पुणे ..: “विल्सन्स डिसिज” या दुर्मिळ आजारावर औषध असणार्या ‘पेनिसिलॅमेण’ या गोळ्यांचा गेल्या चार पाच महिन्यांपासून तुटवडा भासत आहे. परिणामी या रुग्णांना समस्या उद्धभवत आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या ही बाब निदर्शनास आल्या नंतर याची दखल घेत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून त्यांनी हे औषध रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
जनुकीय आजार असलेल्या ‘विल्सन्स डिसिजमुळे’ यकृत, मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवयांमध्ये तांबे जमा होते. रूग्णाला वेळीच औषध न मिळाल्यास अवयव निकामी होऊ शकतात. देशात या आजाराचे अनेक रुग्ण आहेत या पैकी बहुतांश बालरुग्ण आहेत. शरीरात तांब्याचे शोषण कमी व्हावे म्हणून रुग्णांना काही गोळ्यांचा डोस कमी करून झिंक दिले जात होते. मात्र गोळ्यांच्या प्रमाणात त्याचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे या आजारावर तातडीने औषध मिळणे गरजेचे होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनाची दखल घेत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडे पाठपुरावा केला. श्री बापट यांनी 7 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत केंद्र तसेच राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्या नंतर या गोळ्यांना लागणारा कच्चा माल चीन मधून पुरवला जात होता, गेल्या काही दिवसापासून चीन मधून येणारा कच्चा माल बंद झाल्याने गोळ्यांच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. तसेच या औषधांचे उत्पादन करणार्या भारतीय कंपनीनेही काही कारणास्तव गोळ्यांचे उत्पादन थांबवले असल्याने या गोळ्यांचा देशात तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली. श्री बापट यांच्या पाठपुराव्या नंतर केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य महासंचालक यांनी 8 नोव्हेंबर रोजी तातडीची गरज असणार्या रुग्णांनी 91-9350588528 या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉटस्अॅप, TwitterHandle@cialmin250 या ग्रुपवर तसेच www.cialmin.com या वेबसाईटवरही संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.