ठराविक उद्योजकांचे अब्जावधींचे कर्ज होते माफ आणि गरिबांना मात्र नाममात्र कर्जासाठी पत्करावा लागतो आत्महत्येचा मार्ग – राहुल गांधी म्हणाले, जनतेचे दुखः पाहिले जवळून .

Date:

जिजामतेने घडविले शिवाजी महाराज

शेगाव-भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ्यांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत, असा जोरदार घणाघात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथे केली. विशेषतः याआधीच्या सभेत त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली. या सभेत मात्र, त्यांनी सावरकरांवर बोलणे टाळले.राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये असून आज त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी जनतेसह काॅंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो देशातील कोनाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय उत्पन्न केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले हे ऐकून मला त्रास होत आहे. शेतकरी म्हणतात आम्ही काय चुक केली. आमचे कर्ज माफ होत नाही पण देशातील धनाड्यांची, अब्जाधिशांची कर्ज माफ होतात.

राहुल गांधी म्हणाले, आपआपसांत भांडणे करुन कुणाचा फायदा झाला. महाराष्ट्रातील संतांनी कधी सांगितले का की, आपसांत भांडणे करा नाही ना..मग आपण का भांडतो? भाजपने कुटुंबात भांडणे लावली पण या भांडणांनी कुटुंबाचे नुकसान होत आहे. देशही एक कुटुंब आहे, या भांडणांनी देशाचा फायदा झाला का? भाजपने माणसे तोडण्याचे काम केले आम्ही ते जोडू.

राहुल गांधी म्हणाले, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांना घडवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. आपण मला प्रेम आणि सहकार्य केले, आपण आम्हाला खूप काही शिकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खूप काही शिकवले. मी जीवनभर विसरणार नाही की, महाराष्ट्रातील जनतेने मला शक्ती, ज्ञान आणि प्रेम दिले.​

शेतकरी आत्महत्या का करतो. पन्नास हजार, एक लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर असते. परंतु ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणले आणि शेतकऱ्यांना हृदयाशी घेतले आणि त्यांची हाक ऐकली आणि थोडी जरी शेतकऱ्यांची मदत केली तर त्यांचे भले होईल.

राहुल गांधी म्हणाले, देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात फुकत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक लाखो रुपये शिक्षणासाठी देतात पण पुढे काय होते? काय ऐकायला मिळते? काय काम करतात काहीच नाही. बेरोजगार आहे. उद्योगपती देशाची संपत्ती मिळवतील आणि युवक बेरोजगार होतील युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,अशोक चव्हाण , यशोमती ठाकूर, नाना पटोले , बाळासाहेब थोरात यांची यावेळी भाषणे झाली ,पुण्याचे मोहन जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...