Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोळगावमधील अमानवीय घटनेप्रकरणी गुन्हे दाखल करा!

Date:

बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुंबई-पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.तालुक्यातील कोळगावात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तरुणांची अमानवीय हेटाळणी करीत त्यांची धिंड काढण्यात आली.या प्रकरणाची सखोल तपासणी करीत दोषींविरोधात तसेच स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी केली. यासंबंधी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.दोषीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा आक्रमक इशारा देखील अँड.ताजने यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्हा दलितांवर घडणाऱ्या अत्याचाराची राजधानी झाली आहे. यापूर्वी झालेले सोनई आणि कोपर्डी हत्याकांडाने संपूर्ण राज्य तसेच देश हादरले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे सरकार असो, भाजप-शिवसेनेचे सरकार असो, महाविकास आघाडीचे सरकार असो अथवा आता शिंदे-फडणवीस सरकार असो दलितांवरील अत्याचारात कुठलीही घट झालेली नाही. सर्वच सरकारच्या काळात दलितांचे शोषण होतच राहीले, असा दावा त्यांनी यानिमित्ताने केला. चर्मकार, मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांचे मुंडन करून गावातून ४ तास धिंड काढण्यात आली. मानवतेला काळीमा फासणारी आणि फुले-शाहु-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे नाव बदनाम करणारी ही घटना आहे.महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडणे निंदनीय आहे.भाजप सत्तेवर येताच राज्यात बहुजनांवर अशाप्रकारचे अत्याचार सुरू झाल्याचे दिसून आल्याने हे कुठल्या विचारांचे सरकार आहे, याची प्रचिती येत असल्याचे अँड.ताजने म्हणाले.
या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.इतर गरीब समाजातील कुटुंबांना त्याची सामाजिक, धार्मिक जरब बसावी, त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, समाजात धार्मिक तेढ निर्माण व्हावा असा उद्देश या घटनेमागे असल्याचे दिसून येत आहे.फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात वेगळ्या वाटेवरच्या या पाऊलखुणा समाज माध्यमांवर पडत असल्याचे षडयंत्र असामाजिक तत्वांकडून निर्माण केले जाते आहे, असे अँड.ताजने म्हणाले. दरम्यान सदर घटनेचा व्हिडीओ जगभरात समाज माध्यमांवर व्हायरल केला गेला असून भारताच्या एकता-अखंडता,सामाजिक सौहार्दाचे त्यामुळे धिंडवडे निघत आहेत. अशात या प्रकरणातील जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात दखल घेत कडक कारवाई करावी, अशी विनंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आजही मागासवर्गीयांचे जगण्याचे अधिकार हिरावले जात आहे.त्यांना संशयित दृष्टीतून बघितले जाते.नव्या मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्त्वाच्या अजेंड्यात हिंदु मागासवर्गीयांच्या धिंडी निघत राहणार आहेत का? त्यांच्या संरक्षणाचे काय? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. ऐरवी फोनवर चर्चा करुन तात्काळ निर्णय घेत कारवाईचे आदेश देणारे मुख्यमंत्री या घटनेतील दोषींना अटकेचे आदेश देणार का? असा सवाल देखील अँड.संदीप ताजने यांनी उपस्थित केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...