Home Blog Page 270

वेदांता.. महाराष्ट्रातील १०० अंगणवाड्यांचा कायापालट करणार

पुणे-

वेदांताच्या अनिल अगरवाल फाउंडेशनने त्यांचा नंदघर प्रकल्प गडचिरोली, महाराष्ट्र येथे लाँच करण्याचे ठरवले असून त्याद्वारे ३९०० मुलांना सक्षम केले जाईल व १७०० स्त्रिया आणि मुलींना शिक्षण,पोषण, आरोग्य व कौशल्य विकासाच्या संधी दिल्या जाणार आहेत. सर्वसमावेशक ग्रामीण विकासाच्या दिशेने लक्षणीय पाऊल पुढे टाकत अनिल अगरवाल फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम – नंदघरने गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेसह
सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील १०० अंगणवाड्यांचे आधुनिक नंदघरात रुपांतर केले जाणार आहे. या भागिदारीला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मूर्त स्वरूप देत सर्वात वंचित भागात विकास करण्याची राज्याची बांधिलकी दर्शवण्यात आली.

महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम सहा वर्षाखालील ३९००
मुले व १७०० स्त्रिया आणि मुलींच्या आयुष्यावर थेट परिणाम घडवून आणेल. आधुनिक केंद्रांद्वारे
प्राथमिक शिक्षण, पोषक आहार, प्राथमिक आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास तसेच समग्र
विकासाच्या संधी पुरवल्या जातील. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील विकासाची दरी
नाविन्य आणि सर्वसमावेशक भागिदारीद्वारे सांधण्याची बांधिलकी दर्शवणारा आहे.
ठाणे येथील २५ अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यात आले असून त्याला मिळालेल्या यशाच्या
पायावर ही भागिदारी आधारित असून ती भारताच्या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस
(आयसीडीएस) आणि पोषण २.० प्रकल्पांशी सुसंगत आहे. या उपक्रमामुळे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत
विकासाच्या ध्येयांना (एसडीजी), ४ (दर्जेदार शिक्षण), २ (भुकेचे उच्चाटन) आणि ५ (लिंग समानता)
चालना मिळणार असून त्यामुळे मुले व स्त्रियांना सर्वसमावेशक प्रगतीमध्ये केंद्रस्थान मिळेल.
आधुनिक अंगणवाडी केंद्रांमध्ये आकर्षक बीएएलए (बिल्डिंग अज अ लर्निंग एड), डिझाइन्स, एलईडी
टीव्ही – ई लर्निंग, मुलांसाठी सोयीस्कर फर्निचर आणि पिण्याचे सुरक्षित पाणी, वीज व स्वच्छता अशा
वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या व्हिजनशी सुसंगत राहात महाराष्ट्र सरकार प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य व पोषण
मिळेल यासाठी प्रयत्नशील असून स्त्रियांना कौशल्यविकास, अर्थार्जनाच्या संधी आणि संपूर्ण
विकासाद्वारे सक्षम केले जात आहे. गडचिरोलीतील १०० अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यातून

सार्वजनिक- खासगी क्षेत्रात किती मजबूत भागिदारी होऊ शकते हे
दर्शवणारे आहे. अशाप्रकारचे उपक्रम महाराष्ट्रभरात राबवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

हे नंदघर दिवसभरात दोन टप्प्यात काम करतील. सकाळी मुलांचे प्राथमिक शिक्षण आणि पोषणावर
भर दिला जाईल, तर दुपारी समाजकेंद्रित उपक्रमांवर भर असेल. त्यामध्ये ६०० गरोदर स्त्रिया आणि
स्तनदा माता व १०० मुलींसाठी आरोग्य जागरूकता सत्रे, लघु उद्योग वर्कशॉप्स आणि कौशल्य
विकास यांच्यावर भर असेल. यातून त्यांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत
केली जाईल.
हिंदुस्थान झिंक लि. च्या अध्यक्ष आणि वेदांता लि.च्या नॉन- एक्झक्युटिव्ह संचालक प्रिया अगरवाल
हेब्बर नंदघरच्या विस्ताराच्या अग्रणी असून या प्रकल्पाच्या दीर्घकालीन परिणामाविषयी त्या म्हणाल्या,
‘प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला विकास करण्यासाठी योग्य संधीची गरज असते.
गडचिरोली येथे नंदघर लाँच करण्यातून आम्ही कित्येक पिढ्यांपासून अस्तित्वात असलेली दरी
सांधण्यासाठी अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. समाज कल्याणासाठी आम्ही बांधील आहोत तसेच राज्य
सरकारच्या मदतीने ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया व मुलांचे आरोग्य, पोषण व शिक्षणात सुधारणा
घडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
दीर्घकालीन परिणाम आणि शाश्वतता साध्य करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एलईडी टीव्ही व
टॅब्लेट्सद्वारे ई- लर्निंग कंटेंट दिला जाणार असून अक्रेडिटेड सोशल हेल्थ हेल्थ अक्टिव्हिस्ट्स (आशा)
आणि ऑक्सिलियरी नर्स मिडवाइव्हज (एएनएमएस) यांना प्राथमिक आरोग्यसेवांचे खास प्रशिक्षण दिले
जाईल व पर्यायाने सामाजिक आरोग्याचा निर्देशांक उंचावण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद, गडचिरोलीद्वारे पात्र अंगणवाड्या ओळखून, प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल
व अद्ययावत केंद्रांची देखभाल केली जाईल. जॉइंट वर्किंग ग्रुपद्वारे सफाईदार अमलबजावणी
होण्यासाठी देखरेख केली जाईल.
सामाजिक सक्षमता आणि सेवांचे न्याय्य वाटप यावर भर देणाऱ्या या प्रकल्पाने महाराष्ट्रातील
आदिवासी व वंचित जिल्ह्यांमध्ये चौफेर विकास घडवण्याचे ध्येय ठेवले आहे.
नंदघरने यापूर्वी १५ राज्यांत ८३०० केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे लाखो स्त्रिया व मुलींच्या
आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नुकतेच राजस्थान
सरकारसह भागिदारीचे नूतनीकरण करण्यात आले व त्याअंतर्गत २५,००० केंद्रांची राज्यभरात स्थापन
केली जाणार आहे. निरोगी, सुशिक्षित व स्वयंपूर्ण भारत घडवण्याच्या नंदर घराच्या प्रवासात
गडचिरोली येथील लाँच हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी: हर्षवर्धन सपकाळ

