Home Blog Page 2395

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुलुंड येथील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

0

मुंबई, दि. १८ : लॉकडाऊनच्या काळात जनसामान्यांची विविध प्रकारे निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलुंड उपनगरातील 28 कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

श्री. चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा व सचिव दिपेश वोरा यावेळी उपस्थित होते.

सेवा करण्याची भावना मनात उद्भवणे फार महत्त्वाचे असते. भाव तेथे देव असतो. संपत्ती पेक्षा श्रद्धा, समर्पण व त्याग मोठा आहे. कोरोना कालावधीत कोरोना योद्ध्यांसोबतच स्वयंसेवी संस्थांनी चांगले काम केले. कोरोना योद्ध्यांनी यापुढेही समाजकार्य सुरूच ठेवावे तसेच आपल्या कार्यातून इतरांना समाजसेवेसाठी प्रवृत्त करावे. कोरोनाचा मुकाबला निर्भयतेने परंतु पुरेशी काळजी घेऊन केला पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी जयेश गणात्रा, राहुल जोशी, मयुर धुल्ला, अमिता शहा, जितुभाई महेता, किरण ठक्कर, माया कोठारी, रमेश मेहता, डॉ. हेमंत वेखंडे, डॉ. सरिता भिंगे, नंदकुमार वैती, डॉ. विदिशा तायडे, सचिन नेहरे, कौशिक ठक्कर, निपम  भट्ट, चेतना त्रिवेदी, एल्विस कुंदर, रवि  नाईक, भावना शहा, दर्शना राठोड, कपिला कोठारी, तेजल बाखाई, दिपिका घाग, प्रकाश मोटे, दिपक सचदेवा, नारायण मेघारे, अनुप थारवानी आणि पियुष वोरा यांचा सत्कार करण्यात आला.

लॉकडाऊन काळातील वीजबिल कमी करण्याचा आयोगाचा आदेश

0

कोरोना महामारीला रोखण्यासाठी उद्योग व्यवसाय, बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. जनकर्फ्यू लागू केला होता. या काळातील वीज बिल कमी करण्यासाठी सीएमआयए औरंगाबाद तर्फे आयोगाकडे जून 2020 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेतली घेऊन आयोगाने आदेश दिले आहेत.

कोविड-19 च्या प्रकोपानंतर देशात 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता . महाराष्ट्रातील औद्योगिक कारखाने व व्यावसायिक संस्था पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. मे 2020 मध्ये शासनाने अनेक बंधने लावत कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली. या दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने 30 मार्च 2020 रोजी बहुवर्षीय वीज दर लागू करण्याबाबतचे आदेश काढले व हे नवीन दर एक एप्रिल 2020 पासून लागू होतील असे जाहीर केले होते .

वीज नियामक आयोगाने पारीत केलेल्या आदेशात 1 एप्रिल 2020 पासून उच्चदाब वीज ग्राहकांना kwh ऐवजी kvah वर आधारीत वीज आकारणी करण्याचे आदेश दिले होते. या बदलानुसार उच्चदाब वीज ग्राहकांना आपला पावर फैक्टर हा एक ठेवल्यास त्यांना kwh च्या वापराएवढे बिल येते. पण ग्राहकाचा पावर फैक्टर कमी जास्त झाल्यास त्यांना वाढीव वीज बिल आकारण्यात येते. या नवीन बदलामुळे लॉकडाऊनच्या काळात पावर फैक्टर नियंत्रणात न राखता आल्यामुळे अनेक वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता . त्याचप्रमाणे लघुदाब ग्राहकांना देखील पावर फैक्टर योग्य न ठेवल्यामुळे दंड भरावा लागला होता. सी.एम.आय.ए, औरंगाबाद तर्फे आयोगाकडे जून 2020 मध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती व लॉकडाऊनच्या काळात उच्चदाब वीज ग्राहकांना kvah ऐवजी kwh वर आधारीत वीज आकारण्याची व लघुदाब ग्राहकांना पावर फैक्टरवरील दंड रद्द करण्याची विनंती केली होती. या तक्रारीवर आयोगाने सुनावणी घेत 13 नोव्हेंबर 2020 आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर मार्च 2020 च्या वापराच्या तुलनेत 25% कमी असेल व मार्च महिन्यातील पावर फक्टर 0.9 च्या वर असेल अश्या ग्राहकांना ही सवलत मिळणार आहे. मार्च 2020 मध्ये नोंद झालेल्या पावर फक्टरच्या आधारावर एप्रिल व मे या दोन महिन्याचे वीज बिल दुरुस्ती करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या आदेशामुळे या दोन महिन्यात पावर फक्टर मुळे kvah युनिट मध्ये वाढ झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सी.एम.आय.ए, तर्फे हेमंत कापडिया यांनी आयोगापुढे बाजू मांडली होती.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक

0

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्‍याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्‍येय्य साध्‍य करण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कटीबद्ध आहे.

            पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नेमण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा, शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍यासह पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर येथील उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्‍हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

            निवडणूक कार्यक्रम- अधिसूचना प्रसिद्धी दिनांक 5.11.2020, नामनिर्देशन पत्र दाखल करणे दिनांक 12.11.20 पर्यंत, नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 13.11.2020, नामनिर्देशन पत्र मागे घेणे दिनांक  17.11.2020, मतदान दिनांक 1.12.20 आणि मतमोजणी दिनांक 3.12.2020.

            या निवडणुकीसाठी पुण्‍याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्‍त (सर्वसाधारण) संजयसिंह चव्‍हाण, पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्‍हाधिकारी शेखर सिंग, सांगलीचे जिल्‍हाधिकारी अभिजीत चौधरी, सोलापूरचे जिल्‍हाधिकारी मिलींद शंभरकर आणि कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी दौलत देसाई हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.              भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून खादी व ग्रामोद्योगच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकेटा या पदवीधर मतदार संघासाठी तर श्रीकांत देशपांडे हे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्‍हणून जबाबदारी पार पाडतील.

            निवडणुकीची ठळक वैशिष्‍ट्ये – मतपत्रिकेवर उमेदवाराच्‍या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.

            मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्‍या  11 सप्‍टेंबर 2018 च्‍या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा (NOTA- None Of The Above) हा पर्याय वगळण्यात आला आहे.

        मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे  1)निवडणूक साहित्य स्‍वीकृती व तपासणी                  2)मतदानाच्या आदल्या  दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी 3)प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीची कामे  4)मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष / कर्मचारी यांची कामे 5)मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही 6)महत्‍त्‍वाचे अहवाल/नमुने 7)मतदान साहित्‍य परत करणे  

       मतदान साहित्‍य तपासणी– तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी आपली नियुक्ती ज्या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे, त्या मतदान केंद्राचे साहित्य आपणास संकलन केंद्रावरुन देण्यात येईल.‍ त्या ठिकाणावरुन आपण साहित्य प्राप्त करुन घ्यावे. प्राप्त साहित्य आपणास पुरविलेल्या यादीप्रमाणे योग्य व पुरेशा प्रमाणात असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच दोषपूर्ण व कमी असलेले साहित्य संकलन केंद्रावरील नेमून दिलेल्या कक्षातून बदलून / प्राप्त करून घ्यावे. मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले व मतदान केंद्रासाठी विशेषत्वाने नेमून दिलेले साहित्य काळजीपूर्वक तपासून घ्यावे. यामध्ये मतपेटी, मतपत्रिका, चिन्हांकित मतदार यादी, मतदार यादीची दुसरी प्रत, हिरवे पेपर सिल, विभेदक चिन्ह, पक्की शाई, जांभळ्या शाईचा स्केच पेन, कायद्याने विहित केलेले सर्व नमुने, लाख इत्यादी तपासून घेणे. मतदार यादी, विभेदक चिन्ह, ग्रीन पेपर सील यावर आपणास नेमून दिलेले मतदान केंद्र सुस्पष्ट नमूद असल्याची खात्री करावी. सर्व साहित्य बरोबर असल्याची व आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचीच असल्याची पुन्हा खात्री करून घ्यावी. मतपेटी सुस्थितीत व स्‍वच्‍छ असल्याची खात्री करणे. सर्व कळा/खटके (Hinges/Spring/ Mechanical Parts) कार्यरत असल्याची व मतपेटी व्यवस्थित बंद होत असल्याची खात्री करावी.

          पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग पांढऱ्याच रंगाचे असतील. शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाच्‍या असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग गुलाबी रंगाचे असतील.

            कोविड-19 (कोरोना)च्‍या प्रादुर्भावामध्‍ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या दक्षता घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांच्‍यासाठी मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ग्लोज पुरविले जातील. त्याचा वापर करावा.

