नवी मुंबई, दि. 09 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोंकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यास आज पासून प्रारंभ झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारला यशस्वी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या शासनाने विविध क्षेत्रांसाठी नवनवीन योजना राबविल्या. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने स्वीकारलेली धोरणे, घेतलेले निर्णय, केलेल्या कार्याची माहिती कोकणाच्या कानाकोपऱ्यात पोहचावी यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे शासकीय योजना व विकास कामांच्या प्रचार व प्रसिध्दीची मोहिम संपूर्ण राज्यभर दि. 9 ते 17 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या प्रसिध्दी मोहिमेचा आज पासून शुभारंभ झाला. कोकण विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विविध लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान #दोन_वर्षे_जनसेवेची_महाविकास_आघाडीची या टॅगलाईनसह सुरु आहे.
आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ठाणे जिल्हयातील खारेगाव, माजिवाडा, बाळकुंभ आणि येऊर तसेच शहापूर तालुक्यातील वाशिंद आणि कल्याण येथील तहसिल कार्यालये, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या वतीने ठाणे जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .
रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड जिल्हयातील म्हसळा, खरसई अलिबाग आणि नागडोंगरी येथील तहसीलदार कार्यालय, बसस्थानक, अलिबाग समुद्रकिनारा, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी रायगड जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले .
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी जिल्हयातील खेड पंचायत समिती कार्यालय, वावे तर्फे नातू, नाणिज, हातखांब, नाटे आणि धाऊलवल्ली बाजारपेठ, बसस्थानक, आणि वर्दळीच्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले .
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पालघर जिल्हयातील बोईसर रेल्वेस्थानक परिसर आणि नालासोपारा बाजारपेठ, बसस्थानक, आणि वर्दळीच्या ठिकाणी पालघर जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .
आज दिवसभरात कोकण विभागात विविध ठिकाणी लोककला माध्यमातून राबविण्यात आलेल्या या प्रसिध्दी मोहिस नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.