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा.

मुंबई, दि. ९ जून २००२५
ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहे पण या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.

मुंबई परिसरात लोकल हीच लाईफलाईन आहे, दररोज जवळपास ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात पण हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का याची चिंता सारखी सतावत असते. लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात, कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो किंवा कायमचा जायबंदी होतो. लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा यासाठी सातत्याने चर्चा होते, बैठका होतात पण पुन्हा ‘पहिले पाढे ५५’ अशी अवस्था आहे. एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते पण कृती शून्य असते. रेल्वे प्रशासन हे मुर्दाड आहे, सुस्तावलेला अजगर आहे. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे पण रेल्वे प्रशासन व सरकार यांची कुंभकर्णी झोप काही जात नाही. भाजपा सरकारला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे, मुंबईकरांना बुलेट ट्रने नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे. पण रेल्वे प्रशासन व सरकार सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे आता हा खेळ थांबवा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा साहित्य वाटप व जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न”

“ना. चंद्रकांतदादा पाटील हे एक संवेदनशील नेतृत्व” – संदीप खर्डेकर.

“रोलबॉल ह्या पुण्यात जन्मलेल्या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत” – श्री. बद्री मूर्ती.

पुणे-नामदार चंद्रकांतदादा पाटील हे एक अत्यन्त संवेदनशील नेतृत्व असून त्यांचे राहणीमान, त्यांचे सार्वजनिक वर्तन, त्यांचे समाजाप्रतीचे दातृत्व हे सगळेच राजकारणात दुर्मिळ असून चंद्रकांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना होणारा आनंद अवर्णनीय आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. “दादा” तुम्ही शतायुषी व्हा, तुम्हाला आरोग्यसंपन्नता लाभो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर “असेच रहा दादा”, सामान्य नागरिकांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
तर मा. चंद्रकांतदादा नसते तर पुण्यात रोलबॉल च्या विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले नसते असे भावपूर्ण उद्गार ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी काढले.
ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोलबॉल असोसिएशन च्या वतीने जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांना क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली ह्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी परांजपे विद्यामंदिर, महेश विद्यालय, कोथरूड सिटी इंटरनॅशनल स्कूल, न्यू इंडिया स्कूल, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल निगडी, टाटा मोटर्स स्कूल, पीसीएमसी सेंट उर्सुला स्कूल, पिंपरी चिंचवड फिटनेस फायटर अकॅडमी,ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल,एवरेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, अशा विविध शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप प्रमुख अतिथी श्री बी.जी मूर्ती सर, असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर,रोलबॉल या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, भाजपा आय टी प्रकोष्ठ च्या सौ. कल्याणी खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांना संबोधित केले व ह्या खेळाच्या वाढीसाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सर्वांतोपरी मदत करेन असेही ते म्हणाले.माझा वाढदिवस अश्या अगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांनी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
रोलबॉल ह्या खेळासाठी सर्वप्रथम मैदान मी बाल शिक्षण मंदिर येथे उपलब्ध करून दिले आणि आता हा खेळ जगभर लोकप्रिय होत आहे असे प्रमुख अतिथी श्री. बद्री मूर्ती म्हणाले. या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत अश्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.
यावेळी क्रीडा प्रशिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 वर्षा खालील जिल्हा स्तरिय रोलबॉल स्पर्धा पुणे जिल्हा रोलबॉल संघटने मार्फत घेण्यात आल्या. या स्पर्धेत 17 वर्षाखालील ज्युनिअर गटातील 18 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुलांचे दहा तर मुलींचे आठ संघ सहभागी होते.
पहिला जूनियर वर्ल्ड कप केनिया येथे होणार असून त्याचे प्रशिक्षण बालेवाडी येथे सुरू आहे.देश भरातील विविध राज्यातील खेळाडू या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी आहेत,त्या खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये जम्मू कश्मीर, आसाम,उत्तर प्रदेश, दिल्ली महाराष्ट्र,मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, केरळ,अशा विविध राज्यातील खेळाडू या संघांमध्ये एकत्रित होऊन त्यांचे संघ तयार केले होते ते संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.


