पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रिय मंत्री मंडळाची बैठक झाली. या
बैठकीत केंद्र सरकारच्या १ कोटी १५ लाख कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना ५% महागाई भत्ता
देण्याचे घोषित करण्यात आले. महाराष्ट्रात व हरियाणा राज्यात विधानसभेच्या निवडुका चालू
आहेत. याची माहिती असताना सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. अशा
प्रकारची घोषणा करून त्या राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रलोभित करण्याचा हा एक प्रकार
आहे आणि आचारसहिंतेचा भंग केलेला आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांना
महागाई भत्ता देण्यास आमची काहीही हरकत नाही परंतु निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे
पंतप्रधानांनी महागाई भत्त्याची घोषण करून आचारसंहितेचा भंग केला याचा आम्ही आक्षेप
नोंदवितो.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी पंतप्रधानांच्या या
घोषणाचा आक्षेप घेऊन केंद्रिय मुख्य निवडणुक आयुक्तांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली आहे व त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी
मागणी केली आहे.