मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या लोककलावंताना जनजागृतीचे कार्यक्रम देण्यासंबंधी सांस्कृतिक कार्य संचालनालय आता उशिरा का होईना “जागृत” झाले असले तरी,नेमके कार्यक्रमाची रूपरेषा काय असावी यावर कोणताही निर्णय संचालनालयाने घेतला नसल्यामुळे सध्या लोक कलावंतांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोना या महामारीच्या संकटात महाराष्ट्रातील लोक कलावंत होरपळून निघाला आहे.आम्हाला काही तरी आर्थिक मदत करा.अशी याचना गेले सात -आठ महिन्यापासून कलावंत करीत होते.मात्र सरकारने यावर काहीच निर्णय घेतलेला नाही.
परंतु दोन दिवसांपूर्वीच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी लोककलावंतांना जनजागृतीचे कार्यक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे.त्या संबंधी सांस्कृतिक कार्य संचालनालयाला नियमावली आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याचे निर्देश दिले.परंतु कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्या आधीच लोककलावंतांमध्ये सदर बातमी वाऱ्या सारखी पसरली,
जनजागृतीचे कार्यक्रम नेमके कोणत्या कला प्रकाराला देणार आहेत, कार्यक्रमासाठी एका कला पथकात किती कलाकार असणार आहेत.प्रत्येक कलावंताला किती मानधन देण्यात येणार आहे.अशी कोणतीही अधिकृती नियमावली सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तयार केलेली नसतानाही , सध्या अनेकांनी कलावंतांना संपर्क करून लवकर सांस्कृतिक कार्य संचालनालयाला आपल्या फाईली जमा करा.अशा सूचना देवू कलावंतांमध्ये गैरसमज पसरवू दिले आहेत.
याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालय नेमके कोणत्या लोककलावंतांना जनजागृतीचे कार्यक्रम देणार आहे. हे अद्याप ठरविलेले नसताना, आणि सरकारने कोणीही अधिकृत योजना अद्याप जाहीर केलेली नसताना सध्या लोकलावंतांमध्ये कोण संभ्रम निर्माण करीत आहे.असा प्रश्न लोककलावंतानी उपस्थित केला आहे. याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषन चवरे हे सुद्धा अनभिज्ञ आहेत. त्यांचे कोणतेही मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य।विभागाने किंवा मंत्री कार्यालयाने घेतले नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यात गोंधळात गोंधळ सुरुच आहे.