स्पर्धेचे निकाल…
मुलांच्या गटात
1 इंडिया ईस्ट हा संघ प्रथम

  1. इंडिया वेस्ट हा संघ द्वितीय 3. महेश विद्यालय कोथरूड तृतीय.

मुलींच्या गटात

  1. इंडिया ईस्ट प्रथम
  2. इंडिया वेस्ट द्वितीय
  3. महेश विद्यालय तृतीय.

ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब भोरे,प्रमोद काळे, रफिक इनामदार,प्रभाकर वडवेराव, निलेश शिंदे, जयप्रकाश सिंग इ.यांनी मोलाची कामगिरी बजावली.

रुबी हाॅलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची होस्टेल मध्ये आत्महत्या

पुणे-गुजरातच्या भावनगर येथील डाॅ.श्याम व्हाेरा (वय- २५) हा तरुण पुण्यातील नामांकित रुबी हाॅल क्लिनिक रुग्णालयात रेडियाेलाॅजिस्ट म्हणून शिक्षण घेण्यास आला हाेता. परंतु कामाच्या अतिताणामुळे त्याने रुबी रुग्णालयापासून जवळच असलेल्या ढाेले पाटील चाैकातील दामाेदर भवन या वसतिगृहातील आपल्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. रुग्णालयातील कामाच्या अतिताणामुळे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत पाेलिसांनी डाॅ. श्याम व्हाेरा याच्या कुटुंबियास माहिती दिली. पीडित कुटुंब गुजरात मधील भावनगर येथून साेमवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंत पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. पोलिसांच्या माहितीनुसार, डाॅ.शाम व्हाेरा हा रुबी रुग्णालयात निवासी डाॅक्टर म्हणून काम करत हाेता. रुबी रुग्णालयाचे वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात ताे अन्य एका डाॅक्टर साेबत राहत हाेता. रविवारी रात्री ताे रुममध्ये एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पाेलिसांना प्राप्त झाली आहे. त्यात कागदावर त्याने आपल्या माेबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला होता. मृताने कुणावरही आरोप केले नसल्यामुळे त्याच्या आत्महत्या मागील गूढ वाढले आहे. दरम्यान, याप्रकरणी काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. मयत डॉक्टरयाच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणती अद्याप तक्रार पोलिसांकडे दाखल केली नाही. काेरेगाव पार्क पाेलिस पुढील चाैकशी करत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे.

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर संताप:म्हणाले – बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळत आहेत,त्यामुळेच रेल्वे सेवा कोलमडली

0

मेट्रो व मोनो रेलमुळे प्रश्न सुटणार नाही,रेल्वेचा अन् ट्रॅफिकचा बोजवारा उडाला
पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेसाठी परप्रांतीयांना जबाबदार धरले आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. बाहेरून येणआरे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वेचा व ट्रॅफिक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. मेट्रो व मोनो रेलमुळे हा प्रश्न सुटणार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार व इतर गोष्टींमध्येच गुंतले आहेत, असे ते म्हणालेत.

राज ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई रेल्वे दुर्घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ही रेल्वे चालतेच कशी? हेच एक आश्चर्यच आहे. मुंबईतील लोकांनी अनेकदा या प्रकरणी एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. पण त्यावर काहीही होत नाही.

ते पुढे म्हणाले, आपल्या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. कुठेही रस्ते नाहीत. पण रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्वत्र उंचउंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ट्रॅफिक अडली जाते. कुठे आगली लागली तर फायर ब्रिगेडचा बंबही तिकडे जाऊ शकत नाही अशी आपल्या शहरांची अवस्था झाली आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडे नाही. मी गेली अनेक वर्षांपासून सांगत आहे की, बाहेरून येणारे जे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत, त्यामुळेच ही रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. सगळ्या ट्रॅफिकचा बोजवारा उडाला आहे.

लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय याची माहिती नाही. मेट्रो व मोनो रेलेमुळे प्रश्न सुटणार नाही. मुंबईत मोनो रेल आहे, मेट्रो आहे, मग गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबले का? टू व्हिलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबले का? नाही थांबले. म्हणजे त्या गाड्या येतच आहेत. मग ही नक्की मेट्रो व मोनो रेल कोण वापरत आहे? कोण काय करतंय? कुणीही पाहायला तयार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार आणि इतर गोष्टींतच गुंतले आहेत. शहरे म्हणून याकडे पाहण्यास कुणीही तयार नाही आणि शहरांवर बोलणाऱ्यांना माध्यमांमध्ये किंमत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांवरही आगपाखड केली. ते म्हणाले, मागील काही दिवसांत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या, तेवढा काळ तुम्ही आज रेल्वे अपघातात जे बळी गेले त्यांच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचे हेच कुणाला समजत नाही. शहरी भागातील पत्रकारांनी शहरांतल्या प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारचे या गोष्टींकडे कसे लक्ष जाईल? यावर लक्ष द्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार किरकोळ आहेत.

