाबत लाज न बाळगणे ,अशा  स्वरूपाच्या धोरणांची  काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेतील कामगार सल्लागारांना जणू जाग आली कि काय ? असे वाटण्यासारखी हि बातमी आहे …काय आहे ती बातमी ते पहा … 

महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्थितीत वेतन अथवा देय असलेले भत्ते रोख स्वरूपात न देता ते आरटीजीएस अथवा धनादेशाद्वारेच त्यांच्या खात्यात जमा केले जावेत, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. या कामगारांना दरमहिन्याला ठराविक रक्कम रोख स्वरूपात दिली असल्याचे दाखवून त्यांच्या हक्काच्या वेतनावर डल्ला मारण्याचा घाट ठेकेदारांकडून घातला जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश कामगार सल्लागार विभागाकडून सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिकेच्या घनकचरा, पाणी पुरवठा, ड्रेनेज, भवन विभागासह क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार घेतले जातात.

त्यांना महापालिकेकडून किमान वेतनाच्या दराने वेतन देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात ठेकेदारांकडून त्यांना अवघे पाच ते सहा हजार रुपयेच दिले जात असल्याचे तसेच त्यांचे ईपीएफ आणि इतर भत्ते भरलेच जात नसल्याचे समोर आल्याने महापालिकेने या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात मोठ्या प्रमाणात शिस्त आणली आहे. त्यानुसार, त्यांचे ईपीएफ भरणे, बॅंक खाते उघडणे ठेकेदारांना बंधनकारक केले असून कर्मचाऱ्यांना वेतनचिठ्ठीही (पे-स्लीप) देणे अनिवार्य केले आहे. असे असतानाच; कर्मचाऱ्यांना पैशांची गरज असल्याचे भासवत अनेक ठेकेदारांकडून महिन्याच्या सुरूवातीलाच त्यांना उचल म्हणून रोख रक्कम दिली जात असल्याचे दाखविले जात आहे. तर त्याचे कोणतेही पुरावे या ठेकेदरांकडे नसतात.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना खरच रक्कम दिली का नाही याची खातरजमा करण्यात प्रशासनाला अडचणी येतात, याचाच गैरफायदा घेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गोलमाल केला जात असल्याचे वृत्त स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने आता कर्मचाऱ्यांना कोणतेही उचल अथवा देय भत्ते द्यायचे असल्यास ते आरटीजीएस अथवा धनादेशाद्वारे त्यांच्या बॅंक खात्यात भरणे ठेकेदारांना बंधनकारक केले आहे.

त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या शिवाय, वेतनचिठ्ठी असल्याशिवाय ठेकेदारांना या कामगारांच्या वेतनाची रक्कम दिली जाणार नाही तसेच प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना वेतन देणे बंधनकारक करण्यात आले असून वेतन देण्यास विलंब केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

महापालिकेत बापट समर्थकांचा झेंडा …अमोल बालवडकर,ज्योत्स्ना एकबोटे,योगेश समेळ,विजय शेवाळे विषय समित्यांचे अध्यक्ष

पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची, तर उपाध्यक्षपदी धनराज घोगरे यांची, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. श्रद्धा प्रभुणे यांची, विधी समितीच्या अध्यक्षपदी योगेश समेळ यांची, तर उपाध्यक्षपदी वीरसेन जगताप यांची, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी विजय शेवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी महेश वाबळे यांची निवड करण्यात आली.निवड झालेले सर्व नगरसेवक  पालकमंत्री गिरीश बापट यांचे समर्थक मानले जातात

महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसनेही उमेदवार उभे केले होते. मात्र, महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने चारही समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद भाजपकडे राहिले.

प्रत्येक समितीत 13 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे आठ, तर राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. निवडणुकीत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

नाराज शिवसेनेने पाळला युतीचा धर्म

महापालिकेतील विषय समित्यांसह प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने डावलल्यानंतर ताठर भूमिका घेतलेल्या शिवसेनेने आता एक पाऊल मागे घेतले असून, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपला साथ देत युतीचा धर्म पाळल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. परंतु, भाजपच्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे शनिवारी पुन्हा उघड झाले.

विषय समित्यांपैकी शहर सुधारणा किंवा महिला बालकल्याण समितीच्या मागणीवर शिवसेना ठाम होती. मात्र, शिवसेनेच्या मागणीआधीच क्रीडा किंवा विधीपैकी एका समितीचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव भाजप नेत्यांनी शिवसेनेपुढे ठेवला होता. त्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे युतीच्या नेत्यांमधील मतभेद दिसून आले. त्यानंतर प्रभाग समित्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानही या दोन्ही पक्षांत नाराजीनाट्य रंगले.

