पुणे : अस म्हणतात आपलजग कष्टकरी कामगारांच्या श्रमांवर चालतं. कामगारांनी आपल्या श्रमाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. गोयल गंगा प्रकल्प यशस्वी होण्यापाठीमागे या कुशल कामगारांचा वाटा खूप महत्वाचा आहे. असे प्रतिपादन गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यांनी केले. गोयल गंगा फौंडेशन तर्फे मंगळवारी गंगा गिट्झ, गंगा लेजंड्स, गंगाधाम टॉवर्स (दि.१ ) येथे कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अमित गोयल यांनी काही कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी कामगारांनी प्रशिक्षण घेण्याआधी व त्यानंतर त्यांच्या राहणीमानात तसेच उत्पन्नात सकारात्मक बदल झाले, असल्याचे मत व्यक्त केले. आज बांधकाम क्षेत्रात कारागिरामध्ये कुशलता महत्वाची असते. गोयल गंगा फौंडेशनच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केले जाते त्यामुळे आमचा कामाचा दर्जा अधिक उंचावत आहे. अशी भावना अनेक कामगारांनी यावेळी व्यक्त केली.
साईट वरील प्रोजेक्ट मैनेजर वीरेन कुसुरकर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्व सांगताना म्हणाले कि, १ मे हा दिवस आपण “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो. जगभरातील कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा विशेष दिन म्हणून १ मे हा दिवस पाळला जातो. औद्योगिक क्रांती नंतर कामगारांना रोजगार प्राप्त होऊ लागला पण त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधांशिवाय अल्प मजुरीच्या मोबदल्यास १२ ते १४ तास कष्ट करून घेतले जात होते. याविरोधात कामगारांनी एकत्रित येऊन कामगार संघटनांची निर्मिती केली. कामगारांच्या कामाची वेळ केवळ ८ तास असावी, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगार दिन पाळण्यात येतो.
प्रोजेक्ट हेड कुमार बर्डे,इम्तियाझ पटेल व सुधीर अग्रवाल याप्रसंगी उपस्थित होते.