            मतदानाच्‍या आदल्या दिवशी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घेणे अनिवार्य आहे.  मतदान प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी मतदारांना जास्त वेळ रांगेत ताटकळत राहू लागू नये म्हणून त्यांना टोकण वितरण करण्‍यासाठी मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) राहील. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मतदान केंद्रावरील रांगेमधील मतदारांना रांगेत सामाजिक अंतर ठेवणे सुलभ जावे तसेच दिव्यांग व ज्‍येष्ठ नागरिक मतदार, पुरुष मतदार आणि स्त्री मतदार यासाठी मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा व दोन व्यक्तीमधील सामाजिक अंतर ६ फुटाचे ठेवण्यासाठी या स्वतंत्र रांगेमध्ये ६ फुटाच्‍या अंतरावर चुना पावडरच्‍या सहाय्याने १५ ते २० गोल वर्तुळे चिन्‍हांकित करावीत. ही कार्यवाही मतदान केंद्राच्‍या समोरील जागेतील जागा उपलब्धतेप्रमाणे करावी.  

             मतदान केंद्राच्‍या  इमारतीमध्ये किंवा परिसरात पुरुष व स्त्री मतदारासाठी दोन स्वतंत्र खोल्या     प्रतीक्षा कक्ष म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात याव्यात. ज्यामध्ये खुर्ची,  सतरंजी व इतर व्यवस्था ठेवण्यात येईल.  मतदान केंद्रावर हात स्वच्छ करण्‍यासाठी मतदान केंद्राच्‍या येण्‍या-जाण्याच्‍या ठिकाणी साबण/हॅण्‍डवॉश व पाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मतदान केंद्रामध्ये येण्या-जाण्याच्‍या ठिकाणी  सॅनिटायझर ठेवले जाईल. आपल्याकडील साहित्यामधील कोविड-१९ च्या प्रादुर्भाव संबंधाने जनजागृती बाबतचे भित्तीपत्रक मतदान केंद्राच्‍या परिसरात दर्शनी भागात लावले जातील. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था सामाजिक अंतराच्‍या निकषाप्रमाणे केंद्राध्यक्षांनी करून घ्यावी. मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्यास मास्क पुरविण्यात यावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्‍यापूर्वी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्‍या मार्फत थर्मल स्कॅनरच्‍या सहाय्याने तापमान तपासणी करावी. थर्मल स्कॅनरच्‍या तपासणीमध्ये मतदाराचे तापमान आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे म्हणजे ९८.६ फॅरनहिट किंवा 37 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आढळल्यास अशा मतदाराचे तापमान पुन्हा दोनदा तपासण्यात यावे. संबंधिताचे तापमान पुन्हा ९८.६oF किंवा ३७C पेक्षा अधिक दिसून आल्यास संबंधित मतदारास टोकण / प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठीच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. मतदाराची ओळख पटविण्याबाबत कार्यवाही करताना आवश्यकता असल्यास चेहऱ्यावरील  मास्क खाली घेण्यासाठी  सांगण्यात येईल. अलगीकरणातील कोविड-१९च्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पर्यवेक्षणामध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करून मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मतदान नोंदविण्‍यासाठी अनुमती द्यावी.  क्षेत्रिय अधिकारी या संबंधाने त्यांच्‍या क्षेत्रातील मतदान केंद्राच्‍या बाबतीत आवश्यक समन्वय ठेवतील. मतदान प्रतिनिधीच्‍या तपासणी नंतर तापमान विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त  आढळल्यास त्यास बदली प्रतिनिधी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे अभिलेख्यात त्याची नोंद घ्यावी.

                      मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी-

        मतदान केंद्रावर पोहोचणे – आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य तपासून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. आपल्‍या मतदान केंद्रासाठी नियोजित वाहतूक आराखड्यानुसार पथकातील सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या वाहनाद्वारे दि. 30.11.2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे.

            आपण मतदान केंद्रावर सर्व साहित्यानिशी सुखरूप पोहचल्याचा अहवाल क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्याच दिवशी द्यावयाचा आहे. मतदान केंद्रावर एक दिवस मुक्काम असल्यामुळे आवश्यक वैयक्तिक साहित्य सोबत ठेवावे. गरम पाण्‍याची वाफ घेण्‍यासाठी आवश्‍यक असणारे उपकरणही सोबत ठेवता येईल. मतदान केंद्रावर आपणांस स्थानिक कर्मचाऱ्यांचे सहाय्य देण्यात येईल. त्यांची आवश्यक तीमदत घ्यावी. मतदान केंद्रापासून २०० मीटरचे अंतर चुना फक्कीने चिन्हांकित करावे. मतदान केंद्रापासून २०० मीटरच्‍या आत काही प्रचार साहित्य असल्यास ते काढून टाकावे.  

            मतदान केंद्रावर पोहोचल्याबाबतचा अहवाल क्षेत्रिय अधिकारी यांच्‍याकडे देणे. प्राप्त साहित्य तपासून घेणे. मतपेट्या सहज हाताळता येतात का हे पाहणे, साहित्य कमी असल्यास क्षेत्रिय अधिकारी यांच्‍याकडून प्राप्त करुन घेणे. मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा घोषणा किंवा चिन्ह असल्यास ते काढून टाकणे किंवा झाकून  टाकणे, वर्तमानपत्रांनी ते झाकले असल्‍यास वर्तमानपत्र उलट्या बाजूने लावण्‍यात यावे.

            आवश्यक फर्निचर उपलब्धता – टेबल व साहित्याची व्यवस्थित रचना करणे. सूचना फलक तयार करणे, ज्यावर मतदान केंद्राचा तपशील व व्याप्ती (पोलींग एरिया), खोट्या मतदानाबाबत इशारा, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नमुना 7  ब मधील यादी, मतदारांना मत नोंदवण्‍याबाबतच्या सूचना, कोवीड- 19 बाबत जागृती फलक, धूम्रपान मनाई इशारा, मतदान केंद्राच्‍या समोर दर्शनी भागात प्रदर्शित करावे. मतदान केंद्राबाहेर १०० मीटर व २०० मीटर चुना पावडरने मार्किंग करून घेणे. 100 मीटरच्या आतील प्रचार साहित्य / फोटो इत्यादी काढणे. उमेदवाराचे तंबू / बुथ 2०० मीटरच्या हद्दीबाहेर असल्याची खात्री करुन घेणे. प्रवेश, बाहेर, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान प्रतिनिधी, मतदान कक्ष इत्‍यादी फलक मतदान केंद्रात योग्य ठिकाणी लावावेत. मतदान केंद्राच्या बाहेर पुरुष, स्त्री, दिव्यांग / ज्‍येष्‍ठ नागरिक मतदार यांच्‍यासाठी तीन स्वतंत्र रांगांची आखणी करुन त्यामध्ये सामाजिक अंतरासाठी 6 फुटावर चुना पावडरच्या साह्याने गोल वर्तुळाची आखणी करणे.

        मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था – प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. आपल्‍या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणांस मतदान केंद्रावर जावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्‍या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही.

            नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान  केंद्राच्‍या १०० मीटर परिसरात तोतयेगिरी वा निवडणूक प्रचार होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा मतदान केंद्रावर सूक्ष्‍म निरीक्षक (मायक्रो ऑब्‍झर्व्‍हर) नियुक्त असतील व ते ऑब्‍झर्व्‍हर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेवर जवळून लक्ष ठेवतील. तथापि, ते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाहीत. अशा मतदान केंद्राला झोनल अधिकारी, पोलिस फिरते पथक वारंवार भेटी देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी व मतदान केंद्र माहीत होण्‍यासाठी मतदार सहायता कक्ष उभारण्यात येईल. मतदार सहायता कक्ष मतदान केंद्राच्या बाहेर आवश्यक कर्मचारी व साहित्यासह तयार करण्यात येईल.

       मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये –तुमच्या मतदान पथकातील व्यक्तींशी तुम्ही परिचय करुन घेतला पाहिजे आणि मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाल्यापासूनच तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली पाहिजे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या संबंधातील सर्व सूचना तुम्ही स्वतः जवळ तयार ठेवल्या पाहिजे. तुमचे मतदान केंद्र कोठे आहे व तेथे जाण्या-येण्याचा मार्ग कोणता आहे, यासंबंधी तुम्हाला स्पष्ट कल्पना असावयास हवी. तुम्ही सर्व प्रशिक्षणाच्या वर्गाला न चुकता हजर राहिले पाहिजे. निवडणुकीसंबंधीचे साहित्य ताब्यात घेतांना आपणास सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत, याची तुम्ही खात्री करुन घेतली पाहिजे. मतपत्रिका, मतपेट्या, पेपर सील, मतदार यादीची चिन्हांकीत प्रत व दुसरी प्रत, मतदारासाठी जांभळ्या शाईचे स्केच पेन (Violet Colour SketchPen) विभेदक चिन्ह, कायद्याने विहित केलेले नमुने (Forms), लाख आणि पक्की शाई या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

            मतदान केंद्रावर आल्यावर, मतदान गुप्त राखले जाईल अशा रितीने मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदारांना सामाजिक अंतर ठेऊन व्यवस्थित रांगेने उभे करुन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, मतदानाचे कामकाज बाहेरील हस्तक्षेपापासून मुक्त ठेवणे यासाठी काय व्यवस्था करावयाची याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असली पाहिजे.  प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची पूर्ण स्वाक्षरी करावयाची आहे. परंतु स्वाक्षरी स्थळप्रतीवर असता कामा नये. निश्चित केलेल्या वेळी मतदानास प्रारंभ करता यावा म्हणून काही मतपत्रिकांवर मागील बाजूस आगाऊ स्वाक्षऱ्या करुन ठेवाव्यात. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूवर तसेच तिच्या स्थळप्रतीवर तुम्हास देण्यात आलेल्या रबरी शिक्क्याने तुमच्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्हसुद्धा उमटविणे आवश्यक आहे. मतदारांच्या बोटावरील पक्की शाई सुकलेली आहे आणि बोटावर स्पष्ट व पक्की खूण झालेली आहे,  याची खात्री करुन घेण्यासाठी मतदार हा मतदान केंद्र सोडून जाण्यापूर्वी शेवटच्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीची / मधल्या बोटाची परत तपासणी करणे इष्ट ठरेल.