भाजपकडील 11 पैकी चार समित्या देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. मात्र, प्रभागांमधील ताकद दाखवून देत एका समितीचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने नाकारला. त्यामुळे लोकसभा निवडणूक संपूनही आठवडा होण्याआधीच युतीला तडे जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान केल्याने महापालिका वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले, “”आम्ही युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मदत केली आहे. या पुढील काळात आम्ही भूमिकेवर ठाम असू.”

शरद पवारांचे दुसरे नातू विधानसभेच्या आखाड्यात, रोहित पवारांनी सुरू केली तयारी…

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजून एक पिठी राजकारणात आपली पाय जमवण्यास तयार झाली आहे. पवारांचे नातू रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. स्वत: रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार याबाबत म्हणाले, लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येते की गेले 12 वर्ष मी व्यावसाय करताना सामान्य नागरिकांशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. काम करताना माझा सामाजाचा अभ्यासही चांगला झालेला आहे. त्यामुळे विधानसभा लढण्याचा माझा विचार आहे. मी कुठून लढणार याचा निर्णय पक्षाचे नेते चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. हा निर्णय मला मान्य असेल. मी पवार साहेबांच्या विचाराने काम करतो, त्यामुळे जामखेड भागातून आपल्याच विचाराचा आमदार निवडून आला पाहिजे. या भागातील शेती, महिला, तरुणांचे प्रश्‍न या भागातून निवडून येणारा आमदार निश्‍चीत सोडवेल.

नियोजन न केल्याने पाण्याचा प्रश्‍न
पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण असा वाद नाही. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्री, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित नियोजन न केल्याने पाणी कमी पडत आहे. व्यवस्थित नियोजन असते तर ही स्थिती निर्माण झाली नसती. पाणी वापराबाबत प्रबोधन केले तर पुणेकर आणखी योग्य प्रकारे पाणी वापरतील असेही पवार यांनी सांगितले.

पाच वर्षात पार्थ काय बदल करतील याचा विचार करा
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मार्गदर्शन केले नाही का? असे विचारले असता पवार म्हणाले, पार्थ यांना 22 लाख मतदारांपर्यंत पोहोचायचे होते आणि मी वेगवेगळ्या तालुक्‍यांमध्ये फिरत होतो. आमची चर्चा नक्‍कीच होत असते, एकमेकांचे विषय समजून घेत असतो. पार्थ चांगल्या मतांनी निवडून येतील. सुरूवातीला पार्थ यांना काही लोकांनी ट्रोल केले, पण त्यांचे सुरूवातीचे भाषण आणि शेवटचे भाषण यात फरक आहे. या 20 दिवसात त्यांच्यात बदल केला. तर पाच वर्षात पार्थ या परिसराचा काय बदल करतील याचा तुम्ही विचार करा असेही पवार म्हणाले.

  • रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचे प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठे राजकीय वलय त्यांना आहे. पण, रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, याची माहिती नसल्याने, राजकीय वर्तुळात खळबळं उडाली आहे.

कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये आहे. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.

वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकाच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. राजकारणातील त्यांचा प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.

रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदे
-मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
– अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
-उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
– संचालक, आयएसईसी
– नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट
– कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया

मी सरपंचांना जाहीरनामा पाठवतेय, भाजपवाले त्यांना लिफाफ्यात 20 हजार रुपये पाठवत आहेत; प्रियंकांचा गंभीर आरोप

अमेठी – काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी भाजपवर पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी अमेठीत एका प्रचारसभेत हा आरोप केला. येथील सरपंच आणि स्थानिक नेत्यांना मी काँग्रेसचे जाहीरनामे पाठवत आहे आणि भाजपचे नेते त्यांना लिफाफ्यात 20-20 हजार रुपये पाठवत आहेत. ही गोष्ट हास्यास्पद आहे असेच म्हणावे लागेल. भाजपला वाटते की ते 20 हजार रुपयांत अमेठीतील सरपंचांना विकत घेऊ शकतात असे प्रियंका यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारने शेतकऱ्यांचे नव्हे, उद्योजकांचे कर्ज केले माफ
प्रियंका यापुढे म्हणाल्या, देशात लोकशाही जिवंत ठेवणारे आणि सामान्य जनतेसाठी काम करणारे सरकार हवे आहे. भाजपचे हेतूच वाइट आहे. बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या उद्योजकांचे भले होईल अशी त्यांची धोरणे आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. परंतु, 5 वर्षांत त्यांनी उद्योजकांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.