असे अपघात घडणे दुर्देवी बाब आहे. केंद्र सरकारने यावर लक्ष दिले पाहिजे. तातडीने लक्ष दिले पाहिजे. रेल्वे फलाटावरील गर्दी पाहिली तर प्रवाशी कसे आत जातात व कसे बाहेर येतात याची कल्पना करवत नाही. रेल्वेने मी स्वतः प्रवास केला आहे. कॉलेजला असताना मी हार्बर लाईनवरून प्रवास केला. त्यामुळे रेल्वेचा प्रवास काय असतो? हे मला माहिती आहे. त्यावेळी गर्दी कमी असायची. पण आता गर्दी तुडुंब वाढली आहे. सायंकाळच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्म व रेल्वेत तुम्ही शिरून दाखवा. विलक्षण आहे सगळे. रेल्वे मंत्री काय करत आहात? रेल्वेने राजीनामा देण्यापेक्षा स्थिती सुधारण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले.राज ठाकरे यांनी यावेळी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयावरही टीका केली. लोकलला दरवाजे बसवले तर आतमधील लोक गुदमरून मरतील, असे ते म्हणाले. किती गर्दी असते कल्पना आहे का तुम्हाला. एक जागा आत जाण्यासाठी असावी, दुसरी जागा बाहेर येण्यासाठी असावी. पण काहीही नाही. जिथून आत जातात, तिथूनच बाहेर पडतात. प्रवाशांना आपल्या स्टेशनवर उतरताही येत नाही. आपल्याकडे माणसाची किंमतच नाही. हीच गोष्ट इतर देशात घडली असती तर तेथील सरकार अशा घटनांकडे फार गांभिर्याने पाहतात. आपले मंत्री जे परदेश दौऱ्यावर जातात ते तिकडून काय पाहून येतात. तुम्ही तिकडच्या रेल्वे आणू नका, किमान त्यांचे विचार तरी आणा. तेही आणत नाहीत. हे अतिशय निराशाजनक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोग मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट:निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? – राऊत


मुंबई:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. खरा पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. सद्यस्थितीत हा पोपट जिवंत आहे की मेला? हे ही सांगण्याची कुणाची हिंमत होत नाही, असे ते म्हणाले.राहुल गांधी यांनी शनिवारी एका संपादकीय लेखाद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावत त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे या घटनाक्रमावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? असा कळीचा प्रश्न उपस्थित केला.

भाजपला EC च्या चेहऱ्यावरील धूळ पुसण्याचा ठेका मिळाला का?

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची भूमिका उर्दुला विरोध करण्याची आहे. योगी आदित्यनाथ किंवा त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी उर्दुला विरोध केला. पण फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीला आधार घेतला. ही जुनी शायरी आहे. ती शाळेतील मुलेही वापरतात. मूळ मुद्दा बाजूलाच राहत आहे. तुम्ही निवडणुकीच्या चेहऱ्यावरील धूळ का पुसत आहात? ही धूळ स्वतः आयोगाने पुसली पाहिजे. त्यांना आयोगाच्या चेहऱ्यावर जी काही धूळ बसली आहे किंवा सर्व राष्ट्रीय पक्ष व जगभरातून जी चिखलफेक होत आहे ती साफ करण्याचा ठेका मिळाला आहे का?

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत. भाजपला नाही. उत्तर राजीव कुमारांपासून ज्ञानेशकुमारांपर्यंतच्या लोकांनी द्यायचे आहे. हे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते नाहीत. गेल्या 10 वर्षांत आयोगाने जे कांड केलेत, ते मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यापासून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हयातीत अजित पवारांना देण्याचे काम हे अमित शहांच्या दबावाखाली झाले. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याचे सुद्धा आयोगाला उत्तर द्यावे लागतील. फडणवीस यांची उत्तरे केवळ थातूरमातूर आहेत. छाछुगिरी आहेत. तुम्ही आयोगाची अथॉरिटी नाहीत.

EC मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट

ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत निवडणूक आयोग मोदी- शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. आयोग हा अकबर बादशहाचा पोपट झाला आहे. तो जिवंत आहे की मेला? हे सांगण्याचीही कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात याला उत्तर द्या, त्याला उत्तर द्या असे जे प्रकार सुरू आहेत, ती सर्व ढोंग व सोंग आहेत. राज्याच्या व केंद्राच्या निवडणूक आयोगाने आपला आत्मा विकला आहे. आयोग भाजपची एक शाखा म्हणून काम करत आहे हे आता लपून राहिले नाही. आम्ही भाजप व सरकारवर आरोप केला तर राजीवकुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर देतात.

निवडणूक आयोग हे एक घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपणे या देशातील निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी – शहा सांगतील त्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नसतात. हे फडणवीस यांनी लक्षात घेतले पाहिजे. फडणवीस वकील असतील, पण कायद्याचा अभ्यास त्यांच्यापेक्षा जास्त आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू:जखमी आणि मृतांच्या आकडेवारी बाबतही प्रशासन अनभिज्ञ

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याला लटकलेले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेत किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला? या बाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
जखमी

  1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.) 5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.) 6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत) 9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा : डॉ. श्रीपाल सबनीस

वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सव उत्साहात

पुणे : मराठी कवी, साहित्यिक हे प्रेम, अलिंगन, चुंबन, शेती-माती, नाती-गोती यांच्यातच अडकून पडले आहेत. कवीने महाराष्ट्राच नव्हे तर देशाचा नकाशा ओलांडून विश्वात्मकता अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावेत. साहित्यात वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध, जागतिक प्रश्न अशा विषयांवर भाष्य करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा, असेही त्यांनी सूचित केले.
ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी आयोजित केलेल्या वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सवाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा डॉ. सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पन्नासहून अधिक कवींनी कविता सादर केल्या. कवी आणि साहित्यिकांचा या वेळी पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, सागर मिटकरी, सूर्यकांत तिवडे, प्रकाश देशमुख, कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र भणगे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, सांस्कृतिक लोकशाही बळकट झाल्यास राजकारणी लोकशाही बळकट होईल. या कविसंमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संस्था द्वेष भावनेशिवाय कार्यरत आहेत असे जाणवते. ही सांस्कृतिक एकात्मकता राजकीय नेत्यांनीही शिकावी. जाती-पातीच्या भिंती ओलांडून निधर्मी, संविधान संस्कृती निर्माण व्हावी. आजच्या काळात नव्या हिटलरांची उपज थांबविणे गरजेचे आहे. विश्वात शांतता नांदावी या करिता साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बबन पोतदार म्हणाले, साहित्यिकाच्या हातून साहित्यकृती कशी निर्माण होते याची अनुभूती या काव्य संमेलनातून आली. कवींच्या सान्निध्यात खूप आनंद होत आहे. प्रकाश देशमुख, सुर्यकांत तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात चंद्रकांत जोगदंड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

आगग्रस्त भागाची केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

पुणे-‘वनाज सोसायटी’मध्ये आगीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल केली आणि तेथील आग ग्रस्त नागरिकाच्या समस्या जाणून घेतल्या

कोथरुड परिसरातील वनाझ सोसायटी येथे दोन दिवसांपूर्वी मीटर रूमला आग लागून त्या आगीची झळ इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. या दुर्दैवी घटनेत नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण मीटर जळाल्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हानी टळली असून आज या सर्व परिसराची पाहणी करत नागरिकांनी आधार देण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केला.

या परिसरात डी-बिल्डिंगमधील संपूर्ण मीटर जळून खाक झाले होते. त्याचबरोबर मीटर रूमपासून नागरिकांच्या घरापर्यंत गेलेल्या सर्व वाहिन्या देखील जळून खाक झाल्या होत्या. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावरील सदनिका धारकांना याची सर्वात जास्त झळ पोचली.

यावेळी महावितरण आणि अग्निशामक दलाचे अधिकारीही उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांना यावेळी तातडीने नवीन मीटर बसवून देण्याच्या सूचना मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या असून नवीन ट्रान्सफार्मर मोकळ्या जागेच बसविण्यासंदर्भाच सूचित केले. तसेच पुन्हा असा प्रकार घडू नये तसेच तातडीने उपाययोजना कराव्यात, याबाबतची सूचना केल्या.

आजपासून 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी

आणखी 7 देशांवर अंशतः बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी घातली बंदी
वाशिंग्टन-
अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावरील बंदी आजपासून लागू होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जून रोजी याबाबतचा आदेश जारी केला होता, जो आज, ९ जूनपासून लागू होईल.१२ देशांव्यतिरिक्त, आजपासून ७ देशांच्या नागरिकांवर अंशतः बंदी घालण्यात येणार आहे. ही स्थलांतर आणि नॉन-इमिग्रेशन व्हिसाला लागू असेल.

ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयामागे अमेरिकन लोकांच्या जीविताची सुरक्षा आणि संरक्षणाचा उल्लेख केला होता. ट्रम्प यांनी ४ जून रोजी म्हटले होते-दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या किंवा इमिग्रेशन कायद्यांचा गैरवापर करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून अमेरिकेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते, संपूर्ण बंदी म्हणजे त्या देशातील बहुतेक नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामध्ये पर्यटक व्हिसा, विद्यार्थी व्हिसा, कामाचा व्हिसा आणि स्थलांतरित व्हिसा शोधणारे लोक समाविष्ट आहेत.त्याच वेळी, आंशिक बंदी म्हणजे त्या देशातील नागरिकांसाठी विशिष्ट प्रकारचे व्हिसा किंवा प्रवेश प्रतिबंधित आहेत, परंतु इतरांसाठी नाही.म्हणजे तुम्हाला इमिग्रंट व्हिसा मिळणार नाही, पण तुम्हाला टुरिस्ट व्हिसा मिळू शकेल. विद्यार्थ्यांना परवानगी मिळेल, पण वर्क व्हिसा बंदी असेल.

४ जून रोजी ट्रम्प यांनी इतर देशांच्या नागरिकांना व्हिसा देताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, व्हिसा देताना असे लोक अमेरिकेत येऊ नयेत जे अमेरिकन लोकांना किंवा देशाच्या हिताला हानी पोहोचवू शकतात याची काळजी घेतली पाहिजे.

