साताऱ्यामधील गावांच्या विकासात त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे
सातारा: भारत फोर्जचे सीएमडी, पद्म भूषण श्री बाबासाहेब कल्याणी यांना डॉ नरेंद्र दाभोळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील गावांच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सातारा नगरपरिषदेने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. याआधी डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश व डॉ मंदाकिनी आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आणि नाम फाऊंडेशन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
सातारा नगरपरिषदेचे सीईओ यांनी त्यांच्या कार्यालयातील पुरस्कार समितीमधील इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.