पुणे, शहरी, ग्रामीण किंवा गरीब, श्रीमंत यातील अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान हा पर्याय आहे. त्यासाठी शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे मत पर्सिस्टंट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्ङ्गे (डीईएस) या वर्षीचा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार हरसूल येथील ‘कन्या छायात्रय’ या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थिनींना शिक्षण, संगोपन आणि सर्वांगिण विकासासाठी काम करणार्या संस्थेला ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आला.
एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कन्या छात्रालयाच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. देशपांडे यांनी पुरस्काराच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचे जाहीर केले.
डॉ. देशपांडे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सह-कार्यवाह प्रा. स्वाती जोगळेकर, मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम नेर्लेकर, ङ्गर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, कन्या छात्रालयचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सचिव ऍड विनीत महाजन, कोषाध्यक्ष प्रा. हेमंत गोलविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासींची पारंपरिक शिकवण सर्वापर्यंत पोहोचली पाहिजे, ग‘ामीण संस्कृतीची ओळख होण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गावाकडे पाठवावे, पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकांवर भर द्यावा आणि रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाला प्राधान्य द्यावे, असेही डॉ. देशपांडे यांनी पुढे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज म्हणाले, ‘स्वातंत्र्य प्राप्तीला ७० हून अधिक वर्षे झाली तरी आदीवासी भागात अपेक्षित मदत पोहोचलेली नाही. सर्वांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. वंचित समाजातील घटकांपर्यंत मदत मिळावी यासाठी शाळा निर्माण केल्या पाहिजेत.’
कन्या छात्रालयाचे अध्यक्ष रत्नपारखी म्हणाले, ‘गेली ३९ वर्षे संस्थेच्या माध्यमातून ७०० हून अधिक आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो. विविध क्षेत्रांत विद्यार्थिनी चांगली कामगिरी करीत आहेत. ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत ही शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क‘ीडा संकुल आणि आणखी एक वसतिगृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.’
डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी प्रास्ताविक भाषण केले. सह-कार्यवाह प्रा. स्वाती जोगळेकर यांनी परिचय करून दिला, आजीव सदस्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.