ट्रम्प म्हणाले…इमिग्रेशन व्हिसावर येणारे लोक कायमचे रहिवासी बनतात, म्हणून त्यांची चौकशी अधिक महत्त्वाची आणि कठीण असते. सुरक्षेचा धोका असला तरीही या लोकांना बाहेर काढणे कठीण असते. दुसरीकडे, नॉन-इमिग्रेशन व्हिसावर येणाऱ्या लोकांची चौकशी कमी होते. म्हणून, ज्या देशांची ओळख आणि माहिती सामायिकरणाशी संबंधित व्यवस्था चांगली नाही अशा देशांमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घालणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये प्रवास बंदी लागू केली, ज्याला मुस्लिम बंदी म्हणून संबोधले जाते, ज्यामध्ये बहुतेक मुस्लिम बहुल देशांचा समावेश होता.जानेवारी २०१७ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, सुरुवातीच्या बंदीमध्ये ज्या सात देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती त्यात इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांचा समावेश होता.नंतर त्यात बदल करण्यात आले. प्रथम इराकला या यादीतून काढून टाकण्यात आले. नंतर सुदानला काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी चाडला जोडण्यात आले. नंतर उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला सारख्या गैर-मुस्लिम देशांचाही समावेश करण्यात आला, जेणेकरून त्याला धार्मिक भेदभाव म्हणता येणार नाही.
ट्रम्प म्हणाले- दहशतवाद थांबवण्यासाठी निर्बंध आवश्यक आहेत-ट्रम्प यांनी दहशतवाद थांबवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परदेशी सरकारांकडून सहकार्य मिळवता यावे, इमिग्रेशन कायदे लागू करता यावेत आणि राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि दहशतवादविरोधी काम पुढे नेता यावे यासाठीही हे निर्बंध आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या आदेशात असे म्हटले आहे की अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी गटाचे नियंत्रण आहे आणि पासपोर्ट किंवा नागरी कागदपत्रे जारी करण्यासाठी कोणतेही सक्षम किंवा समर्थक सरकार नाही. तसेच, तेथे योग्य पडताळणी पद्धती नाहीत.आदेशानुसार, म्यानमारवरील बंदी घालण्याचे कारण म्हणजे तेथील लोक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहतात.अहवालानुसार, म्यानमारमधून B1/B2 व्हिसावर येणारे 27.07% लोक आणि F, M, J व्हिसावर येणारे 42.17% लोक मुदतवाढीपूर्वी वास्तव्य करून राहिले. याशिवाय, म्यानमारने अमेरिकेतून हद्दपार केलेल्या नागरिकांना परत घेण्यास सहकार्य केलेले नाही.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कृतीवर महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे आक्षेप

बासी ईदला सारसबाग खासदार मेधा कुलकर्णींच्या आदेशाने महापालिकेने ठेवली बंद

सारसबागेत मांसाहार चालणार नाही – हिदुत्ववादी संघटनांची भूमिका

पुणे- पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्या नंतर आता भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कट्टर हिंदूत्ववादी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत . मेधा कुलकर्णी यांनी मध्यंतरी एका मशिदीतील आवाजा विरोधात उठविलेला आवाज , नंतर हडपसरच्या आमदाराने मंगळवार पेठेत एका मुस्लीम प्रर्थानास्थळातील अतिक्रमणाविषयी केलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर आता अशा घटनेत बासी ईद ला सारस बाग बंद ठेवण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. हिंदुत्ववादी संघटनानी सारस बागेत मांसाहार चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

पुण्याच्या राज्यसभा सदस्य असलेल्या खासदार यांनी दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने रविवारी सारस बाग बंद ठेवल्याने महाराष्ट्र मुलीम कॉन्फरन्स ने थेट महापालिका आयुक्त यांना मुस्लीम विरोधी ठरवून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात मुलीम कॉन्फरन्स चे हाजी फरीद खान आणि हाजी जुबेर मेमन यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे …

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हटाव मोहीम
बासी ईद निमित्त पुणे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने कुटुंबासमवेत सारसबागेत येत असतात दिवसभर खेळीमेच्या आणि हास्य विनोदाने वेळ घालवत असतात गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा कायम चालू होती मात्र आजच्या बासी ईदला सारसबागेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते परिणामी मुस्लिम बांधवांना सारसबागेत जाता आले नाही त्यामुळे मुस्लिम बांधवात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती प्रथमच अशा प्रकारचा अनुभव मुस्लिम बांधवांना आला पण सारसबाग बंद का आहे याबाबत नागरिकांना सकाळी समजू शकले नाही याबाबत महापालिकेशी संपर्क केला असता राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे समजले आहे आयुक्तांनी त्या पत्राच्या आधारे आज दिनांक 8 जून रोजी सारसबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती आजच्या दिवशी मुस्लिमच बांधवच नाही तर इतर समाजातील नागरिक ही सारसबागेत येत असतात त्यांचीही गैरसोय झाली होती नव नियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बासी ईदला जाणून बुजून सारसबाग बंद ठेवून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत अशा जातीवादी महापालिका आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फेरन्सच्या वतीने घेण्यात आली असून उद्या सकाळी सोमवार दिनांक नऊ रोजी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ आयुक्तांना हटवण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे
.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या सारस बाग लक्षवेधी हिंदूंचे श्रद्धास्थान मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते

दरम्यान या संदर्भात भाजपच्या नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठाम भूमिका घेत महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याने सारस बाग बंद ठेवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नेमके या पत्रात काय म्हटले होते ते जसेच्या तसे त्यांच्याच शब्दात …

