पुणे:१५:भारतीय जनता युवा मोर्चा कसबा मतदारसंघाच्या वतीने सीमेवर लढत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना पणत्या लावून अभिवादन करण्यात आले
महात्मा फुले वाड्यामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने ,पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर ,कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे ,राजेंद्र काकडे ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक ,महिला अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या वेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले ‘सीमेवर कुठल्याही परिस्थिती चा विचार न करता वीर जवान आपल्या जीवाची बाजी लावतात त्यांच्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो त्यांना कुठलाही सण साजरा करता येत नाही परंतु त्याची खंत मनात न बाळगता आपले कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांना मानवंदना ही दिलीच पाहिजे’
या कार्यक्रमाचे आयोजन कसबा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी केले