Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रजनन अक्षमतेविषयीच्या गैरसमजांचे निराकरण

Date:

पुणे- प्रजनन अक्षमता ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे. भारतात सुमारे 10 ते 15 टक्के विवाहित दाम्पत्यांना नैसर्गिकरित्या मूल होत नाही. त्यांच्यापैकी केवळ 1 टक्का इतकेच इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) किंवा अन्य उपचारांकडे वळतात. गर्भधारणेसाठी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी – आर्ट)यासारख्या एखाद्या तंत्राची मदत घेण्याचे हे प्रमाण आता मात्र वाढत चालले आहे.

इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) या पध्दतीत स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा प्रयोगशाळेत संयोग घडवून आणतात आणि त्यातून निर्माण होणारे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयातरुजवले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये या आयव्हीएफ पध्दतीच्या यशाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (आर्ट) या तंत्रज्ञानामुळे हे साध्य झाले आहे. आयव्हीएफला मिळालेल्या यशाची अनेक उदाहरणे असली, तरी या पध्दतीविषयी अनेक गैरसमज आढळतात. त्यातील काहींचे निराकरण करण्याचा केलेला हा प्रयत्न ..

गैरसमज : गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये पुरुषाचे वय कितीही असले, तरी चालते.

– केवळ स्त्रियांच्या शरीरातच जैविक बदल होत असतात, हा समज चुकीचा असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. नैसर्गिकपणे वा आयव्हीएफद्वारे मूल हवे असले, तर स्त्रीच्याबरोबरीने पुरुषाचे वयदेखील महत्त्वाचे ठरते.

पुणे येथील नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटी केंद्रातील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिष्मा डफळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रजनन अक्षमता वा अयशस्वी ठरलेल्या आयव्हीएफ प्रक्रियेमध्येपुरुषांच्या वयाचा संबंध असतो, हे संशोधनातून सिध्द झाले आहे. पुरुषांचे वय वाढते, तसे त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. वय वाढलेल्या पुरुषाकडून गर्भधारणा होण्यातबराच वेळ लागतो. स्त्रीचे वय कितीही असले, तरी पुरुषाचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असल्यास गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते, असे दिसून आले आहे. पुरुषांच्या वयाच्या वाढीबरोबरचत्यांच्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते व त्यांची गुणवत्ताही कमी होते. आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या दाम्पत्यामध्ये पुरुषाचे वय 41 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तो उपचारअयशस्वी होण्याचे प्रमाण पाच पटींनी वाढते, असा आमचा अनुभव आहे. प्रजनन अक्षमतेमध्ये पुरुषांमुळे लागू होणाऱ्या कारणांची टक्केवारी 40 ते 45 इतकी आहे.

गैरसमज : आयव्हीएफ पध्दतीने स्त्रियांना कोणत्याही वयात गर्भधारणा होऊ शकते.

– एन्डोमेट्रिओसिस किंवा प्रजनन अक्षमतेच्या अन्य कारणांमुळे गर्भधारणेमध्ये अडथळे येत असतील, तर ते आयव्हीएफ पध्दतीमध्येही येऊ शकतात. आयव्हीएफ उपचारांचे यश हेस्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या गुणवत्तेबरोबरच इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. संबंधित स्त्रीच्या गर्भाशयाची अवस्था किंवा एन्डोमेट्रियमची स्वीकृती, फॅलोपियन ट्यूब्जचीस्थिती आणि इतर जैविक व हार्मोन्सविषयक कारणे यामध्ये लागू होतात. स्त्रीचे वय वाढल्यावर यात गुंतागुंतही वाढते. त्यामुळे गर्भधारणा व्यवस्थित झाली तरी गरोदरपणातजोखीम वाढलेली राहते. त्यामुळेच स्त्रीने गरोदरपणाचे नियोजन शक्यतो लवकर करणे महत्त्वाचे आहे. प्रजनन अक्षमता असल्याचे निदान झाल्यावर दाम्पत्याने उपचार घेण्यातदिरंगाई करू नये.

 गैरसमज : आयव्हीएफमुळे शंभर टक्के यश मिळते, मात्र एकदा अपयश आल्यास पुन्हा आशेला स्थान नाही.

– 35 वर्षाखालील वय असलेल्या स्त्रियांना आयव्हीएफ उपचारामुळे येश मिळण्याचे प्रमाण 50 ते 60 टक्के आहे. वय वाढते, तशी यशाची शक्यता कमी होत जाते. उपचार घेऊइच्छिणाऱ्या दाम्पत्याची काटेकोर तपासणी केल्यावर त्याला कोणते उपचार कसे द्यायचे हे ठरविण्यात येते. नेमक्या कोणत्या कारणांमुळे या दाम्पत्याला प्रजनन अक्षमतेला तोंडद्यावे लागत आहे, हे समजून घेण्यात येते. जितकी जास्त माहिती मिळेल, तितकी आयव्हीएफ उपचाराच्या यशाची जास्त हमी मिळते.