15 लाख अजुनही मिळाले नाहीत…
प्रियंका यांनी सांगितल्याप्रमाणे, पीएम नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये आश्वासन दिले होते, की देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. ते 15 लाख अजुनही आलेले नाहीत. आमची सत्ता आल्यास गरीबांच्या खात्यांत न्याय योजना अंतर्गत दरवर्षी प्रत्येकी 72 हजार रुपये दिले जातील. लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा असे आवाहन प्रियंका यांनी केले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली तेव्हा सर्वात पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले याची आठवण प्रियंका यांनी सभेत करून दिली.

अरविंद केजरीवालांवर रोड शो दरम्यान हल्ला, अज्ञात युवकाने जीपवर चढून कानशिलात लगावली

0

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर भर रस्त्यावर हल्ला झाला. मोतीनगर परिसरात ते शनिवारी रोड शो करत होते. त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या जीपच्या बोनटवर चढला आणि चापट मारले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान त्यांनी हात उचलून सर्वांना अभिवादन केले. याच दरम्यान लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित आपच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडले.

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मोफत मार्गदर्शन

पुणे : “महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. यंदाच्या या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या वतीने शुक्रवार, दि. १० मे २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील जोत्स्ना भोळे सभागृहात मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे,” अशी माहिती लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (ओरिएन्टेशन) आनंद आंबेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या मेघना शिंदे, संगीता झंवर व अनिता नेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेघना शिंदे म्हणाल्या, “लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या सभासदांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. भूजल विभागाच्या वरिष्ठ भूगर्भ तज्ज्ञांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. सतीश उमरीकर अणि डॉ. भाग्यश्री मक्तेवार हे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून प्रांतपाल रमेश शहा, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे असणार आहेत. या माध्यमातून आपण आपल्या मृत अवस्थेतील बोअरवेल जिवंत करू शकतो. तसेच टँकरमुक्त सोसायटी करू शकतो. नागरिक व सहकारी गृहरचना संस्थांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.”
आनंद आंबेकर म्हणाले, “यंदा ऑगस्टमध्ये धरणे भरल्याने आपण खुश झालो; पण परतीच्या पावसाने अचानक पळ काढल्याने आपल्या तोंडचेही पाणी पळाले. यंदा आणखी एका दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. कारण आपण भूगर्भातून पाण्याचा उपसा करतो; मात्र, भूगर्भात पाणी कोणी भरत नाही. जलसंवर्धन अत्यल्प प्रमाणात होते. बोअरिंग करताना प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूगर्भात पाणी सोडले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे व्हावे. त्यासाठी जनजागृती व्हायला हवी.”
 
लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री विषयी : 
लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री क्लबचे सदस्य अनेक वर्षे जलसंवर्धनाचे व जलप्रदूषण रोखण्याचे जनजागृतीचे कार्य करीत आहे. आजवर अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवून कोट्यावधी लिटर पाणी भूगर्भात मुरवले आहे. मस्तानी तलावातील गाळ काढून त्यातील झरे जिवंत करण्यासाठी या क्लबमधील अनेक सभासदांनी मेहनत करून त्यात यश मिळविले आहे. तसेच गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण रोखण्याचा गेली 16 वर्षे प्रयत्न करीत आहेत. 2013 च्या दुष्काळात लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या सदस्यांनी  ग्रामीण भागात दुष्काळग्रस्तांना मदतकार्य पोहोचवले.

सृजन फौंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सतर्फे स्पर्धा परिक्षा राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन

पुणे : “महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दरवर्षी त्यामध्ये लाक्षणिक वाढ होत आहे. परंतु, या परिक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय, स्पर्धा मोठी असल्याने यश-अपयशालाही सामोरे जावे लागते. अशावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही या स्पर्धा परीक्षेचे वास्तव उलगडून दाखविण्यासाठी स्पर्धा परिक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तव, भवितव्य व दिशा या संकल्पनेवर आधारित हा स्पर्धा परिक्षा महोत्सव १८ ते २० जून २०१९ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे होत आहे,” अशी माहिती सृजन फौंडेशनचे अध्यक्ष व बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे (एमएसआर) महेश बडे व किरण निंभोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साई डहाळे, श्रीकांत कदम, प्रतीक धुमाळ, विजय मते आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘कॉम्पिटेटिव्ह ऍस्पिरेन्ट्स नेव्हीगेटर’ या ऍपचे व संकेतस्थळाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
रोहित पवार म्हणाले, “आजच्या तरुणाईला प्रशासनात काम करण्याची आवड आहे. प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची इच्छा मनाशी बाळगून तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. या तरुणाईला स्पर्धा परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांविषयी माहिती उपलब्ध करुन विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यात मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 (वास्तव, भवितव्य व दिशा) पर्याय आहे. तीन दिवसांच्या या महोत्सावात प्रत्येक दिवशी चार सत्र असणार आहेत. महोत्सवात लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, शैक्षणिक, उद्योग, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांनी सुरु केलेल्या अशा उपक्रमाला बळ देण्यासाठी सृजन फौंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते. पाच-सात वर्षे सतत अभ्यास करुनही हाती यश येत नसल्याने आणि वय वाढत असल्याने नैराश्य येते. त्यातून वाढणारी व्यसनाधीनता, खचलेला आत्मविश्वास हा त्या उमेदवारांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, राज्याच्या हितासाठी घातक आहे. मोठ्या संख्येने तरुणवर्ग स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात अडकलेला आहे. अशावेळी त्याला वास्तवाची जाण करुन देत योग्य दिशा देऊन त्याचे भवितव्य सुकर करण्यासाठी हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आले, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाणार आहे. हा महोत्सव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. यातून उभ्या राहणार्‍या निधीचा उपयोग आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे.”
महेश बडे म्हणाले, “सृजन फौंडेशनच्या रोहितदादा पवार यांच्या पुढाकारातून आणि ‘एमएसआर’च्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या भव्य स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या समस्या लोकसेवा आयोग व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मदतकेंद्रही उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात क्लासेस, ऑनलाईन अभ्यास पोर्टल्स, व्यवसाय मार्गदर्शन, प्रकाशने असे विविध स्टॉल्स असणार आहेत. नैराश्यग्रस्त, आत्मविश्वासाने खचलेल्या उमेदवारांसाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी स्पर्धा परीक्षेच्या अ‍ॅपचे अनावरण होणार आहे. त्यावर 20 प्रश्नांची परीक्षा घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत क्लासला बसण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात एकाच दिवशी ही परिक्षा घेतली जाणार आहे. हा महोत्सव विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक असणार आहे. राज्यातील सरकारी नोकरीबाबतची सद्यस्थिती दरवर्षी विविध पदांसाठी सरासरी आठ-दहा हजार पदांची आहे. मात्र, यासाठी राज्यातून 12-13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत असतात. 10वी, 12वीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली जात आहे. नोकरी करणारा वर्ग, निवृत्त लष्करी जवान, गृहिणी, सरकारी सेवेतील व्यक्ती स्पर्धा परीक्षेसाठी झगडत आहे. पण यातील वास्तव खूप जणांना माहीत नाही. दरवर्षी किती जागा निघतात, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, मार्गदर्शन, या सर्व विषयांची जाण नसते. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी महेश बडे (९१५८२७८४८४) व किरण निंभोरे (८४८४०८६०६१) या क्रमांकावर किंवा www.spardhaparikshamahotsav.com या संकेतस्थळावर संपर्क करावा.”
सृजन फौंडेशन व ‘एमएसआर’ची उद्दिष्ट्ये :
– दुष्काळग्रस्त भागातील उमेदवांसाठी अभ्यासिका
– जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय
– पोटभर जेवण (1 वेळेस चहा आणि नाश्ता व 2 वेळा जेवण)
– प्रत्येक महिन्यात प्रशासकीय, सामाजिक व राजकीय मान्यवरांचे व्याख्याने
– अंध व अपंगांसाठी विशेष सवलती, व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
– प्रत्येक महिन्यात मानसोपचारतज्ज्ञांची व्याख्याने व समुपदेशन
सृजन फौंडेशनविषयी :
स्पर्धा परीक्षा देणार्‍यांची वाढती संख्या, राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी सृजन फौंडेशन कार्यरत आहे. सृजन फौंडेशनच्या वतीने समाजातील विविध स्तरांवर सामाजिक कार्य केले जाते. स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून सृजन फौंडेशन प्रशासनातील उच्च दर्जाच्या पदावरील व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांना बोलावून उमेदवारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्यासोबत आज महाराष्ट्रातून पुण्यात येणार्‍या उमेदवारांसाठी दुष्काळाच्या परिस्थितीत एक माणुसकीचा हात म्हणून या तरुणांसाठी मेसची व्यवस्था केली जात आहे.
एमपीएससी स्टुडंट्स राईट्सबद्दल :
‘एमएसआर’ संस्था गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या तरुणांच्या हक्कासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत आहे. राज्य शासनाच्या विविध भागातील रिक्त असणार्‍या जागा भरण्यात याव्यात व वयाची अट वाढवण्यात यावी यातून झालेला आहे. संघटनेने आजवर मोर्चे, उपोषणे, पदयात्रा काढून स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांचा आवाज सभागृहात पोहोचवला. परीक्षेतील दिरंगाई, निकाल, आरक्षण पद्धती, रिक्त जागा याविरुद्ध लढा देत सरकारला व आयोगाला पारदर्शकतेसाठी बायोमॅट्रिक, सीसीटीव्हीसारखी यंत्रणा, मोबाईल जॅमर अशा नवीन सूचना करून त्या अंमलात आणण्यास सांगितले.

