मुंबई – शिवसेनेकडे सत्ता स्थापनेसाठी पर्याय खुले आहेत, पण ते स्वीकारण्याचे पाप करू इच्छित नाही असे शिवसेना नेते संजय राउत म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावर कुरघोडी सुरूच आहे. या दोन्ही पक्षांनी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. उलट शिवसेना आणि भाजप आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मनवण्याच्या तयारीत आहेत. अशातच सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची वेग-वेगळी भेट घेतली. शिवसेना सातत्याने भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, राज्यात सरकार स्थापनेच्या चर्चेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी एकमेकांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्रात कुणीच ‘दुष्यंत’ नाही -राउत
सरकार स्थापनेसाठी होणाऱ्या विलंबावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना महाहाराष्ट्रत कुणीही दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात असतील असे संजय राउत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपने चौटाला कुटुंबातील दुष्यंत चौटाला यांना उप-मुख्यमंत्री पद देऊन हरियाणात सरकार स्थापित केले. आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजप हाच फॉर्मुला अजमावून पाहण्याच्या प्रयत्नात आहे. त्यावरच खोचक टीका करताना राउत बोलत होते.
शरद पवारांचे केले कौतुक
राउत पुढे म्हणाले, आम्ही सत्याचे राजकारण करतो. शरद पवार यांनी भाजपच्या विरोधात एक वातावरण तयार केले आहे. आणि काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही. यावेळी त्यांनी प्रामुख्याने शरद पवारांचे कौतुक करून भाजपवर पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसने आधीच शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याची ऑफर दिली आहे. भाजपसोबत राहून उप-मुख्यमंत्री किंव अडीच वर्षांचे मुख्यंत्री पद घेणार की आमच्यासोबत येऊन 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद घेणार हे शिवसेनेवर अवलंबून आहे असे काँग्रेसने यापूर्वीच म्हटले आहे.