नवाब मलिक म्हणाले- कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही
मुंबई-राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला अटक करून NCB ने गुरुवारी पहाटेच्या सुमारास खानच्या वांद्रे येथील घरी छापा टाकला .सूत्रांच्या माहितीनुसार NCB चे अधिकारी त्यांच्या पत्नीचीही चौकशी करत आहेत. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर खान दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयात पोहोचले होते. 8 तासांच्या चौकशी दरम्यान समीर खान आणि ब्रिटीश ड्रग पेडलर करण सजानी यांच्यात व्यवहार झाल्याची माहिती NCBला मिळाली.
जावई समीर खान याच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कायदा आपल्या ठरलेल्या वेळी पावले उचलेल आणि तेथे न्याय मिळेल. मला आपल्या न्यायपालिकेवर मोठा विश्वास असून मी आदर करतो.’ असे मलिक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.