            ज्या मतदाराला मतपत्रिका देण्यात आली आहे त्याने ताकीद मिळाल्यावरही मतदान केंद्रावर मतदान गुप्त राखण्यासंबंधातील कार्यपध्दतीचे पालन करण्यास नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका त्याने मत नोंदवलेले असो किंवा नसो तुम्ही किंवा तुमच्या सांगण्यानुसार मतदान अधिकाऱ्याने परत घ्यावी व त्यानंतर ती रद्द ठरवावी. मतदान सुरु होण्याच्‍या वेळी व मतदान संपल्यानंतर तुम्ही काही प्रतिज्ञापत्र भरावयाची असून त्यावर मतदान केंद्रात हजर असलेल्या मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तुम्हास देण्यात आलेल्या व अनुक्रमांकित असलेल्या मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीमध्ये संबंधित घटनांची नोंद त्या जशा घडतील त्या क्रमांकानुसार घ्यावयाची आहे. मतदान शांततेने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला मतदान केंद्रातील कामकाजाचे नियमन करावे लागेल. यासाठी तुम्हाला हिंमतीने तर वागावे लागेलच शिवाय तुम्ही स्वतः खंबीर व निःपक्षपाती असले पाहिजे.

            मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवाराचा जो मतदान प्रतिनिधी हजर असेल त्याला मतपत्रिकांच्या हिशोबाच्या अधिप्रमाणित प्रती तुम्ही देणे आवश्यक आहे. निरनिराळ्या लिफाफ्यात निवडणूकविषयक कागदपत्रे मोहोरबंद करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे म्हणजे ज्या चुका पुढे सुधारता येणार नाहीत व टाळता येण्याजोग्या आहेत, अशा कोणत्याही चुका होणार नाहीत. मतदानानंतर मतपेट्या व इतर निवडणूक विषयक साहित्य नियोजित ठिकाणी रितसर पावती घेवून संबंधितांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी तुमची राहील.

        (मतदान अधिकारी यांची कामे) पहिला मतदान अधिकारी – मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर मतदार हा सर्वप्रथम थेट पहिल्या मतदान अधिकारी यांच्‍याकडे जाईल. मतदारास उमेदवार  किंवा प्रतिनिधी यांच्‍याकडून अनौपचारिक ओळखपत्र चिठ्ठी दिली जाते (ओळखपत्र चिठ्ठी – साध्या पांढऱ्या कागदावर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव नमूद असते. (परंतु राजकीय पक्षाचे नाव / उमेदवाराचे नाव नमूद नसावे) ओळखपत्र चिठ्ठीवरून मतदार यादीची चिन्हांकित प्रत पाहून मतदाराची ओळख पटविणे.

            भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदार दर्शवील त्यावरुन ओळख पटविण्याची कार्यवाही हा अधिकारी पूर्ण करेल. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव मतदान प्रतिनिधी व  दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यास ऐकू जाईल एवढया मोठ्याने वाचून दाखवील. पुरुष मतदार असल्यास मतदार यादीच्या चिन्‍हांकित प्रतिमध्ये त्याच्या नावाखाली अधोरेखीत करेल. स्त्री मतदार असल्यास मतदाराच्या नावाखाली अधोरेखीत करुन मतदाराच्या नावाच्या डाव्या बाजूला बरोबरची (ü) अशी खूण करेल.

        फोटो ओळखपत्र (एपिकनसलेल्या मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर पुरावे- 1)आधार कार्ड 2)ड्रायव्हींग लायसन्स 3)आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5)केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा  औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6)खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7)संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्‍थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8)विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र 

            टीप :-ज्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्‍यांनी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्‍यासाठी सादर करणे आवश्यक आहे. (भारत निवडणूक आयोगाच्‍या दि.10/11/2020 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशांप्रमाणे)

        पहिला मतदान अधिकारी – पक्की शाई लावण्याची रीत – मतदाराची ओळख पटविल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे हे पहिल्या मतदार अधिकाऱ्याचे प्रमुख काम राहील. (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्‍या दि. 9 नोव्‍हेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांप्रमाणे)

            मतदारास डाव्या हातावर बोटे नसतील तर पदवीधर मतदारसंघाकरीता मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे. पक्की शाई लावल्‍यानंतर पहिला मतदान अधिकारी मतदारास मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्‍याकडे जाण्यास सांगेल.

        दुसरा मतदान अधिकारी  दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतपत्रिकेचे गठ्ठे असतील. पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मोठ्याने वाचून दाखवलेला मतदाराचा मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर नोंदवून घेईल. मतपत्रिका स्थळ प्रतिपासून वेगळी करुन मतदारास देईल आणि त्याला मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जाण्यास सांगेल.  कोणत्याही मतदान प्रतिनिधीस मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाची नोंद घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होतो.                                                      

            मतदारास मतपत्रिका देणे – मतदाराला मतपत्रिका मत नोंदविण्यासाठी देण्यापूर्वी मतपत्रिकेच्या पाठीमागे स्थळ प्रतिवर व मतपत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्ह उमटवून मतपत्रिकेवरील विभेदक चिन्हाच्या खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करील. मतदाराला मतपत्रिका देण्‍यापूर्वी संबंधित मतदान अधिकारी चिन्‍हांकित मतदार यादीतील मतदाराचा मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक स्थळ प्रतीवर लिहील व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल.

        तिसरा मतदान अधिकारी तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जांभळ्या शाईचे स्केचपेन व ढकल पट्टी असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराकडून मतपत्रिका घेईल व मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर उमटवलेले विभेदक चिन्ह स्पष्ट दिसेल अशी मतपत्रिकेची उभी घडी व नंतर आडवी घडी अशी दोन वेळा घडी करील. त्यानंतर मतपत्रिकेची घडी उलगडून मतदारास देईल व मत नोंदवल्यानंतर परत त्याचप्रमाणे घडी करण्यास मतदारास सांगेल.

        मतपत्रिकेवर मत नोंदविण्याबाबत सूचना –  मत नोंदविण्यासाठी मतदारास जांभळा स्केच पेन देवून मतदान कक्षात जाण्यास सांगेल. मतदान कक्षात मतदार ज्या उमेदवारास मत देऊ इच्छित असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनने फक्त एकाच अंकात पसंती क्रमांक दर्शवावा. पसंती क्रमांक फक्त अंकातच द्यावयाचा आहे. तसेच पसंतीचे अंक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील कोणत्याही एका भाषेतील अंकात नमूद करावयाचे आहे.  (उदा. रोमन-I, II, III, – मराठी 1,2,3, – इंग्रजी १, २, ३). मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराच्‍या नांवासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येणार नाही. मतदारास पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्‍या नावासमोर पसंतीचे आकडे लिहिलेल्या आकड्यापैकी एक अंक येईल.

        मतपत्रिकेवर पसंती क्रमांक व्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये. मतदाराने मतपत्रिकेवर मतदान नोंदविल्यावर पूर्वीच्या घडीवर त्या मतपत्रिकेची घडी घालावी. त्यानंतर घडी केलेली मतपत्रिका मतदान कक्षातून बाहेर आणावी आणि मतपेटीत टाकावी. मतदार  ही घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकेल व स्केच पेन तेथेच ठेवेल. मतदाराने खऱ्या मतपत्रिकेशिवाय इतर कोणतीही वस्तू अथवा कागद मतपत्रिकेत टाकता कामा नये, यासाठी मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्ह व केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी दिसेल अशा रितीने घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकण्याची प्रत्येक मतदाराला वेळोवळी सूचना देईल. यासाठी प्रत्येक मतदार मतपेटीमध्ये घडी केलेली मतपत्रिका टाकताना दक्ष राहून लक्ष ठेवील. मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर मतदार मतदान केंद्रातून बाहेर जाण्यापूर्वी त्याच्या बोटावरील पक्क्या शाईची खूण स्पष्टपणे उमटली असल्याची तसेच बोटावरील शाई पुसली नसल्याची खात्री करेल.

        मतदान सुरु करण्यापूर्वीची तयारी  1 डिसेंबर 2020 रोजी मतदान सुरुवात करण्यापूर्वी किमान 45 मिनिटे अगोदर म्हणजे सकाळी 7.15 वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यावर हजर होणे आवश्यक आहे.

