विरोधीपक्षांच्या वर्तणुकीच्या निषेधासाठी पुण्यात खा. शिरोळेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे १२ एप्रिलला लाक्षणिक उपोषण …

Date:

पुणे-विरोधीपक्षांच्या वर्तणुकीच्या निषेधासाठी भाजपच्या वतीने १२ एप्रिलला लाक्षणिक उपोषणकरण्यात येणार असून
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली गुरवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्या पासून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, सर्व लोकप्रतिनिधी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी या उपोषणाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले कि ,संसदेचे कामकाज चालविणे ही आम्ही देशवासियांच्या प्रतीची बांधिलकी मानतो. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज फक्त ४३ तास तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालू शकले. दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे तब्बल २४८ तास वाया गेले.
विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदारांनी संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले. विरोधी पक्षांच्या वर्तणुकीचा सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी भाजपचे सर्व खासदार गुरवार दि. १२ एप्रिल रोजी आपआपल्या मतदारसंघात उपोषण करणार आहेत.
संसदीय कामकाजात अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वपूर्ण असते. ते अधिवेशन चालू न देण्याची विरोधकांची रणनिती म्हणजे त्यांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे दर्शन होते. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या १८ वर्षांतील सर्वात कमी कामकाज झालेले अधिवेशन ठरले आहे. देशाची अर्थव्यवस्था गतीमान होत आहे. जीएसटी सारखा आर्थिक निर्णय महत्वपूर्ण ठरत आहे. ईज ऑङ्ग बिझनेसबाबत भारताचे मानांकन उंचावलेले आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वार्थाने हिताचे व योग्य निर्णय घेतले जात आहेत.
मोदी सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावली असून, विकासाची कामे करणारे पारदर्शक, गतीमान सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीने कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरले. भाजपच्या उंचावणार्‍या यशाच्या आलेखाने भयभीत होऊन काही प्रादेशीक पक्षांनी कॉंग्रेसला साथ दिली आहे.
निरव मोदीसारख्या गुन्हेगारांना चाप लावणारे विधेयक या अधिवेशनात संमत होणार होते. हे विधेयक संमत झाले असते तर अनेक गुन्हेगार अडकले असते. या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी कॉंग्रेसने संसदेचे अधिवेशन रोखण्याचा मार्ग अवलंबिला आहे.
मोदी स्पष्ट बहुमताने सत्तेवर आल्यास ते संसद धाब्यावर बसवून सत्ता हाकतील अशी अनाठायी भिती व्यक्त करून देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु भाजपाने संसदेच्या परंपरांचे पालन करीत अनेक निर्णय सर्वसहमतीने घेतले आहेत. कॉंग्रेसची जनहितविरोधी भूमिका देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि या अपप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आला आहे.
सभापती किंवा उपसभापती हा निरपेक्ष असतो. राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी संसदेतील गदारोळाला कॉंग्रेस व विरोधी सदस्य जबाबदार धरले आहे. संसद चालू देण्यास सत्ताधारी पक्ष इच्छुक नसल्याची टीका साङ्ग चुकीची असल्याचेही त्यांनी जाहीरपणाने स्पष्ट केले. त्यांचे विधान जबाबदार पीठासीन अधिकारी म्हणून केलेले आहे. कॉंग्रेसचा अपप्रचार उघडा करण्यासाठी ते पुरेसे आहे.असेही अनिल शिरोळे यांनी म्हटले आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.