गिरीश बापट यांनाच पुणेकर अदखलपात्र करतील- मोहन जोशी

पुणे-पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना त्याचे योग्य
नियोजन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले नाही. त्यामुळेच पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या
संकटाला सामोरे जावे लागत आहे. या मी केलेल्या जाहीर टिकेला उत्तर देण्याऐवजी ‘अदखलपात्र’
अशी संभावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी करून पुणेकरांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देण्याचा
प्रयत्न केला. मात्र पुणेकर जनता त्यांनाच २३ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या
दिवशी अदखलपात्र करेल अशी  टीका काँग्रेसचे नेते व काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष
आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली. गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत मालकमंत्री
नाहीत अशी टिका ही मोहन जोशी यांनी केली.
मोहन जोशी म्हणाले कि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत पुणेकरांना पाण्याचा प्रश्न
भेडसावला नाही कारण आम्ही पुणेकरांचे हित साधण्यासाठी पाण्याचे नियोजन केले. पालकमंत्री गिरीश
बापट यांनी मात्र ग्रामीण भागात भाजपला मते मिळतील या आशेने पुणेकरांना वेठिस धरून पुण्याच्या
पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा बट्याबोळ केला त्यामुळेच पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या
संकटाला तोंड द्यावे लागत आहे या संदंर्भात योग्य खुलासा करण्याऐवजी ‘अदखलपात्र’अशी
उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनाच पुणेकर जनता २३ मे रोजी
‘अदखलपात्र’ठरवेल असे मोहन जोशी यांनी म्हंटले तसेच पुण्याचा पाणीप्रश्नासह, नागरीप्रश्न आणि
विकास प्रकल्प यासंदंर्भात आपण पुण्याचे मालकमंत्री म्हणून नाही तर पालकमंत्री म्हणून पुणेकरांच्या
हितासाठी काम करायला हवे होते अशी टीका ही मोहन जोशी यांनी केली.

डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘ नेल्सन मंडेला शिक्षारत्न सन्मान’

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रात (ईएमएमआरसी) विभागातील डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘भारतरत्न नेल्सन मंडेला शतवार्षिकी शिक्षारत्न शिखर सन्मान’  प्राप्त झाला आहे.
 
 विवेकानंद एज्युकेशनल ,कल्चरल ,स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (पश्चिम बंगाल)कडून हा पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रातील ऑडिओ -व्हिज्युअल टिचिंग टेक्नॉलॉजी या विषयातील योगदानाबद्दल डॉ. बाळकृष्ण दामले यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. डॉ.दामले हे फुलब्राईट स्कॉलर असून लघुपट ,नाटिका ,माहितीपट माध्यमातून अद्यापनाच्या पद्धतीवर त्यांनी संशोधन केले आहे

कर्वे समाज सेवा संस्थेत समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रम

पुणे :समाजकार्याशी निगडित व्यावसायिक ,सामाजिक कौशल्ये शिकविण्याच्या हेतूने कर्वे समाज सेवा संस्थेत समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रम(एम. एस. डब्ल्यू )ची घोषणा करण्यात आली आहे .
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ . दीपक वलोकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न  असणाऱ्या या एम. एस. ड ब्ल्यू .- समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेची सुरवात कर्वे समाज सेवा संस्थे झाली आहे .
दोन वर्षांच्या या पूर्णवेळ अभ्यासक्रमात एकूण चार स्पेशलायझेशनचा समावेश आहे. कुटुंब व बाल कल्याण, मानव संसाधन व्यवस्थापन, वैद्यकिय व मानसोपचार समाजकार्य, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास याचा त्यात समावेश आहे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
 
