Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

12वीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय, अंतर्गत मूल्यांकनातून गुण किंवा नंतर परीक्षा द्या

Date:

नवी दिल्ली. सीबीएसई आणि सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही मंडळांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाची माहिती दिली. मात्र, मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कोणताही निकाल दिला नाही. न्यायालयाने शुक्रवारी १०.३० वाजेपर्यंत पर्यायी परीक्षा आणि निकालाशी संबंधित विविध बाबींवर सरकारकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे अंतिम सुनावणी होईल.

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली होती. तर कोरोनामुळे १२वीची परीक्षा थांबवावी लागली. ती जुलैमध्ये होणार होती. मात्र त्या रद्द कराव्या व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याची मागणी करत काही पालक सुप्रीम कोर्टात गेले होते.

आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणीही फेटाळली

– सरकारच्या स्पष्टीकरणातून समाधान न झाल्याने कोर्टाने शुक्रवारी सकाळपर्यंत सुनावणी स्थगित करत सीबीएसईला कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. सरकारकडून सर्व मुद्द्यांवर नव्याने म्हणणे मागवले.

– एका वकिलाने २८ जूनची आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली. यावर न्या. खानविलकर यांनी सुनावले की, संबंधितांना येऊ द्या. आम्ही येथे बसून संस्था चालवू शकत नाही.

केंद्राने सांगितले-मूल्यांकनाच्या आधारे १०वी-१२वीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. वाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी लाइव्ह…

– तुषार मेहता : दहावी आणि बारावीच्या जुलैत होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. महामारीत परिस्थिती भयावह आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूनेही परीक्षा घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर १२वी उर्वरित परीक्षा होऊ शकते.

– ऋषी मल्होत्रा (पालकांचे वकील): यामुळे शैक्षणिक सत्राला उशीर होईल. स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना गमवावी लागेल.

– न्या. खानविलकर: निकाल केव्हा जाहीर होईल हे सरकारने सांगावे. नवे शैक्षणिक सत्र कसे निश्चित केले जाईल? जर तुम्ही १२ची परीक्षा भविष्यात पुन्हा कधी घेणार असाल तर इतर परीक्षादेखील स्थगित कराव्या लागतील. परीक्षा ऑगस्टमध्ये झाली तर शैक्षणिक सत्र सप्टेंबरमध्ये सुरू होईल.

– मेहता : नामांकन आता केवळ अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे होईल. विद्यार्थी त्याआधारे फॉर्म भरू शकतील. मूल्यांकनाच्या आधारे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केले जातील.

कोर्टाने परीक्षा घेण्याबद्दल, निकालाबाबत माहिती मागवली

– आयसीएसई: १०वी आणि १२वी या दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांना आता नंतर परीक्षा देण्याची गरज नाही.

– कर्नाटकात गुरुवारी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे ८.४० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसरीकडे लखनऊ विद्यापीठाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांना विरोध करत त्या स्थगित करण्याची मागणी केली.

शिक्षण मंडळाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

सीबीएसई : दहावीची परीक्षा होणार नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे त्यांना गुण दिले जातील.

– बारावीची १ ते १५ जुलैदरम्यान होणारी परीक्षा स्थगित. विद्यार्थ्यांना मागील तीन परीक्षांच्या आधारे अंतर्गत मूल्यांकन करून गुण दिले जातील. ज्यांना हा पर्याय मान्य नसेल त्या विद्यार्थ्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर होणारी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आयसीएसई : दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा रद्द. बारावीच्या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा द्यावी लागणार नाही.

शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर

सीबीएसईने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय पात्रता परीक्षा सीईटी पुढे ढकलली. मंत्री रमेशकुमार पोखरियाल यांनी ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान पुणे : पुराण...