Industrialist

गोदरेज ॲग्रोव्हेट त्रिपुरामध्ये स्थापन करणार ऑइल पाम प्रोसेसिंग मिल

~ स्थानिकहवामानासाठीयोग्यबियाणेविकसितकरणारेसंशोधनआणिविकासकेंद्रस्थापनकरणार ~ पामतेलउत्पादकांना सर्वसमावेशक साहाय्यदे ण्यासाठी समाधान हे सोल्युशन सेंटर उघडणार धलाई, त्रिपुरा – गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (GAVL) आज घोषणा केली की, त्यांच्या पाम ऑइल प्लांटेशन व्यवसाय (OPP) त्रिपुरामध्ये पाम ऑइल प्रोसेसिंग मिलिंगची स्थापना करणार आहे. राज्यातील धलाई जिल्ह्यात हा प्रकल्प असेल. त्यासाठी कंपनी सध्या वर्षाला ३ लाख क्षमतेची रोपवाटिका चालविते आणि ती प्रतिवर्षी ५ लाखांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. पामसाठी परिसरात प्रगत संशोधन आणि विकास केंद्रही स्थापित करण्याबरोबच कंपनी पाम शेतकऱ्यांना सर्वसमावेशक साहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने समाधान केंद्र हे एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू करण्यात येईल. त्रिपुराचे माननीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री रतन लाल नाथ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेचमिल आणि आर अँड डी सेंटरच्या भूमिपूजन समारंभाला एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे संशोधन आणि विकासप्रमुख डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम उपस्थित होते. पाम ऑइल क्षेत्राचा अभ्यास आणि डीकोडिंग करण्याच्या दोन दशकांहून अधिक अनुभवासह, ते उच्च उत्पन्न देणारे शाश्वत पाम तेल विकसित करण्यासाठी कंपनीला मार्गदर्शन करतील. ऑगस्ट 2021 मध्ये खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन - ऑइल पाम (NMEO-OP) सुरू केल्यानंतर त्रिपुरा सरकारने किमान 7,000 हेक्टर जमीन पाम लागवडीखाली आणण्याची योजना सुरू केली आहे. यावेळीभाष्यकरतानात्रिपुराचेमाननीयकृषीआणिशेतकरीकल्याणमंत्रीआ, रतनलालनाथम्हणाले, "खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन - ऑइल पाम (NMEO-OP) च्या यशस्वितेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्रिपुरा सरकार एक अशी इको-सीस्टम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे, जी राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि जमिनीचा वापर करून राज्यात पाम ऑइल प्रोसेसिंग मिल सुरू झाल्यामुळे आमचे शेतकरी आता गोदरेज ॲग्रोव्हेटसारख्या विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदारांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या कौशल्याचा फायदा यात होईल. राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी समाधान केंद्र स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय केवळ सध्याच्या पाम तेललाच नव्हे, तर पाम तेल उत्पादकांनाही मदत करेल, ज्यामुळे राज्याच्या क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास दिसून येईल.” गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडचे​​व्यवस्थापकीयसंचालकबलरामसिंहयादवम्हणाले, “पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानाच्या आमच्या सामाईक मिशनसाठी त्रिपुराच्या मनापासून पाठिंब्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत. त्यांच्याद्वारे निर्माण होत असलेली अनुकूल इको-सीस्टम खरोखरच उत्साहवर्धक आहे.” “आम्हाला खात्री आहे की, आजच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट आमच्याकडे विकण्यास मदत होईलच, शिवाय रोजगार निर्मिती आणि व्यवसायाच्या संपूर्ण मूल्य शृंखलेशी संलग्न व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या तीन दशकांहून अधिक काळातील कौशल्याचा लाभ घेऊन, राज्याचा पाठिंबा आणि विश्वास या क्षमतेमुळे आम्हाला पाम तेलच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या देशाच्या प्रवासात योगदान देण्याची संधी नक्कीच मिळेल,” असेही ते पुढे म्हणाले. संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडच्यापाम ऑइलप्लांटेशनबिझनेसच्यासीईओसौगतनियोगीम्हणाले, “नफ्यापूर्वी शाश्वतता कायम ठेवणारी संस्था म्हणून, पाम तेल लागवडीच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आम्ही या भागात प्रगत संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आमची शास्त्रज्ञांची टीम स्थानिक हवामान आणि राज्याच्या हवामानासाठी योग्य बियाणे विकसित करण्यासाठी जीनोमिक्स करत आहेत. या केंद्रातून देशाच्या इतर भागांमध्ये नवनवीन शोध घेऊन जाण्याची आम्हाला आशा आहे.” यावेळी त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेच्या कृषीचे कार्यकारी सदस्य भाभा रंजन रेआंग; करमचेराचे विधानसभा सदस्य पॉल डंगशू; चावमानूचे विधानसभा सदस्य संभूलाल चकमा; त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदचे एमडीसी बिमल कांती चकमा; त्रिपुरा सरकारीमधील कृषी सचिव अपूर्वा रॉय; एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम; मनु ब्लॉकचे उपाध्यक्ष प्रणॉय देबबर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) ही भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण अन्न आणि कृषी व्यवसाय समूहांपैकी एक आहे, तसेच भारतातील पाम ऑइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. 2027 पर्यंत पाम लागवडीचा विस्तार 1.2 लाख हेक्टरपर्यंत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन शाश्वत विकासास समर्थन देण्यासाठी भारतातील कंपनीने गेल्या वर्षी समाधान, एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू केले. प्रत्येक समाधान केंद्राच्या माध्यमातून ~2,000 हेक्टर पामच्या लागवडीस पाठिंबा देण्याचा मानस आहे आणि अत्याधुनिक कृषी पद्धतींचा लाभ घेऊन व उद्योग तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन प्रदान करून परिपक्व लागवडीतून जास्तीतजास्त उत्पादन मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीची स्टेट बँक ऑफ इंडियासोबतची भागीदारी लागवडीच्या काळात पाम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करेल. आज जाहीर केलेल्या उपक्रमांद्वारे, कंपनी 2027 पर्यंत त्रिपुरामध्ये पाम लागवडीखालील क्षेत्र 10,000 हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस आहे.