एम.एस.डब्ल्यू . पदवीप्राप्त  विद्यार्थ्यांना शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक विविध क्षेत्रात बऱ्याच व्यावसायिक व नोकरीच्या संधी उपलब्ध असून, सामाजिक विकास, कुटुंब व बाल कल्याण संस्थामध्ये समुपदेशक, समन्वयक, मानव संसाधन व्यवस्थापनात, कामगार कल्याण किंवा कार्मिक प्रबंधक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकिय व मानोपसोचार समाजकार्य, हॉस्पिटल, सल्ला मार्गदर्शन केंद्र, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास प्रकल्प, सी.एस.आर. प्रकल्प अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन संस्था इ.ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतात,असे डॉ . दीपक वलोकर यांनी सांगितले. 
 
प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता http://karve-institute.org/admission  या वेबसाईटवर व महाविद्यालयात उपलब्ध असून, अर्ज डाऊनलोड करून महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील.
 प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि.  १९ जून, २०१ असून, प्रवेश परीक्षा दि. २  जुन,२०१रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा दि. २ जुन, २०१९ तारखेला आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ज्या विदयार्थ्यांनी २०१ मध्ये पदवी परीक्षा दिली आहे तो विद्यार्थी सुद्धा प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे . कर्वे समाज सेवा संस्था, १८, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे ४११०५२, वेबसाइट: http://karve-institute.org/admission   Email ID is – kinsspune@gmail.com, दूरध्वनी: ०२०- ७५१७५६४२१०,७५१७८३५४३१
————–
नोकरीच्या संधी :
 
 संपूर्ण भारतातून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला  जातो. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा, पूर्ण वेळ, ( CBCS) चार सेमेस्टर सहित व  चॉइस बेस क्रेडीट सिस्टमवर आधारित आहे.
 कर्वे समाज सेवा संस्था हि सर्वोत्तम दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्तम क्षेत्रकार्य प्रशिक्षणासाठी
ओळखली जाते तसेच प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हा एम.एस.डब्लू.अभ्यासक्रमाचा  अंतर्भूत घटक आहे.कर्वे समाज सेवा संस्था ही पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्था असून, नॅक  मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त आहे . संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर, यांनी दिलेल्या माहिती नुसार  पुणे विद्यापिठाच्या पदवीधराना नियमानुसार प्राधान्य दिले जाईल.

प्लास्टिक बंदीसाठी कारवाई-रिटेल व्यापारी संघाच्या वतीने महापालिकेचा निषेध

पुणे, दि. 4 मे : प्लास्टिक बंदीसाठीच्या कारवाईने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून शहरात आज महापालिकेकडून दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई बेकायदेशीर असून दंड वसूल करण्याच्या हेतुने प्रेरित होती, असा आरोप पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

शहरातील कात्रज, धनकवडी, चंदननगर, सिंहगड रस्ता परिसरातील दुकानदारांवर प्लास्टिक बंदीबाबत  कारवाई करण्यात आल्याची माहिती निवंगुणे यांनी दिली. ते म्हणाले की, प्लास्टिक पिशव्यांचा वापर किरकोळ दुकानदारांकडून कमी झाला आहे. मात्र, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून त्याचा वापर होत आहे. असे असताना महापालिकेकडून केवळ दंडाची रक्कम गोळा करण्याच्या हेतुनेच किरकोळ दुकानदारांना लक्ष्य केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर जरुर कारवाई करावी परंतु बेकायदेशीरपणे अन्यायकारक कारवाईस आमचा विरोध आहे.

बिबवेवाडीतील एका दुकानदारांवर कारवाई करताना त्याचा वजनकाटा जप्त करण्यात आला. हे कोणत्या कायद्यात बसते असा सवालही व्यापारी विचारत आहेत. संघटनेच्या पातळीवर प्लास्टिक बंदीबाबत जागृती करीत असतानाच त्याचा पूनर्वापर व त्यापासून वस्तू तयार करण्याचे काम सुरु आहे. सकारात्मक भूमिकेत किरकोळ व्यापारी व दुकानदार असताना त्यांच्यावर अशा प्रकारे चुकीची कारवाई होऊ नये हीच अपेक्षा आहे, असेही निवंगुणे म्हणाले.