SHARAD LONKAR

55120 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीत आर्थिक सल्लागारांचे योगदान डॉ. प्रणाली खडसे-धांडे

पुणे : "वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीत दिवसेंदिवस अधिक सुलभता, सुसूत्रता येत आहे. ही प्रणाली अधिक सुलभ व्हावी, तसेच याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,...

साधू वासवानी मिशनतर्फे वारकऱ्यांचे स्वागत, आदर सत्कार

पुणे-भगवान श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या वारकऱ्यांचे साधू वासवानी मिशनतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी मिशनमध्ये विसावा घेतला. 'विठ्ठल विठ्ठल...जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि अभंगांचे तालबद्ध आवाजात गायन करत पायी वारी करणाऱ्या या वैष्णवांचे साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी आणि सदस्यांनी भक्तीभाव आणि जल्लोषात स्वागत केले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी आणि सर्व उपस्थित साधक भगवान श्री विठ्ठलाची आळवणी करणारे अभंग, पारंपारिक भक्तिगीतांच्या गायनात उत्साहाने सहभागी झाले. या निमित्त प्रसाद वाटपाचे आयोजनही करण्यात आले. वारकरी आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतात, ते सर्व पदार्थ यावेळी वाटप करण्यात आले. या माध्यमातून उपस्थितांमध्ये आध्यात्मिक बंध आणखी जुळून आले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी, उपस्थित वारकरी आणि अन्य साधकांनी दादा जे. पी. वासवानी यांच्या आगामी वाढदिवसाच्या अनुषंगाने क्षमाप्रार्थना देखील केली. दादा वासवानी यांचा जन्मदिवस हा जागतिक क्षमा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त दि. २ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता २ मिनिटे शांतता पाळण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दरम्यान, मिशनतर्फे आयोजित या स्वागत आणि सेवा उपक्रमावेळी एका वारकऱ्याने सांगितले, की "साधू वासवानी मिशन येथे भेट देण्याची माझी ही तिसरी वेळ आहे. मी जेव्हा जेव्हा येथे भेट देतो, तेव्हा मला शांतता मिळते. तसेच भगवान विठ्ठलाच्या सानिध्याचा अनुभव येतो.

माउलीसह वैष्णवांनी पुण्यनगरीचा घेतला निरोप

सासवड / औदुंबर भिसे - टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोषकरीत क-हा नदीच्या काठावरील संवत्सरनगरीत संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रात्री उशीरा दहा वाजता...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई, दि.२: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता 65 वर्ष

जनतेचा विचार, विकास आणि विश्वास आमच्या वाटचालीची त्रिसूत्री – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याची अर्थव्यवस्था भक्कमच, विदेशी गुंतवणुकीतही देशात अव्वल राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर मुंबई, दि. 2:- सर्वसामान्यांच्या...

Breaking

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...
spot_imgspot_img