        (मतदान केंद्राध्यक्ष  अधिकारी यांच्‍यातील साहित्य वाटप)  मतदान केंद्राध्‍यक्ष – चिन्हांकित फोटो मतदार यादी, सर्व नमुने व लिफाफे, (मतदान अधिकारी-१) चिन्हांकीत फोटो मतदार यादी, इंडेलीबल इंक बॉटल, मतदानाच्‍या आकडेवारीचा तक्ता, (मतदान अधिकारी-२)मतपत्रिका, स्थळ प्रतिपासून मतपत्रिका वेगळे करण्याचे कटर,  (मतदान अधिकारी-३) जांभळ्या शाईचे पेन व ढकल पट्टी.

        मतदान केंद्रात प्रवेशपात्र व्यक्ती  1)मतदान अधिकारी 2)एकावेळी एक उमेदवार/ त्याचा निवडणूक प्रतिनिधी /एक मतदान प्रतिनिधी 3)आयोगाने परवानगी दिलेली व्यक्ती 4)निवडणूक कामावरील सरकारी सेवक 5)आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक 6)मत नोंदविण्यासाठी आलेले मतदार 7)मतदारासोबत येणारे बालक / मूल 8)दिव्यांग व नि:समर्थ मतदारासोबत येणारी स्थानिक व्यक्ती (मदतनीस/सहाय्यक) 9)मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रात अपवादात्मक परिस्थितीमध्ये  प्रवेश दिलेली व्यक्ती.

        मतदान प्रतिनिधी – मतदान प्रतिनिधी  यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर मतदान केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे.  तथापि, एखादा प्रतिनिधी केंद्रावर उशिरा आला तरीही त्याला मतदान केंद्रावरील पुढील कामकाजात सहभागी  होण्याची परवानगी देण्यात यावी. मतदान केंद्रावर येणारे  प्रतिनिधी सोबत नेमणूक-पत्र  घेऊन येतील, त्याआधारे मतदान प्रतिनिधी यांच्‍याकडील नेमणूक पत्रावरील उमेदवार /निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहीची खात्री, तुम्हाला निवडणूक ‍ निर्णय अधिकाऱ्याने पुरविलेल्या सहीच्या नमुन्यावरून करून घ्यावयाची आहे.

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये उपस्थित प्रतिनिधींना व निवडणूक कर्तव्यावरील सर्व संबंधितांना गोपनियतेची तरतूद वाचून दाखविणे आवश्यक आहे. संबंधितांना त्यांच्‍या कर्तव्याची व गोपनियतेची पूर्ण जाणीव करून द्यावी. उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी म्हणून आमदार / खासदार किंवा मंत्री किंवा झेड प्‍लस सुरक्षा प्राप्त अशा व्यक्तींना  मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणार नाही. सुरक्षा प्राप्त मतदाराच्या सुरक्षा रक्षकालाही साध्या कपड्यामध्ये येवून त्याच्‍याकडील शस्त्र कपड्याखाली लपवून ठेवावे लागेल. सुरक्षा रक्षक मतदार नसेल तर त्याला मतदान केंद्राच्या खोलीच्या बाहेर थांबावे लागेल.

             मतदान प्रतिनिधीकडे ओळखपत्र आणि त्यांचे नेमणुकीबाबत उमेदवार किंवा त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांनी सही केलेला फॉर्म नंबर 10 असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवारास प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान प्रतिनिधी व दोन बदली मतदान प्रतिनिधी नेमता येतील. तथापि, कोणत्याही वेळी उमेदवाराचा एकच प्रतिनिधी केंद्रात उपस्थित राहील. तथापि, एका वेळी एका उमेदवाराचा एकच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहील. मतदान प्रतिनिधींचे हालचाल रजिष्टरमध्ये त्यांच्या नोंदी घ्याव्यात. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रामधून बाहेर जाण्यास किंवा ते सोडण्यास परवानगी देता येणार नाही.

                        मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, बिनतारी संदेश यंत्र, रेकॉर्डर, कॅमेरा, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ. घेऊन जाण्यासाठी मुभा नाही. तसेच त्यांच्‍याकडील मतदार यादी बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असल्याचा विश्वास प्रतिनिधीमध्ये निर्माण करावा.

        लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 128 – मतदान गुप्त राखणे – मतदानास सुरूवात होणाच्या अगोदर मतदान केंद्रामध्ये उपस्थित सर्वांना वाचून दाखवावे. 1)जो निवडणुकीमध्ये मत नोंदणीच्या किंवा मतमोजणीच्या संबंधात काही काम करतो असा प्रत्येक अधिकारी लिपिक किंवा अन्य इसम याला मतदान गुप्त राखावे लागेल, तसेच ते राखण्यास मदत करावी लागेल आणि ज्यामुळे अशी गुप्तता भंग पावेल असे मानण्याजोगी कोणतीही माहिती  कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही. 2)जी व्यक्ती वरील बाबीचे उल्लंघन करील ती व्यक्ती तीन महिन्यापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंडास किंवा दोन्ही  शिक्षेस पात्र होईल.

        मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष/कर्मचारी यांची कामे – मतदानासाठी मतपेटी आवश्‍यक त्‍या सूचनांनुसार तयार झाल्यावर मतदान प्रक्रियेचा महत्‍त्‍वाचा टप्‍पा सुरु होतो. 1 डिसेंबर रोजी नियोजित वेळेस म्‍हणजे सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात करा. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी घेणे. (सकाळी १० वाजता, दुपारी १२ वाजता, २ वाजता, सायंकाळी ४ वाजता आणि मतदान संपल्‍यानंतर)  पदवीधर व शिक्षक मतदार संघाची स्वतंत्र माहिती द्यावी. मतदान नियोजित वेळेस म्‍हणजे सायंकाळी ५ वाजता बंद करणे.     

            मतदान केंद्रावर सायंकाळी ५ वाजता मतदानासाठी रांगेत उपस्थित असणाऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित न ठेवता त्यांना केंद्राध्यक्षाच्या स्वाक्षरीच्या चिठ्ठया द्यावात. अनुक्रमांक १  ची चिठ्ठी रांगेतील शेवटच्या मतदारास देऊन अशाप्रमाणे उर्वरित चिठ्ठया उलट्या क्रमाने वाटप कराव्यात.   

मतदान प्रक्रियेमध्‍ये उद्भवणाऱ्या विविध परिस्थिती –

  1)मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम ३९)

2)मतपत्रिका रद्द करणे   

3)अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान (नियम – 40)

4)प्रदत्त मतपत्रिका {TENDER  VOTE}  (नियम ४२)

5)आक्षेपित मते{CHALLANGED VOTE}(नियम ३६)

6)मतदाराने मतपेटीमध्ये बनावट मतपत्रिका {Spurious Ballot Paper} टाकणे

                        मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम-39)   

नियम ३८ अनुसार किंवा या नियमांच्या दुसऱ्या कोणत्याही तरतुदीनुसार ज्याला मतपत्रिका दिली आहे असा प्रत्येक मतदार, मतदान केंद्रावर मताची गुप्तता राखील आणि त्यासाठी यापुढे घालून दिलेली मतदान पध्दती अनुसरील.

मतपत्रिका मिळाल्यावर मतदार ताबडतोब-

                                I.             मतदान पटापैकी एका कक्षात जाईल.

                             II.            तेथे मतपत्रिकेवर, त्याला ज्या उमेदवारास मत देण्याची इच्छा असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनने फक्त एकाच भाषेतील अंकात पसंती क्रमांक दर्शवील.

                           III.            आपले मत गुप्त राखण्यासाठी मतपत्रिकेची घडी करील.

                          IV.            आवश्यक वाटल्यास मतदान केंद्राध्यक्षास मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्हाचा ठसा दाखवील.

                            V.            घडी  केलली  मतपत्रिका मतपेटीत टाकील.

                          VI.            मतदान केंद्रातून निघून जाईल.

            प्रत्येक मतदार गैरवाजवी विलंब न लावता मत देईल. दुसरा मतदार मतदान कक्षात असतांना कोणत्याही मतदारास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२)मध्ये घालून दिलेली पध्दत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल. त्या मतपत्रिकेच्या पाठीमागे रद्द केली-मतदान पध्दतीचा भंग असे लिहून त्या खाली सही करेल.

            मतपत्रिका रद्द करणे  – जर एखादया मतदाराने मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सही करण्यास नकार दिला तर त्याला मतपत्रिका देवू नये.

            मतदार अंध/दिव्यांग/कुष्‍ठरोगी असल्यास व तो सही करण्यास असमर्थ असल्यास त्याच्या मदतनीसाचा मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर सही /अंगठा घेईल व प्रतिज्ञापत्र भरेल.

            मतदार यादीतील क्रमांक लिहिलेल्या ज्या मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सहीसाठी नकार दिला तर तसे मतदान अधिकारी यांनी नमूद केले असेल, ती मतपत्रिका रद्द करण्यात  यावी आणि ती व तिच्‍या स्थळ प्रत दोन्हीवर पाठीमागे रद्दसही करण्यास नकार असा शेरा लिहून ती मतपत्रिका रद्द केलेल्या मतपत्रिकेसाठी असलेल्या लिफाफ्यात ठेवावी.

            सदोष किंवा खराब झालेली मतपत्रिका देखील वरीलप्रमाणे कृती अनुसरुन त्यावर  रद्द –सदोष मतपत्रिका  असे लिहून ती मतपत्रिका रद्द मतपत्रिकेच्या लिफाफ्यात ठेवावी.

