पुणे :- क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून जवळपास २५ लाख कामगार जोडले गेले आहेत. बीओसीडब्ल्यूकडे राष्ट्रीय पातळीवर विकासकांमार्फत सुमारे ३०,००० कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बीओसीडब्ल्यू निधीतून कामगारांना पाच हजार देण्याचे आवाहन क्रेडाई महाराष्ट्रतर्फे करण्यात आले.
गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाच्याच्या दुसर्या लाटेत आपली नोकरी विषयीची साशंकता तसेच त्यांचे आरोग्याची होणारी हानी लक्षात घेता मजूर परत आपापल्या गावी जाण्याची भीती आहे. याशिवाय रेरा, बँका आणि ग्राहक यांच्या मागण्या मुदतीच्या पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्र पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु सद्यस्थितीमुळे ते शक्य होत नसल्यामुळे बांधकाम उद्योगावर याचा मोठा नकारात्मक होतो आहे. मजुरांच्या अपुऱ्या संख्येमुळे बांधकाम पूर्ण होण्यास उशीर होता त्यामुळे नुकसान तर होतेच पण रेरात सांगितलेल्या वेळेत काम होणे अशक्य होते शिवाय रेरा मधील अनेक कायदेशीर खटल्यांचा निकालदेखील देता येत नाही. मागच्या वर्षी मजूर मिळविण्यासाठी व्यावसायिकांना ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला होता त्यानंतर सरकारकडून या कामाला ६ महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती पण प्रत्यक्षात ९ महिन्यांपेक्षा जास्त काळ व्यावसायिकांना गमवावा लागला होता.
नियोक्ते बांधकाम खर्चावर १ टक्के दराने कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर सेस (बीओसीडब्ल्यूडब्ल्यू) आकारतात. महाराष्ट्र सरकारने बीओसीडब्ल्यूने मार्फत मागील ६ वर्षात सुमारे १०.२२५ कोटी जमा केले आहेत आणि त्यातील ८ टक्केच कामगारांच्या कल्याणासाठी वापरले आहेत. आणि हि सर्व माहिती सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुख्यमंत्र्यांना आमची आग्रहाची विनंती आहे कि या प्रकरणांत लक्ष घालून बांधकाम मजुरांना बीओसीडब्ल्यूच्या खात्यातून किमान ५००० रुपये मदत करावी. अशी मागणी क्रेडाई महाराष्ट्राचे नवीन अध्यक्ष सुनील फुरडे यांनी केली.
क्रेडाई महाराष्ट्रातील विकसकांनी यापूर्वीच मोफत लसीकरण, कामगार शिबिरांची स्वच्छता, त्यांच्यासाठी जास्तीत स्वछतागृहे उभारणे तसेच त्यांच्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी घेण्याचे सकारात्मक कार्य केले आहेत. गेल्या वर्षी देखील विकसक सदस्यांनी लॉकडाउन असतानाही मोफत अन्न, वेतन आणि निवारा देऊन महामारीच्या आजारात कामगार कल्याणसाठी सर्व आवश्यक पावले उचलली होती.
विविध विषयांवर चर्चा
क्रेडाई नैशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट बोमन इराणी यांनी झूम वर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील फुरडे यांच्यासह ५९ शहरातील ५००हुन अधिक विकसकांसाठी वेबिनारचे आयोजन केले होते. यात क्रेडाई नैशनलचे चेअरमन सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह अनेक वक्ते देखील सहभागी झाले होते. बोमन इरानीं यांनी रिअल इस्टेटमधील बदलता प्रवास, ऑटोमोबाईल सेक्टर, मुंबईतील स्थावर मालमतेच्या प्रवाहातील बदल, याक्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणात खरेदीचे फायदे, विपणन, वित्त, रोख प्रवाह व्यवस्थापन, नवीन डीसीपीआर नियम, क्रेडाई मध्ये सक्रिय सहभाग अशा विविध विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. क्रेडाई महाराष्ट्र प्रत्येकवर्षी अशाप्रकारचे उद्बोधक सेमिनार आयोजित करत असते. या कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे यावर्षी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.