पुणे : भाजप सरकारविषयी झालेला भ्रमनिरास, बदलते राजकीय वातावरण आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , मित्रपक्ष आघाडीतील जोश पहाता यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाची विजयी मोहोर उमटेल, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांसमवेत अरविंद शिंदे यांनी रविवारी दारूवाला पूल, कसबा पेठ, सुभाषनगर आदी परिसरात पदयात्रा काढल्या. सध्या राजकीय वातावरण बदलते आहे याची चुणूक लोकांच्या बोलण्यातून जाणवली. नोकरदार, व्यापारी असे समाजातील वेगवेगळे वर्ग आर्थिक कारणाने त्रस्त आहेत. नोकरदारांना भवितव्याची चिंता आहे तर जीएसटीमुळे व्यापारी हैराण आहेत.मंदीचा सामना करावा लागतो आहे. या परिस्थितीमुळे निराश झालेल्या लोकांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी जवळची वाटते, सर्वांना सामावून घेणाऱ्या आघाडीबाबत विश्वास वाटतो, असे शिंदे यांनी चर्चांमध्ये सांगितले.आघाडीतील जोश ‘ कसब्या‘त परिवर्तन घडवेल असे ते म्हणाले.
मतदारसंघात रविवारी निघालेल्या पदयात्रांमध्ये बुवा नलावडे, सुनिल खाटपे, सुजाता शेट्टी,नीता रजपूत, दत्ता सागरे, विद्याताई भोकरे, राजेंद्र भणगे, भाई कात्रे, नरेश नलावडे, मयूर भोकरे, सूर्यकांत मारणे, सतिश मोहोळ, योगेश भोकरे, अरुण गवळे, गणेश नलावडे, राजश्री शिंदे, अर्चना साळुंके, सुप्रिया कांबळे, स्वाती गायकवाड, जितेंद्र भागवत, प्रशांत गांधी, बबलू कोळी, उषाताई काकडे, राहुल राऊत,अजिंक्य पालकर, विवेक भरगुडे,दीपक जगताप, वनिता जगताप,राजश्री कसबेकर, शशिकला बोरकर आदी सहभागी झाले होते