पुणे :” कोरोनावर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक्षमता चांगली असावी, असे जागतिक आरोग्य संघटनाही म्हणत आहे. मानवाची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. प्रत्येक शास्त्राची काही वैशिष्ट्ये असतात. मात्र, आयुर्वेदाने रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी ज्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या प्राचीन शास्त्रावर विश्वास ठेवून या संसर्गाचा सामना आपण करायला हवा,” असे प्रतिपादन प्राचीन संहिता गुरुकुलाचे डॉ. हरीश पाटणकर यांनी केले.
आयुर्वेद आणि होमीयोपॅथीक उपचाराच्या साहाय्याने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विलगीकरण (क्वारंटाईन) केलेल्या ६ हजार रुग्णांच्या तपासण्या ‘निगेटिव्ह’ आल्या असल्याचे ‘आयुष’ मंत्रालयाने एका अहवालावात स्पष्ट केले आहे, असा दावा हि डॉ. पाटणकर यांनी यावेळी बोलताना दिली. आयुष मंत्रालयानेही आयुर्वेदातील अनेक गोष्टीचा रोजच्या जीवनात अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “आयुष मंत्रालयाने दिलेल्या अहवालात ६००० रुग्णांपैकी केवळ ११ रुग्णांची चाचणी ‘पॉजिटीव्ह’ आली आहे. त्याचे कारणही त्यांनी सलग सात दिवस योग्यरीत्या उपचार पूर्ण केले नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की, आयुर्वेदामुळे कोरोनाला ठरविण्याची क्षमता तुमच्याकडे येते. अशा स्थितीत आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी आयुर्वेदाचा चांगला उपयोग करून घ्यावा. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले किंवा पारंपारिक आजारांनी त्रस्त लोकांनी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. चांगला आहार आणि नियमित व्यायाम करावा.”
प्रत्येक शास्त्राचे स्वतः चे असे काही चांगले व वाईट असे दोन्ही भाग असतात. त्यापैकी जेंव्हा आयुर्वेदाच्या बद्दल चांगल्या गोष्टी पहायच्या म्हटलं तर त्या नक्कीच आपल्याला रोग होऊ नये यासाठी व प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आलेल्या पाहायला मिळतील.
याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे कारण हे आपले , भारतीयांचे पूर्वापार चालत आलेले महत्वाचे आरोग्य शास्त्र आहे.चीन ने सुद्धा त्यांच्या पारंपरिक औषधांच्या मदतीनेच यावर नियंत्रण केलेल्याचे अनेक शोध पत्र वाचायला मिळतात.आपणही आपल्या शास्त्राचा फायदा या दुर्धर आजाराशी लढण्यासाठी वापरून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन याला हरविले पाहिजे.
आयुष काढा म्हणून जो सध्या आयुष ने सर्वांसाठी सांगितला आहे, ज्यात तुळस , दालचिनी, सुंठ, मिरे घालून दोन वेळा किमान दिवसातून घ्यायला हवा. याने उत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय दिवसभर कोमट पाणी पिणे, हळद, मीठ पाण्याच्या गुळण्या करणे, रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश खाणे हेही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.”
“थंड पदार्थ, बेकारीतील पदार्थ, बिस्कीट, बुरशीजन्य पदार्थ किंवा कफ वाढेल असे कोणतेही पदार्थ खाणे टाळायला हवे. कारण आयुर्वेदातील ‘घोस्ट आणि होस्ट थिअरी’नुसार कोरोना ‘घोस्ट’ असेल, तर आपल्या शरीरातील कफ हा उत्तम ‘होस्ट’ असणार आहे. त्यामुळे जास्त कफ असणारे लोक या संसर्गाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका अधिक असतो,” असेही डॉ. पाटणकर यांनी नमूद केले.
डॉ. हरीश पाटणकर (९८२३६६१६९९)