बँक ऑफ इंडियाचा तिमाहीत  निव्वळ नफा 1,703 कोटींवर 

मुंबई: बँक ऑफ इंडियाने त्यांचे वित्तीय निकाल जाहीर केले असून, वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 10% वाढ झाली आहे. वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 1,703 कोटी रुपये निव्वळ नफा...

अमेरिकेत सेन्सेक्स 2,400 अंकांनी कोसळला:78,600च्या जवळ आला, गुंतवणूकदारांचे ₹17 लाख कोटी बुडाले, जपानचा बाजार 9% घसरला

इराण-इस्रायल युद्धाची भीती, त्यामुळेच बाजार घसरला अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज 5 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 2,400 अंकांनी घसरला आहे. तो 78,600...

आयपीओसाठी पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडला सेबीकडून मंजुरी

जानेवारी 2024 पर्यंतच्या आउटलेट्सच्या संख्येवरून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख संघटित ज्वेलर्स असलेल्या पी.एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडला सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डने (SEBI) प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक...

आदित्य बिर्ला ग्रुपचे ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून दागिने उद्योगक्षेत्रात पदार्पण

'इंद्रिय' हा या समूहाचा दागिने ब्रँड देशातील सर्वात मोठ्या तीन ब्रँड्समध्ये आणण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली, :  आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी ग्रुपने दागिने रिटेल व्यवसाय सुरु केल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने वेगाने विस्तार पावत असलेल्या ६.७ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय दागिने बाजारपेठेत पदार्पण केले आहे. प्रभावी ब्रँड इक्विटी व बाजारपेठेविषयीची सखोल समज यांच्या बळावर, ग्राहकांना प्रस्तुत केल्या जात असलेल्या पोर्टफोलिओला मजबूत करण्याच्या वाटचालीतील हे धोरणात्मक पाऊल आदित्य बिर्ला ग्रुपसाठी अजून एक लक्षणीय टप्पा आहे. 'इंद्रिय' या ब्रँडअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या दागिने व्यवसायाला पुढील पाच वर्षात भारतातील सर्वात मोठ्या तीन दागिने रिटेलर्समध्ये स्थान मिळवून देण्याचे ग्रुपचे लक्ष्य आहे. या महत्त्वाकांक्षी व्हेन्चरसाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, भारतातील दागिने रिटेल क्षेत्रात नवक्रांती घडवून आणण्याचा आदित्य बिर्ला ग्रुपने केलेला निर्धार यामधून ठळकपणे दिसून येत आहे. या लॉन्च प्रसंगी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, "भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी, मागण्यांमध्ये लक्षणीय वाढ आणि सुधारणा होत आहेत. आज भारत ही जगातील सर्वाधिक आशादायी बाजारपेठ असावी. यंदाच्या वर्षी पेंट्स आणि दागिने या उद्योगक्षेत्रांमध्ये दोन नवे, मोठे ब्रँड्स आणून भारतीय ग्राहकांच्या क्षमतांवरील आमचा विश्वास दुपटीने वाढवला आहे. अनौपचारिक ते औपचारिक क्षेत्रांमध्ये होत असलेले मूल्य स्थलांतरण, मजबूत, विश्वसनीय ब्रँड्सकडे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि लग्नासाठीच्या खरेदीच्या बाजारपेठेतील प्रचंड तेजी या सर्व लक्षणीय वृद्धी संधी प्रस्तुत करणाऱ्या बाबींमुळे दागिने उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी खूपच स्वाभाविक होते." ते पुढे म्हणाले, "फॅशन रिटेल आणि लाईफस्टाईल उद्योगक्षेत्रात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळापासून आघाडीवर असलेल्या आमच्या ग्रुपसाठी दागिने उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवून विस्तार करणे खूपच सोपे आहे. रिटेल, डिझाईन आणि ब्रँड व्यवस्थापनामध्ये आम्ही ज्या प्रचंड क्षमता आत्मसात केल्या आहेत त्या आमच्या यशाचे आधारस्तंभ बनतील." 