पुणे- ..तर पुण्यात पुन्हा लॉक डाऊन अशा इशाऱ्यावरून ,पुण्यात पुन्हा लॉक डाऊन अशी बातमी पसरताच त्यावर प्रतिक्रिया देखील उमटली . मनसेच्या अजय शिंदे यांनी हे सरकार अफू पिऊन निर्णय घेते आहे काय ? असा सवाल त्यावर केला
नव्याने लॉक डाऊन करणे म्हणजे नागरिकांना अक्षरशः आर्थिक संकटात टाकणे आहे
हे सरकार अफू पिऊन निर्णय घेत आहे जून महिन्याच्या सूरवातीला लॉक डाऊन नंतर करोना गेला संपला अश्या पद्धतीने मातोश्रीच्या आता स्वतःला कोंडून घेतलेल्या मा.मु नी निर्णय घेतले आता त्याची पुनरावृत्तीउपमुख्यमंत्र्यांनी केली आहे खुली सूट दिल्याने अनिर्बंध पणे वाढलेल्या आणि पुणे शहरात सरासरी 20 बळी दररोज गेल्या नंतर आणि करोनाग्रस्तांना हॉस्पिटल मध्ये जागाही मिळेनश्या झाल्या नंतर घाबरलेल्या आणि सर्वच आघाड्यांवर फेल झालेल्या सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला अक्षरशः कर्जबाजारी करेल. असे मनसेचे अजय शिंदे यांनी तातडीने म्हटले.
परंतु हि बातमी देईपर्यंत लॉकडाऊन बाबत अधिकृत बातमी आली नव्हती .