मा. महापालिका आयुक्त, पुणे, मनपा पुणे.
विषय: सारसबागेमध्ये दिनांक 8 जून या दिवशी बाशी ईद साजरी करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. त्याविरुद्ध हिंदू संघटनांनी केलेल्या तक्रारी संदर्भात.
महोदय,
सारसबागेमध्ये श्री सि‌द्धिविनायकाचे पेशवेकालीन मंदिर असून हे लक्षावधी हिंदूंचे श्र‌द्धास्थान आहे. या मंदिराभोवती एक उ‌द्यान आहे. त्या उ‌द्यानामध्ये बकरीईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येत उपस्थित राहतो आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून त्या ठिकाणी मांसाहारी भोजन करण्यासाठी डबे आणले जातात या गोष्टीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे विविध हिंदू संघटना आक्रमक झाले असून त्यांनी 8 जूनला सारसबागेमध्ये सामाजिक एकत्रीकरणाचा उपक्रम करण्याचेही ठरवले आहे. यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हिंदू समाजाच्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे दिसते कारण अनेक मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते आहे. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही.
त्यामुळे दिनांक 8 जून या दिवशी सारसबाग उ‌द्यान बंद ठेऊन फक्त मंदिरात भाविकांना जाण्याची मुभा राहिली तर संभाव्य अनुचित प्रकार टळून सार्वजनिक शांततेचे यथायोग्य पालन होईल तरी याबाबत तातडीने आदेश द्यावेत.
या दिवशी हिंदू भाविकांसाठी मात्र मंदिर खुले राहणे अत्यावश्यक आहे याची नोंद घ्यावी.
धन्यवाद.
प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी,
खासदार राज्यसभा.
मोबाइल क्रमांक 9422037306

‘देशातील वास्तव जनाधाराची’ बूज राखून फडणवीसांनी भाष्य करावे..!

देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी, जनतेने काँग्रेस ला ५२ वरून १०२ जागा दिल्या..!
आयोगाच्या प्रश्नांमध्ये’ आगंतुकपणे ढवळाढवळ करण्याची माकड चेष्टा करण्याचे कारण काय..?
काँग्रेस चे सवाल..?
पुणे दि ८ जुन –
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी निवडून आयोगा समोर (सर्व संदर्भा सह) वृत्तपत्रे माध्यमातुन उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर “भाजप’चा कोणताही संविधानीक अधिकार पोहोचत नसतांना”, मुख्यमंत्री फडणवीसां सह भाजप नेते विसंगत राजकीय विधाने व आरोप करण्याची माकडचेष्टा का करताहेत असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
वास्तविक “निवडणूक आयोगाच्या कार्य व कर्तव्यपुर्तीवर” प्रश्न विचारले असतांना, अचानक वावटळ उठल्या प्रमाणेच, ‘निवडणूक आयोगास पाठीशी घालण्याचे, भाजप नेत्यांचे प्रयत्नच मुळात संशयावर शिक्कामोर्तब करणारे’ असुन, भाजप नेत्यांचे हे प्रकार असंविधानीक व निंदनीय प्रयत्न असल्याचे प्रतिपादन काँग्रेस’चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
आपल्या प्रसिद्धी निवेदनात ते पुढे म्हणाले की,
२०१९ च्या तुलनेत, २०२४ निवडणुकीत, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेने १००% शिक्कामोर्तब करून काँग्रेसला ५२ वरून १०२ जागा बहाल केल्या व देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी जनतेने काँग्रेस’ला अधिक मजबूत केले.
याच जबाबदारीच्या जाणीवेतुन, लोकशाहीच्या जपणुकीसाठी मविआ आघाडीच्या वतीने, विरोधी पक्ष नेते मा राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकी संदर्भात गंभीर मुद्दे सर्व प्रथम संसदेत उपस्थित केले. त्या नंतर मविआ नेत्यांचे सोबत पत्रकार परिषदेत ही ते उपस्थित केले. अ भा काँग्रेस’च्या जेष्ठ नेत्यांनी देखील “केंद्रीय निवडणूक आयोगाकडे” लेखी तक्रारी केल्या, राज्यातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री इ नी पत्रकार परीषदेत देखील वेळोवेळी उपस्थित केले. राज्यातील जाहीर नोंदणीकृत मतदार (सज्ञान लोकसंख्या) संख्ये पेक्षा झालेले मतदान जास्त कसे (?) व इतर अनेक गंभीर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक काँग्रेस व मविआ उमेदवारांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे.
या सर्व पार्श्व भुमिवर.. कुठेही सत्य व वास्तवतेला दाद दिली जात नाही हे पाहून राहुलजी गांधींनी वृत्त माध्यमातुन हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा संविधानीक कर्तव्यपुर्तीचा भाग आहे.
मात्र सदर च्या लेखात राहुल गांधींनी कुठेही सत्तापक्षाला विचारणा केली नसतांना मात्र विनाकारण निवडणूक आयोगा ऐवजी लक्ष भरकटण्याचे निंदनीय प्रकार भाजप नेते करत असल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे..!

राज्यात पुणे जिल्ह्यात प्रथमच पहिल्या ‘महसूल लोक अदालत’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन

पुणे दि. ८: महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्यांची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात उद्या सोमवार ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. या महसूल लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या ११ हजार ५८९ पैकी आतापर्यंत ६६६ प्रकरणात तडजोड झाली असून उर्वरित १० हजार ९२३ प्रकरणात तडजोडीसाठी ९ जून रोजी ठेवली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे.

महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यानंतर जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा प्रतिदावे दाखल करतात. विशेषतः जमिनींशी संबंधित प्रलंबीत दाव्यांमध्ये महसुली दाव्यांचे प्रमाण मोठे असून वारंवार महसुली दावे दाखल झाल्यामुळे वर्षानुवर्षे महसुली दावे चालू राहतात. ते निकाली काढण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन सर्व मंडळ , तहसील व प्रांत कार्यालयात एकाच वेळी करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुउद्देशीय सभागृह पाचवा मजला जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे .

ही महसूल लोक अदालत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. लोक अदालतीमध्ये मंडळ अधिकारी स्तरावर १ हजार २०१ प्रकरणे, तहसीलदार स्तरावर ५ हजार ४४३, उपविभागीय अधिकारी स्तरावर ३७६८ तर अपर जिल्हाधिकारी स्तरावर १ हजार १७७ प्रकरणे ठेवण्यात आली असून आतापर्यंत या चार स्तरावर अनुक्रमे १०७ प्रकरणे, ३४५, १७३ आणि ५१ प्रकरणामध्ये तडजोड झाली आहे. उर्वरित प्रकरणे उद्याच्या लोक अदालतीमध्ये मांडण्यात येणार आहेत.

विधी सेवा प्राधिकरण कायदा-१९८७ अन्वये स्थापन झालेली लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. ज्यामध्ये मुख्यतः दिवाणी दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीने मोठ्या संख्येने दावे निकाली काढले जातात. दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होऊन सदर महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढणेत यावेत, याबाबतची सर्व संबंधित पक्षकारांना महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून संधी देण्यात येणार आहे.

दीर्घकाळ चालणाऱ्या महसुली दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने काही प्रमाणात अर्धन्यायिक यंत्रणेवर पडणारा ताण कमी होऊन पक्षकारांनाही समाधान मिळू शकेल. दाव्यांचा कमी कालावधीत व सहमतीने निकाल प्राप्त झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होईल. या प्रकारच्या दाव्यांमध्ये फी ची आवश्यकता नसल्याने पक्षकारांवरील आर्थिक भार सुद्धा कमी होईल व सामंजस्यावर आधारित यंत्रणा असल्यामुळे न्याय मिळविणे तुलनेने सहज व सुलभ होणार आहे, अशी माहितीही श्री. मापारी यांनी दिली आहे.

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड,महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक

राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे.

चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.१४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे,विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामभाऊ नातू, आनंदा बारवकर, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर,कैलास शेलार,डॉ.अशोकराव जाधव, सौ .रेश्मा जाधव आदी उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, संभाजी बिर्गेडचे प्रवक्ते संतोष शिंदे,भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक दौंड तालुकाध्यक्ष सागर फडके,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर, तानाजी केकाण, आनंद थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका अध्यक्ष नितिन दोरगे, केशवराव जेधे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण यांची दूरदर्शन आणि चित्रपट या माध्यमातून त्यांची गीते सर्वदूर लोकांपर्यंत पोहचलेली आहे. संगीतकार राम कदम,गजानन वाटावे,चंद्रशेखर गाडगीळ,अच्युत ठाकूर,रोशन सातारकर,भीमराव पांचाळे आदी संगीतकारांनी त्यांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात कविता आलेल्या आहेत. पुणे विद्यापीठात ते बहिशाल व्याख्याते आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, मृत्युंजय स्मृती पुरस्कार,भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रेष्ठता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रेमशाळा कविता दर्शन या त्यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. पृथ्वीराज प्रकाशन ही संस्था गेली ४० ते वर्ष ते पाहत आहेत, त्यांची ‘धर्मशाळा’ ,’वाहवा’, ‘दुनिया’ आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

स्मार्ट पुण्यातील हिंजवडी आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा भाजपसाठी लाजीरवाणी-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पहिल्याच पावसात आय.टी पार्क असलेल्या हिंजवडी येथे रस्ते जलमय होऊन उडालेली दैना महाराष्ट्रातील भाजप सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

आय.टी पार्क क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, यासाठी प्राधान्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात संपूर्णपणे कुचराई होत आहे. या कारणारे अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. आय.टी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना पुण्यात वास्तव्य करणे अवघड झाले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी बाहेरून आणावे लागत आहे, अशा तक्रारी ऐकू येतात. महायुती सरकारचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेजण आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोरोना साथीच्या काळात २१साली पुणे शहरात दहा दिवसांसाठी दुसऱ्यांदा निर्बंध लागू केले होते. तेव्हा विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. तिथे दुसरा उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना साफ अपयश आले. औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय झाली. प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. परंतु, भाजप सरकारला त्याची फिकीर वाटली नाही. शिवाजीनगर -हिंजवडी मेट्रोचे काम संथ गतीने चालू आहे. प्रत्यक्ष कामाऐवजी भूमीपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उदघाटने करणे यातच भाजपचे नेते रमले आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांनी आखले. त्यातूनच हैदराबाद, पुणे बंगळूर येथे आय.टी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत याकरीता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्य मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी अथक प्रयत्न केले. पुणे महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना आय.टी क्षेत्राला वाव देण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्या होत्या. २०१४ साल नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप चे सरकार आल्यावर पुण्यातील आय.टी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.