'इंद्रिय' ब्रँड एकाचवेळी दिल्ली, इंदोर आणि जयपूर या तीन शहरांमध्ये चार दुकाने सुरु करेल. पुढील सहा महिन्यांमध्ये १० पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार करण्याची ब्रँडची योजना आहे. तब्बल ७००० चौरस फुटांहून प्रशस्त म्हणजे राष्ट्रीय ब्रँड्सच्या सरासरी आकारापेक्षा ३०% ते ३५% मोठी स्टोर्स असतील आणि त्यामध्ये सर्व प्रसंगांना साजेशा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची विशाल श्रेणी प्रस्तुत केली जाईल. ५००० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह डिझाईन्ससह १५००० वेगवेगळे दागिने सुरुवातीला उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. दर ४५ दिवसांनी नवीन कलेक्शन्स सादर केली जातील. भारतीय फाईन ज्वेलरी मार्केटमधील हे सर्वात वेगवान माईंड टू मार्केट सायकल असणार आहे. नॉवेल ज्वेल्सचे डायरेक्टर श्री दिलीप गौर म्हणाले, "सर्जनशीलता, पुढे वृद्धिंगत होण्याची क्षमता, तंत्रज्ञान आणि दागिने क्षेत्रातील ग्राहकांना प्रदान केला जाणारा अनुभव यातील मानकांची नवी व्याख्या रचण्यासाठी आम्ही इंद्रियमध्ये सज्ज आहोत. प्रत्येक दागिन्यामागे कारिगरीची अनोखी कहाणी असते अशी आमची ठाम समजूत आहे आणि त्याच पायावर हा ब्रँड उभारलेला आहे. अनोखे उत्पादन, अतुलनीय ग्राहक अनुभव आणि एका आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारा खरेदीचा अनुभव या सर्वांमुळे दागिन्यांमधून स्वयं-अभिव्यक्ती करता येणे सहजशक्य होते. आमच्या प्रत्येक उत्पादनामध्ये कालातीत कारिगरी दिसून येते, आधुनिक डिझाईन्सना नवे रूप यामध्ये देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी आम्ही तयार केलेले दागिने त्या क्षेत्राची अनोखी वैशिष्ट्ये दर्शवतात, वेगवेगळ्या संस्कृतींना आम्ही यामध्ये सामावून घेतले आहे." नॉवेल ज्वेल्सचे सीईओ श्री संदीप कोहली यांनी सांगितले, "दागिने म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर स्टेटमेंट बनले आहेत. सहज कळून येईल असे वेगळेपण, अनोखी डिझाईन्स, व्यक्तिगत सेवा आणि अस्सल क्षेत्रीय ओळख हे आमच्या प्रत्येक प्रस्तुतीचे आधार आहेत. एक्सक्लुसिव्ह लाऊंजेससह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव ही 'इंद्रिय'ची खासियत आहे. स्टोरमध्ये उपस्थित असलेले स्टायलिस्ट्स आणि तज्ञ ज्वेलरी कन्सल्टन्ट यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कस्टमायजेशन सेवांमुळे पंचेंद्रिये सुखावणारा आणि अतुलनीय खरेदीचे समाधान देणारा अनुभव मिळेल. आमचे या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एन्ड सर्व डिजिटल व फिजिकल टचपॉईंट्सना सहजसोपा अनुभव मिळवून देईल व त्यामुळे ज्वेलरी रिटेलमध्ये नवयुग अवतरेल." 'इंद्रिय' हे या ब्रँडचे नाव संस्कृत भाषेतून घेण्यात आले आहे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे. 'इंद्रिय' हे नाव पंचेंद्रियांचे महत्त्व दर्शवते. पंचेंद्रियांना सुखावतील, 'स्व'तःसाठी तयार करण्यात आले आहेत असे दागिने निर्माण करण्याचा ब्रँडचा सिद्धांत या नावातून दिसून येतो. 'इंद्रिय' चा ब्रँड लोगो, एक सुंदरशी हरिणी आहे, जी महिलेचे सौंदर्य व शान दर्शवण्याबरोबरीनेच इंद्रियांचे प्रभावी रूपक देखील आहे. फक्त अलंकारणापुरते नाही तर सक्षम व सन्मानित करणारे दागिने निर्माण करण्याची ब्रँडची वचनबद्धता यामधून अधोरेखित होते.

Popular