            वरील दोन्ही प्रकारे रद्द केलेल्या मतपत्रिकांचा हिशोब मतपत्रिकांचा हिशोब नमुना -16 च्या बाब क्रमांक 4 (ब) मध्ये दर्शवावा. (नियम -41 )

            मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२) मध्ये घालून दिलेली पध्दत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल.

            मतपत्रिका परत घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, त्याच्या मागच्या बाजूला रद्द केली –मतदान पध्दतीचा भंग असे लिहिल आणि त्याखाली आपली सही करील. त्याचा हिशोब नमुना 16 च्या बाब क्रमांक 4 (अ) मध्ये लिहिल.  (नियम -39 )

    अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान (नियम –40)

            विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी अंध व दिव्यांग मतदाराना त्यांच्यावतीने व त्यांच्या इच्छेप्रमाणे मतपत्रिकेवर मत नोंदविण्यासाठी १८ वर्षापेक्षा कमी नाही इतक्या वयाची एखादी व्यक्ती मदतनीस म्हणून घेता येऊ शकते. परंतु, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही  मतदान केंद्रावर  एकाच दिवशी  एकाहून अधिक मतदाराचा मदतनीस म्हणून काम करण्यास परवानगी देता येणार नाही आणि त्या मतदाराच्या वतीने त्यांनी केलेली मत नोंदणी तो (मदतनीस) गुप्त ठेवेल. मतदानाच्या गुप्ततेबाबत आणि मतदाराचा सोबती म्हणून यापूर्वी काम केलेले नाही अशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र विहित नमुन्‍यात केंद्राध्‍यक्षांनी त्या व्यक्तीकडून करून घेतले पाहिजे. अशा सर्व प्रकरणांची नोंद नमुना १४ (अ)मध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी ठेवावयाची आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी यांनी अंध व दिव्यांग मतदाराबरोबर मतदान कक्षात जाऊ नये.

             प्रदत्त मतपत्रिका {TENDERED VOTE} (नियम ४२) अमूक एक विशिष्ट मतदार म्हणून एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करुन गेल्यावर जर आणखी एखादी व्यक्ती आपणच अमूक ती विशिष्ट व्यक्ती आहोत असे सांगून मतदान करण्यास आली तर त्याची ओळख पटविण्यासंबंधी केंद्राध्यक्षाची खात्री होईपर्यंत केंद्राध्यक्षांना आवश्यक वाटतील असे प्रश्न त्यास विचारुन त्या मतदाराच्या ओळखीबाबत  खात्री  पटवावी. ओळखीबाबत मतदाराची खात्री पटल्यास त्या मतदारास डाव्या हाताच्या तर्जनी/ मधल्या बोटावर पक्क्या शाईने खूण करुन त्या मतदाराच्या बाबतीत प्रदत्त मतदाराच्या यादीमध्ये (नमुना १५) आवश्यक ती नोंद केंद्राध्यक्षानी घ्यावी आणि त्यामध्ये मतदाराची सही घ्यावी. त्यानंतर त्या मतदारास एक मतपत्रिका द्यावी. ही मतपत्रिका मतदान केंद्रावर मतपत्रिकेच्या गट्ठयातील मतपत्रिकेच्या शेवटच्या गट्ठयातील शेवटच्या अनुक्रमांकाची मतपत्रिका असेल. अशा मतपत्रिकेच्या मागील बाजूस आणि  तिच्या स्थळप्रतीवर मतदान केंद्राध्यक्षानी स्वतःच्या हस्ताक्षरात “प्रदत्त मतपत्रिका” असा मजकूर लिहून त्याखाली आपली सही करावी. त्यानंतर ती मतपत्रिका त्या मतदारास देऊन त्यास मतदान कक्षास जाऊन मत नोंदविण्यास केंद्राध्यक्ष सांगतील. मतदाराने संबंधित प्रदत्त मतपत्रिकेवर मत नोंदविल्यानंतर मतदार ती मतपत्रिका मतपेटीत न टाकता केंद्राध्यक्षाकडे देईलकेंद्राध्यक्षांनी अशा प्रकारच्या सर्व प्रदत्त मतपत्रिका आणि नमुने १५ मधील यादी त्यासाठीच्या संविधानिक लिफाफ्यात ठेवाव्यात.  प्रदत्त मतपत्रिकेचा हिशोब हा नमुना १६ च्या भाग १ मधील हिशोबाच्या बाब ४ (क) मध्ये मतदान केंद्राध्यक्षास दर्शवावयाचा आहे,  हे केंद्राध्यक्षांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

            प्रदत्त मतपत्रिका {TENDERED VOTE} देण्‍याबाबत कार्यवाही (नियम ४२)

कायदेशीर तरतूद –  निवडणुकांचे संचालन नियम १९६१ नियम ४२ नुसार अनुसरावयाची कार्यपद्धती – मतदाराची ओळख पटविणे, नमुना १५ मध्ये मतदाराची सही घेणे, पुरवण्यात आलेल्या मतपत्रिकेमधील शेवटच्या अनुक्रमांकाची मतपत्रिका देणे, मतदान केंद्राध्‍यक्षाने मतपत्रिकेच्या स्थळप्रतीवर “प्रदत्‍त मतपत्रिका” लिहिणे व स्वाक्षरी करणे, पुरवण्यात आलेल्या विशेष लिफाफ्यात ठेवणे.   

        आक्षेपित मते{CHALLANGED VOTE}(नियम ३६): आपण अमूक एक मतदार आहोत असा दावा सांगणाऱ्या  कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीबाबत, कोणताही मतदान प्रतिनिधी आक्षेप घेऊ शकेल व प्रथमतः अशा प्रत्येक आक्षेपादाखल रोख दोन रुपयाची रक्कम मतदान केंद्राध्यक्षाकडे आक्षेप शुल्क म्हणून ठेवील. रक्कम भरल्यानंतर आक्षेपकाला त्याची पावती देण्यात येईल. अशा प्रकारे रक्कम आक्षेप शुल्क ठेवल्यावर मतदान केंद्राध्यक्ष

                                I.             आक्षेपित व्यक्तीला तोतयेगिरीबद्दल होणाऱ्या शिक्षेबाबत इशारा देईल.

                             II.            मतदारांच्या यादीतील संबंधित नोंद संपूर्णपणे वाचून दाखवील आणि त्या नोंदीत निर्देशलेली व्यक्ती तीच आहे काय म्हणून विचारील.

                           III.            नमुना क्रमांक १४ मधील आक्षेपित मताच्या यादीत तिचे नांव व पत्ता नोंदवील

                          IV.            सदरहू यादीत आपली सही करण्यास त्यास भाग पाडील.

                            V.            त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष हा दिलेल्या आक्षेपाबाबत संक्षिप्त चौकशी करील आणि त्यासाठी – (अ) आक्षेपकास आक्षेप सिध्द करण्यासाठी पुरावा देण्यास व आक्षेपित व्यक्तीस आपली ओळख शाबित करण्यासाठी पुरावा दाखल करण्यास भाग पाडील.

   (आ) आक्षेपित व्यक्तीस, तिची ओळख पटवून घेण्यासाठी आवश्यक असे कोणतेही प्रश्न विचारील आणि       तिला शपथेवर उत्तर देण्यास भाग पाडील.

  (इ) आक्षेपित व्यक्तीस, आणि साक्ष देण्यास पुढे येणाऱ्या कोणत्याही अन्य व्यक्तीस शपथ घेण्यास लावील.

            चौकशीनंतर आक्षेप शाबित झाला नाही असे मतदान केंद्राध्यक्षाला वाटल्यास तो आक्षेपित व्यक्तीस मत देण्यास मुभा देईल आणि जर आक्षेप शाबित झाला तर तो आक्षेपित व्यक्तीस मत देण्यास प्रतिबंध करील.

            घेतलेला आक्षेप गैरलागू आहे अथवा प्रामाणिकपणे  घेतलेला नाही असे मतदान केंद्राध्यक्षाचे मत असेल तर तो पोट-नियम (१) अनुसार ठेवलेली अनामत रक्कम सरकार जमा करण्याचा आदेश देईल आणि आक्षेप फेटाळाला गेल्यामुळे संबंधित मतदारास मतदानास अनुमती देईल. त्याचप्रमाणे आक्षेप खरा निघाल्यास संबंधित आक्षेप शुल्क आक्षेपकास परत करील त्याचप्रमाणे शुल्क परत करतांना आक्षेप घेणाऱ्या मतदान प्रतिनिधींची आक्षेप  शुल्‍काच्‍या पावती पुस्तकातील स्थळप्रतीवर स्वाक्षरी घेईल आणि त्या व्यक्तीस मतदान केंद्राबाहेर काढून देईल किंवा पोलीस ठाणे अधिकारी यांचे नावे तक्रार नोंदवून पोलिसाच्या ताब्यात देईल.

