पुणे : निशस्त्र आणि निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे, संजीवनी देण्याचे आणि प्रेरक विचाराने भारून टाकण्याचे काम लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखनातून झाले. या दोघांनी केलेले लिखाण शतकावरती भाष्य करणारे होते, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) परिषदेचे सदस्य नितीन आपटे यांनी व्यक्त केले.
डीईएसच्या वतीने सावरकरांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर व्या‘यानमाले’च्या समारोपात ‘टिळक आणि सावरकर’ या विषयावरील पुष्प गुंङ्गताना ऍड. आपटे बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माचे अध्यक्षस्थानी होते.
योगेश सोमण यांचे ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय-अभिनव भारत स्थापना आणि कार्य’, वैभव पुरंदरे यांचे ‘सावरकर आणि विवाद’, अक्षय जोग यांचे ‘समाजसुधारक सावरकर’, विक‘म संपत यांचे ‘क‘ांतिकारक सावरकर’ आणि मीना प्रभू यांचे ‘अंदमान पर्व’ या विषयांवरील व्या‘याने झाली. सावरकर डीईएसच्या ङ्गर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगण्याच्या उद्देशाने या व्या‘यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
ऍड. आपटे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी शिक्षण संस्थातून राष्ट्रभक्तीचे संस्कार केले. समाज मानस घडविण्याचे काम केसरीने केले. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहिले. त्या माध्यमातून भगवत गीतेचा संजीवन मंत्र देऊन समाजाला जागृत करणे हा उद्देश होता.’
ऍड. आपटे पुढे म्हणाले, ‘१८५७ चा स्वातंत्र्य लढा हे इंग‘ज म्हणतात त्याप्रमाणे शिपायांचे बंड नव्हते हे प्रतिपादन करणारा ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग‘ंथ सावरकरांनी लंडनमध्ये बि‘टिशांची इतिहासाची साधने वापरून लिहिला. हा ग‘ंथ क‘ांतिकारकांची महागीता ठरला. सावरकरांनी हिंदुत्व हा ग‘ंथ लिहून समाजात जागृती केली. हिंदु समाजाच्या पायातील सात बेड्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. आसेतु हिमालय अशा भारत वर्षाला मी जो माणूस या भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू अशी व्या‘या केली. त्यामुळे भारतात आलेले बौध्द, जैन, शीख, लिंगायत हे सव धर्र्म पंथ हिंदू मध्ये समावेश होतो. सावरकरांना मानवतावाद महत्त्वाचा वाटत होता.’
ऍड. आपटे पुढे म्हणाले, ‘टिळक आणि सावरकर दोघेही जण ज्ञानमार्गी होते. अत्यंत डोळसपणे समाजातील दोष, दुर्दैवी चालीरीती ओळखून त्यातून मार्ग काढणारे समाजाला आणि धर्माला पुढे नेणारे होते. समाज निद्रितावस्थेत होता. त्याला जागे करण्याचे कार्य या दोघांनी लेखणीच्या माध्यमातून केले.
डॉ. कुंटे म्हणाले, ‘ज्ञान, कर्म आणि भक्ती या गीतेतील तत्त्वांचा संगम टिळक आणि सावरकरांमध्ये होता. समाजाचे उत्थान करण्यासाठी त्या दोघांनी लेखन केले. हजारो युवकांमध्ये क‘ांतीची ज्योत पेटविण्याचे कार्य या दोघांनी केले. आज ५० वर्षे उलटल्यावरही आपल्याला सावरकर समजले नाहीत.’