            मतदाराने मतपेटीमध्ये बनावट मतपत्रिका {Spurious Ballot Paper} टाकणे

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्‍या कलम १३६ अन्वये दखलपात्र गुन्हा असल्याने नियमानुसार कारवाई करणे. बनावट मतपत्रिकेस प्रतिबंध करणे- मतदान केंद्राध्यक्षाने मतपत्रिकेच्या मागील बाजूस स्वाक्षरी करणे. मतपत्रिकेच्या मागील बाजूस विभेदक चिन्ह मारणे. प्रत्येक मतदाराने मतपत्रिकेवरील विभेदक चिन्ह दाखवूनच मतपेटीत मतपत्रिका टाकणे. ज्या मतदान अधिकाऱ्याच्या ताब्यात मतपेटी असेल त्याने मतदार मतपेटीत अस्सल मतपत्रिका (Genuine Ballot Paper) टाकत आहे, याची खात्री करावी.

        मतदानानंतर मतपेट्या मोहोरबंद करणे (नियम-44) – मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्‍यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापन भरून त्यावर स्वाक्षरी करून मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्यात. शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर खिडकीचे झाकण मोकळे करण्यासाठी ती धातूची तार सोडून टाका आणि दोरी कापून टाका. खिडकीचे आच्छादन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा आणि बटन त्याच दिशेने थांबेपर्यंत जोराने असे फिरवा की फट पूर्णपणे बंद होईल. खिडकीचे झाकण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा म्हणजे खिडकी पूर्णपणे बंद होईल. खिडकीचे झाकण आणि बटन एकत्र करा. खिडकीच्या झाकणातील छिद्र आणि बटनातील संलग्न छिद्र यामधून तारेचा एक तुकडा घाला आणि तारेची दोन्ही टोके एकत्र करून काही वेळा घट्ट पिळ द्या. त्या छिद्रांमधून धागा ओवून घ्या. त्या धाग्याला गाठी मारून घ्या व मतपेटी तयार करताना लावलेले पिवळे लेबल लावून लाखेने सील करा.

            मतपेटी बंद करून सुरक्षित केल्यानंतर मतपेटीच्या चारी बाजूच्या लांबी व रुंदी कडून एकमेकांना छेद जाईल अशा रितीने कापडी रिबीन (फित) हँडलच्या खालून झाकणावर गुंडाळा व त्यानंतर घट्ट गाठ मारा. त्यानंतर जाड कागदाचा अथवा पुठ्याचा तुकडा ठेवून त्या गाठीला तुमची मोहोर उमटावा व मतदान प्रतिनिधीची इच्छा असेल तर त्यावर त्यांच्या मोहरा उमटवण्यास सांगा. ही मोहोरबंद मतपेटी कापडी पिशवीत ठेवा आणि पिशवीला व्यवस्थित शिवून टाका व त्या शिवनाच्या टाक्यावर लाखेने सील करा. आता या मतपेटीवर मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव; मतदान केंद्राचा अनुक्रमांक व नाव; मतपेटीचा कोरीव क्रमांक व मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतपेटीचा अनुक्रमांक व मतदानाची तारीख असलेली पत्ता खूणचिठ्ठी चिटकावा. (या पत्ता खूणचिठ्ठीवर मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतपेटीचा अनुक्रमांक हा अपूर्णांक स्वरूपात लिहावा जसे की 2 मतपेट्या वापरल्या असतील तर पहिल्या मतपेटीवर 1/2 व दुसऱ्या मतपेटीवर 2/2 असा अनुक्रमांक नमूद करावा.)

        नोंदविलेल्या मतपत्रिकेचा हिशोब 16 – मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नोंदविलेल्या मतांच्या  हिशेबाचा नमुना 16चे भाग 1 मध्ये तयार करणे आवश्यक आहे. मतदान संपल्यानंतर मतपेटीमध्ये नोंदविलेल्या मतांची  संख्या,  मतदान अधिकारी क्रमांक 1 यांचेकडील मतदानाची आकडेवारी, मतदान अधिकारी क्रमांक 2 यांचेकडील शिल्लक मतपत्रिका, सदर नमुन्याच्या प्रमाणित प्रति उपस्थित प्रतिनिधींना देऊन त्याबाबतची पोच घोषणापत्रावर घेण्यात यावी. सदर नमुन्याचा एक लिफाफा सोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्ट्राँग रूममध्ये  ठेवण्यासाठी सुपूर्द करावा.

मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी 

            मतदानाच्या संपूर्ण कामकाजाचे व महत्त्वाच्या घडामोडीचे वर्णन मतदान केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी दैनंदिनीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. जोडपत्र 15 मध्ये आपणांस मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावरील एखाद्या घटनेचा पुरावा म्हणून वा आयोगाकडे परस्पर प्राप्त होणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीचा उपयोग केला जाऊ शकतो. मतदान केंद्रावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्‍ठांना तातडीने माहिती देणे आवश्यक राहील. अन्यथा इतर मार्गाने आयोगाला माहिती समजल्यास त्याबाबत आपल्या विरूध्द कार्यवाही होऊ शकते, याची नोंद घ्यावी. आवश्यक घटनांची योग्यवेळी दैनंदिनीमध्ये नोंद न घेणे केंद्राध्यक्षाला अडचणीचे ठरू शकते. त्यानुसार केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी अचूक नोंदी दैनंदिनीमध्ये घेतल्या जातील, याची खबरदारी घ्यावी.

        मतदान झाल्यानंतर करावयाची कामे – मोहोरबंद मतपेट्या व पाकिटे ठेवण्यासाठी संकलन केंद्राकडे जाण्याचा कार्यक्रम समजावून घ्या. संकलन केंद्रात मतपेट्या इतर पाकीटे  शाबूत स्थितीत नेऊन देणे व त्याबद्दल पोच घेणे ही तुमची वैयक्तिक जबाबदारी राहील. पुढे नमूद केलेल्या अकरा विविध वस्तू तुम्हाला संकलन केंद्राच्या स्वाधीन करावयाच्या आहेत.  1)मोहोरबंद मतपेटी/मतपेट्या 2)न वापरलेली/ वापरलेली मतपेटी / मतपेट्या  3)न वापरलेली/ल्या कॅनव्‍हास पिशवी/ पिशव्या किंवा कापड यापैकी जे असेल ते 4)मतपत्रिकांच्या हिशोबाचा लिफाफा 5)कागदी मोहोरांच्या हिशोबाचा लिफाफा 6)मतदान केंद्राध्यक्षांच्या प्रतिज्ञापनाचा लिफाफा 7)मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीचा लिफाफा 8)”सांविधानिक लिफाफा”असे लिहिलेले आठ लिफाफ्याचे  पहिले पाकीट 9)”असांविधानिक लिफाफा” असे लिहिलेल्या सहा लिफाफ्याचे दुसरे पाकीट 10)निवडणूक साहित्य इत्यादीच्या आठ बाबी असलेले तिसरे पाकीट  11)इतर बाबी असल्यास, सर्व वस्तूंचे चौथे पाकीट. (टिप-१ वर उल्लेख केलेल्या एखाद्या लिफाफ्यामध्ये विवरणपत्र ठेवण्याची आवश्यकता नसली तरी सुध्दा त्या लिफाफ्यामध्ये एका चिठ्ठीवर “काही नाही” असे लिहावे आणि लिफाफे तयार करावे)

        परतीचा प्रवास – मतदान संपल्यानंतर वरीलप्रमाणे सर्व साहित्य मोहरबंद करून तयार ठेवा. सर्व साहित्य सोबत सुस्थितीत घेतल्याची खात्री करा. परतीचा मार्ग प्रवासानुसार आपणांस घेण्यासाठी येणाऱ्या अधिकृत वाहनांनीच प्रवास करावा. सोबत पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी ठेवावेत. टेबलनिहाय द्यावयाचे साहित्य लावून घ्यावे. सर्व साहित्य परत करून पोच व कार्यमुक्त आदेश घेऊनच साहित्य स्‍वीकृती केंद्र सोडावे.

        निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान – निवडणुकीच्‍या कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे आपले मत नोंदविता येईल.  टपाली मतपत्रिका मागणीचा नमुना 12 मधील अर्ज पहिल्या प्रशिक्षणदिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. हा अर्ज भरून संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे दुसऱ्या प्रशिक्षणाचे वेळी सादर करण्यात यावा. प्रशिक्षणाच्या ठिकाणी टपाली मतपत्रिकासाठीचे सहायता केंद्र तयार करण्यात येईल, त्या ठिकाणी टपाली मतदानाबाबत आपणास कार्यवाही  करता येईल.

            या लेखामध्‍ये महत्त्वाच्या सूचना थोडक्यात नमूद केल्या आहेत.  सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी आयोगाच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये आलेल्या अडी-अडचणीबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे, आत्मविश्वासाने आणि संघभावनेने पार पडेल, याची खात्री आहे.

                                राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती  अधिकारी,  पुणे

सिस्कातर्फे अद्यावत BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्स लाँच

0

नवा स्पीकर अतिशय खास पोर्टेबल म्युझिक प्लेयर असून घरी तसे बाहेरच्या वापरासाठी सर्वोत्तम

मुंबई – सिस्का अक्सेसरीज या मोबाइल अक्सेसरीज क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने BT4070X हा पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर लाँच केला आहे. या वायरलेस ब्लुटुथ स्पीकरमधे एचडी बेस बसवण्यात आल्यामुळे तो संगीताला सुस्पष्ट ध्वनी देतो. सिस्काने वजनाला हलके आणि आटोपशीर स्पीकर्स लाँच केले आहेत, जे घरगुती पार्टीज आणि आउटडोअर ट्रेक्ससाठी अगदी योग्य आहेत.

सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सद्वारे 4वॉट्सचे ताकदवान आउटपुट, 50 एमएमचे बेस ड्रायव्हर्स दिले जातात तसच त्यासोबत एक मायक्रो युएसबी केबलही दिली जाते. सिस्का मोबाइल अक्सेसरीजद्वारे ब्लुटुथ इयरफोन्स, पॉवर बँक्स, वायरलेस हेडसेट्स, कार चार्जर्स आणि अशा बऱ्याच उच्च दर्जाच्या उत्पादनांची श्रेणी उपलब्ध केली जाते.

उद्योगक्षेत्रातील अहवालानुसार भारतीय वायरलेस स्पीकर्सची बाजारपेठ 2020- 2025 दरम्यान 10 टक्के सीएजीआरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. स्मार्टफोन्सचा वाढता वापर, कमी दरांत उपलब्ध होणारे इंटरनेट, पोर्टटेबिलीटी आणि लवचिकता यांसाठी असलेली वाढती मागणी, वेगवान तंत्रज्ञान विकास आणि अवलंब इत्यादी घटक या बाजारपेठेच्या विकासात महत्त्वाचे ठरत आहेत.

नव्या वायरलेस स्पीकर्सच्या लाँचविषयी सिस्का समूहाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्सना उत्तमचंदानी म्हणाल्या, ‘सिस्कामधे आम्ही ग्राहकांना नवी आणि नाविन्यपूर्ण तसेच वापरण्यास सोपी व उच्च दर्जाची उत्पादने पुरवण्यासाठी बांधील आहोत. आमचे अद्यावत उत्पादन – सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्स या दोन्ही गोष्टी देणारे तसेच भारतीय बनावटीचे असल्यामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत मिशनशी सुसंगत आहे. वायरलेस तंत्रज्ञान हे आपले भविष्य असल्यावर आमचा विश्वास असून अशाप्रकारच्या उत्पादनांना ग्राहकांकडून मिळणारी वाढती मागणी लक्षात घेता आम्ही ग्राहकांना सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्सच्या माध्यमातून पैशांचे पूर्ण मूल्य आणि सोयीस्करपणा देणार आहोत.’

सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सची महत्त्वाची वैशिष्ट्ये –

·         बीआयएस प्रमाणित  सिस्का वायरलेस स्पीकर्स बीआयएस प्रमाणित असून त्यामधे डीसी पोर्ट चार्ज करण्यासाठी मायक्रो युएसबी केबल दिली जाते.

·         सक्रिय वेळ आणि आउटपुट – सिस्का BT4070X द्वारे 4 वॅट्सचे पॉवर आउटपुट आणि 50 एमएमचा बेस ड्रायव्हर साइज दिला जातो. त्याशिवाय यामधील पॅसिव्ह रेडिएर उच्च दर्जाचे बुस्ट देते. स्पीकर्सचा सक्रिय वेळ 4 तासांपर्यंतचा असून कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्हाला तुम्या आवडीचे संगीत ऐकता येते.

·         वजनास हलका आणि पोर्टेबल – या स्पीकर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तो वजनास हलका व आकाराने आटोपशीर असून सहजपणे बॅगमधे ठेवून कुठेही नेता येतो.

·         एचडी बेस साउंड – स्पीकर्सद्वारे एचडी बेस ध्वनी दिला जात असल्यामुळे संगीत जास्त स्पष्टपणे ऐकता येते व पर्यायाने याच्या बुस्टिंग तंत्रज्ञानासह संगीत ऐकण्याचा अनुभव आणखी दर्जेदार होतो. याची फ्रीक्वेन्सी श्रेणी 60Hz ते 20KHz आहे.

·         विविध बटन्स – BT4070X वेगवेगळी बटन्स देण्यात आली आहेत, उदा. गाणे बदलण्यासाठी शॉर्ट प्रेस, आवाज, प्ले किंवा पॉज अथवा फोन करण्यासाठी, पॉवर ऑन/ऑफ आणि एलईडी इंडिकेटरसाठी लाँग प्रेस.

·         इनपुट्स – या स्पीकरमधे 4 पोर्ट्स – 1 ऑक्झिलर वायरसाठी 3.5 एमएम ऑडिओ जॅकसह, टीएफ कार्ड स्लॉट (मायक्रो एसडी कार्डसह), युएसबी – ए स्लॉट आणि मायक्रो युएसबी स्लॉटसह देण्यात आले आहेत.

·         मेड इन इंडिया – सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सचे उत्पादन भारतात करण्यात आले आहे.

·         सोपी कम्पॅटिबिलीटी – सिस्का स्पीकर्स खऱ्या अर्थाने वायरलेस असून ब्लुटुथ तंत्रज्ञानाचा वार करून सहजपणे तुमच्या स्मार्टफोनशी जोडले जाऊ शकतात.

सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्सची किंमत 1499 रुपये असून ते आघाडीच्या रिटेल दालनांतून खरेदी करता येतील. या उत्पादनावर 12 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली असून ते काळा, निळा व करड्या रंगांत उपलब्ध आहे.

सिस्का अक्सेसरीजविषयी

आजचे जग कनेक्टेड आहे आणि उपकरणे प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहेत. सिस्का अक्सेसरीजतर्फे अत्याधुनिक आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आलेली अक्सेसरीजची श्रेणी तुमचा अनुभव समृद्ध करणारी आहेत. वायरलेस स्पीकर्सपासून हेडसेट्सआणि इयरफोन्सपर्यंत, पॉवर बँक्सपासून ट्रॅव्हल आणि कार चार्जर्स, चार्जिंग आणि सिंक केबल्सपर्यंत सिस्का अक्सेसरीजतर्फे केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचीनाविन्यपूर्ण व वापरण्यास सोपी उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. सिस्का अक्सेसरीजची उत्पादने उच्च दर्जाची आणि वाजवी किंमतीत उपलब्ध असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यासाठी सिस्का अक्सेसरीज आघाडीची दालने तसेच ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

अमेरिकेच्या FDA ने पहिल्या सेल्फ टेस्ट किटला दिली मंजूरी, याने 30 मिनिटांत मिळतो रिजल्ट

0

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंजूरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून घरीच कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. या माध्यमातून 30 मिनिटांत रिजल्ट मिळतो.असा दावा केला जातोय .

ल्यूकिरा हेल्थने केली निर्मिती
USFDA कडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, या सिंगल यूज टेस्ट किटची निर्मिती ल्यूकिरा हेल्थने केली आहे. याचा वापर एमरजेंसीमध्ये केला जाऊ शकतो. या किटच्या माध्यमातून स्वतः नाकातून स्वॅब सँपल टेस्ट केली जाऊ शकते. USFDA नुसार, 14 वर्षे किंवा यापेक्षा मोठे लोक या किटच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट करु शकतात.

घरीच रिजल्ट देणारी ही पहिली किट
USFDA चे कमिश्नर स्टीफन हान यांनी म्हटले की, आतापर्यंत घरी जाऊन कोविड-19 टेस्टचे सँपल घेण्यासाठी परवानगी होती. याचा रिजल्ट नंतर यायचा. ही पहिली अशी किट आहे, ज्याचा वापर स्वतः केला जाऊ शकतो आणि हे घरीच रिजल्ट देते. USFDA ने म्हटले की, या किटचा वापर रुग्णालयांमध्येही केला जाऊ शकतो. मात्र 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींच्या टेस्टसाठी सँपल एखाद्या हेल्थ वर्करनेच घ्यावे.

अमेरिकेत पुढच्या वर्षाच्या जुलैपर्यंत सर्वांना दिली जाणार कोरोना लस
अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यापासून हे अभियान सुरू होईल आणि आशा आहे की, डिसेंबरच्या अखेरपर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते. एप्रिलपर्यंत येथे व्हॅक्सीनचे 70 कोटी डोज तयार होतील. या हिशोबाने अमेरिकेच्या सर्व नागरिकांना लस देण्याचे काम एप्रिल ते जुलै या काळात पूर्ण होईल. मॉडर्ना आणि फायजरने जी व्हॅक्सिन तयार केली आहे त्याचे दोन डोज एका व्यक्तीला द्यावे लागतील.

कार्तिकी वारी मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0

मुंबई: राज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पंढरपूर येथील कार्तिकी वारीसाठी विविध सुविधा आणि सुरक्षेसाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, बांधकाम विभागाचे सचिव अ.ब. गायकवाड, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्र.पु.बडगेरी, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज. मोघे, एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष माधव शिवणीकर, विश्वस्त श्रीकांत महाराज ठाकूर, ज्ञानेश्वर तुळशिदास महाराज, नामदेव महाराज चौधरी, समस्त वारकरी फड दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगांवकर, आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर येथील कार्तिकी वारी आणि 8 डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत वारकऱ्यांच्या पालख्यांसाठी 34 विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी. यासाठी सर्व्हे करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या मार्गांवरून पालखी जाते, त्या रस्त्यांची डागडुजी विविध रस्ते बांधणी योजनेंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटात होतील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. पटोले यांनी दिले.

वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वयसाधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अध्यक्ष श्री. पटोले यांनी दिले. यात्राकाळात नदीपात्रात वाहते पाणी राहील अशी व्यवस्था व्हावी, मठांची घरपट्टी, पाणीपट्टी यासंदर्भातही चर्चा यावेळी करण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समस्या जाणून घेवून वारकरी बांधवांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले.

कोविडकाळात नवजात शिशु व मातांची योग्य काळजी घ्यावी

0

मुंबई, दि. १८ : कोविड संसर्गाच्या काळात नवजात बालक व मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या काळात नवजात शिशु व माता मृत्यूदर कमी करण्यासाठी गर्भवती महिलेचे आरोग्य व पोषण आहार, रुग्णालयातील सुविधा व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. माता व नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य विभाग, युनिसेफच्या वतीने नवजात शिशु सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात व्यक्त केले गेले.

महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्यावतीने राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादातील चर्चेनंतर सहभागी संस्थांच्या वतीने डॉ. मृदुला फडके यांनी संयुक्त निवेदन सादर केले.

डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, पाच वर्षाखालील बालकांचे तसेच मातांचे मृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. सन 1997 ते 2016-18 या दरम्यान राज्यातील माता मृत्यू दर हा 166 वरून 46 एवढा खाली आला आहे. तर पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा सन 2007 ते 2018 दरम्यान 42 वरून 22 वर आला आहे. माता मृत्यू व बालक मृत्यू दर आणखी खाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा, प्रसुती केंद्रातील सुविधांचा दर्जा राखणे, नवजात बालक केअर युनिटची सोय, सर्वच बालकांना समान सोयी आदींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. प्रसुती खोलीत गर्भवती महिलेची व नवजात शिशुची योग्य ती काळजी घेतली जावी.

कोविड काळात गर्भवती महिला, नवजात बालके व मातांची योग्य काळजी घेण्यात यावी. सर्व आरोग्य विषयक यंत्रणांनी प्रसुतीच्या वेळी संरक्षणात्मक उपकरणे पुरवावीत तसेच शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, श्वसनसंबंधी स्वच्छता राखणे आदी काळजी सर्वच संबंधितांनी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्था, आरोग्य विषयक काम करणारे व्यावसायिक व आरोग्य यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन या संयुक्त निवेदनात करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. राजेश्वरी चव्हाण यांनी महिलांच्या विशेषतः गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यू होत असल्याचे सांगितले. त्यासाठी महिलांनी ॲनिमिया दूर करून आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोविड काळात महिलांमध्ये जनजागृतीसाठी आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये सायकोसोशल सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून नागरिकांचे मानसिक प्रबोधन करण्यात येत असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.

गायनॅकोलॉजिस्ट असोसिएशनच्या डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या की, कोविड काळात माता व नवजात शिशुंची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाच्या माध्यमातून खासगी डॉक्टरही प्रबोधन करत आहेत.

नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. एल.एस देशमुख म्हणाले, नवजात बालक मृत्यू दर कमी करण्यासाठी कांगाऊ मदर केअर संकल्पना राबविण्यात यावी. तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून बालक जन्मल्यानंतर पहिल्या काही तासात त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.

पेडियाट्रिशियन प्रा. प्रमोद जोग म्हणाले की, वेळेपूर्वीच बालकांचा जन्म, विषाणू संसर्ग यामुळेही बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यू टाळण्यासाठी बालक व मातांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. डॉ. अपर्णा श्रोत्री यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. युनिसेफच्या स्वाती मोहपात्रा व खणेंद्र भुयान यांनी परिसंवादाचे संचालन केले.

आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

0

नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकरी अभियंता योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे कार्य आदर्शवत आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग हा एक प्रकारे दिशादर्शकाची भूमिका बजावत असून यासोबतच उच्चशिक्षित तरूणांना या कार्यक्षेत्रात संधी दिल्यास त्यांच्या सहभागातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थेची उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व व भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून संस्थेने सुयोग्य पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीवाटप केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक ‍स्थितीत सुधारणा होईल. परिणामी शेतकरी सधन होऊन संस्थाही आपोआपच समृद्ध होईल. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रस्तेबांधणी अशा सुधारणांकडे प्रभावीपणे लक्ष देवून लोकांच्या हिताचेच काम करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमात जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांच्यासमवेत उपस्थितांनी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या कै. भरतभाऊ कावळे यांना श्रद्धांजली वाहिली.

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागा

0

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (७ जागा)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ३ वर्षांचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत) (५ जागा)

शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य, ३ वर्षांचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी

मुलाखतीचा दिनांक : दि. २५ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : www.umc.gov.in

तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा

0


मुबंई दि. १७ -राज्य सरकार जोपर्यंत वाढीव वीज बिलाबाबत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही.असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला तसेच ४ महिन्यांपासून सरकार टोलवाटोलवी करत आहे, अगोदर ग्राहकांना दिलासा द्या असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतलाय. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही,मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत,असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. त्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की,वीजबिलं चुकीची,वाढीव दिलेली आहेत. सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करा, मग “दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.” कोरोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले.हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा आहे,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

0

पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव
पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे १६)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव
वयोमर्यादा :- अ) संचालक पदासाठी कमाल ५० वर्षे ब) उपसंचालक पदासाठी कमाल ४० वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f5LhQ8
अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in

बोरिवली हनुमान मंदिर येथे साजरा झाला आनंदोत्सव

0

मुंबई – संकटाच्या काळात आम्ही सुख ,समाधान, शांती परमेश्वराच्या पायी शोधात असतो. आज मंदिरावर अवलंबून छोटे- मोठे व्यवसायही बंद आहेत त्यामुळे त्यांची उपासमार होत होती.त्यासाठी मंदिर उघडणं आवश्यक असल्याची सांप्रदायिक मंडळीची मागणी होती, त्या मागणीला भाजपाने पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा दबाव व जनतेचा रेटा यामुळेच सरकारला मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
बोरीवली अशोकवन हनुमान मंदीरासमोर भाजप कार्यकर्त्यांसोबत मंदिर उघडल्याबद्द्ल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्यातील सरकार पाडून दाखवा..पाडून दाखवा… असे कोणीही बोलले नसताना त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच त्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्य़ाची सारखी भीती वाटत असावी, असा टोला दरेकर यांनी मारला.
यावेळी भाजप मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेविका प्रितम पंडागळे, ॲड. शिवाजी चोगुले, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी भोसले, महामंत्री ललित शुक्ला आदि उपस्थित होते.
मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्रातून उठाव झाला. सांप्रदायिक मंडळी मंदिर उघडण्यासाठी पुढे आली. मंदिरावर ज्यांच्या उपजिविका अंवलंबून आहेत त्यांनीही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाने मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच भाजप यामध्ये सहभागी झाली होती, त्यामुळे या आंदोलनामध्ये कोणता पक्ष प्रामाणिकपणे उतरला होता, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मूल्याध्याष्ठित पीढी घडविण्याची गरज-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

0

पुणे, ता. १७ : सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, शक्तिशाली आणि जगातील आर्थिक महासत्ता असणारा आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्ती मार्गांतून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांवर करून मूल्याध्याष्ठित पीढी घडविण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक‘मात गडकरी मार्गदर्शन करीत होते. मएसोचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट. अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘शिक्षणावर होणार्‍या खर्चातून देशातील पीढी संस्कारीत करुन त्यातून व्यक्तिनिर्माण करण्याचे कार्य शिक्षण संस्था करीत असतात. देशाचा विकास करायचा असला तर शिक्षण क्षेत्रात कुठल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, याबाबतचा जीवन दृष्टिकोन बाळगून भविष्याच्या निर्मितीसाठी देशाला ‘ऍप्रोप्रिएट व्हिजन’ देण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने केले आहे.’

गडकरी पुढे म्हणाले, ‘शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवायचे आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यता, कौशल्य, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांतील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. तसेच विकासाचा समतोल राखताना व्यक्ती संस्कारीत होऊन त्याचे जीवन परिपूर्ण व्हावे यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात समरसता आणि समता निर्माण होऊन आत्मनिर्भर भारतासाठी अनुरूप शिक्षण दिले पाहिजे.’

गोखले म्हणाले, ‘शिक्षक आपल्या परीने विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. त्याद्वारे दुसर्‍यांना घडवू शकू असे व्यक्तिमत्व निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थी गुगल, विकिपीडियाद्वारे माहिती मिळवत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा एक पायरी पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी शिक्षण थांबवू नये. कायम शिकत राहिले पाहिजे. शिक्षण हा मूलभूत पाया आहे. त्याद्वारे आपण पुढे जाऊ शकतो.’

वर्षा तोरडमल यांनी सूत्रसंचालन केले. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार मानले.

एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदे भरणार

0

एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदे
Team DGIPR द्वारा
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख : ०४ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3nqA27U
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2UCalF0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतीदिन:स्मृतीस्थळावर अभिवादन

0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर आले होते.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला अभिवादन केले.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जात असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट आहे. यामुळे गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.