आयव्हीएफच्या यशाबद्दल डॉ. करिश्मा डफळे म्हणाल्या, आयव्हीएफ उपचार घेण्यास आलेल्या दाम्पत्याशी अगोदर चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया समजावून दिली जाते. तसेच यापध्दतीतील यशापयशाची शक्यता दाखवून दिली जाते. त्यामुळे दाम्पत्याला आयव्हीएफ उपचाराची संपूर्ण माहिती मिळते. काही वेळा आयव्हीएफचा प्रयत्न पहिल्यांदाफसल्यानंतर दाम्पत्य निराश होते व या उपचाराचा नाद सोडून देते. हे टाळण्यासाठी या समुपदेशनाचा उपयोग होतो. दाम्पत्याचे वय, त्यांच्या स्त्रीबीजाची वा शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयाचे आरोग्य ही आयव्हीएफ उपचार यशस्वी वा अयशस्वी होण्यामागची कारणे लक्षात घेतली व ती अयोग्य असल्यास त्यांवर उपचार घेतले, तर नंतर आयव्हीएफ उपचारयशस्वी होण्याची शक्यता जास्त राहते.

गैरसमज : आयव्हीएफ उपचारांमध्ये केवळ दात्यांचीच बिजे वापरली जातात

– आयव्हीएफ उपचारांमध्ये सर्वसाधारणपणे पत्नीचे स्त्रीबीज आणि पतीचे शुक्राणू यांचाच संयोग घडवून आणला जातो. अपवादात्मक परिस्थितीत दात्यांचा उपयोग केला जातो. स्त्रीबीजाचे अथवा शुक्राणूंचे प्रमाण कमी असेल, तरीही काही वेळेस त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे ती संधीही घेण्यात येते. दाम्पत्याचे वय जास्तच उलटून गेलेले असेल, गर्भाशयाचे आरोग्य ठीक नसेल, स्त्रीची रजोनिवृत्ती झालेली असेल, अथवा पुरुषावर काही विशेष शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्याच्या वीर्यामध्ये शुक्राणू नसतील, तरच अशापरिस्थितीत स्त्रीबीज वा शुक्राणू यांचे दान करणाऱ्या परक्या व्यक्तीचा विचार करण्यात येतो. याचा निर्णय घेण्याअगोदर अर्थातच संबंधित दाम्पत्याचे समुपदेशन करण्यात येते वत्यांची संमती मिळवण्यात येते.

गैरसमज : गोठवलेल्या भ्रुणापेक्षा नवीन भ्रूण अधिक परिणामकारक असते व ते चांगले रुजते.

– प्रजननात आवश्यक असणाऱ्या घटकांबाबत अनेक गैरसमज समाजात आढळतात. यातील एक सर्वसाधारणपणे आढळणारा गैरसमज म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणू यांच्या संयोगझाल्यानंतरचे भ्रूण हे गोठवून ठेवले तर त्याची गुणवत्ता कमी होते, ते गर्भाशयात रुजणे कठीण असते. वास्तविकतः, गोठवलेले भ्रूण आणि नव्यानेच निर्माण झालेले भ्रूण ही दोन्हीगर्भाशयात रुजण्यात सारखीच असतात, असे डॉ. करिष्मा डफळे यांनी सांगितले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गोठवलेल्या भ्रुणाची गुणवत्ता ही संबंधित दाम्पत्याचे वय, त्यांच्या बिजांचा दर्जा यांवर अवलंबून असते. भ्रूण सुरक्षित राहण्याकरीता तेव्हिट्रिफिकेशन या प्रक्रियेतून गोठवून ठेवण्यात येते. ते तसे काही वर्षे राहू शकते. सामाजिक वा वैद्यकीय कारणांमुळे एखाद्या दाम्पत्याला बाळ लगेच जन्माला घालायचे नसेल, तरत्यांना त्यांचे स्त्रीबीज व शुक्राणू ही बिजे गोठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यांच्या नंतरच्या आयुष्यात ही बिजे आयव्हीएफच्या माध्यमातून रुजवून त्या स्त्रीला मातृत्वाचाआनंद देणे शक्य असते. अशा गोठवलेल्या बिजांचे रुजणे बऱ्याचदा यशस्वी ठरत असते.

गैरसमज : आयव्हीएफमुळे नेहमी जुळीच जन्माला येतात.

– नैसर्गिक बाळंतपणात जेवढी जुळी मुले जन्माला येतात, त्यापेक्षा आयव्हीएफ उपचारामधून जुळी जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे, हे खरे. तथापि आर्ट या तंत्रज्ञानामुळे हेप्रमाण कमी करण्यात येश आले आहे, हेही खरे.

या संदर्भात डॉ. करिष्मा डफळे म्हणाल्या, प्रजनन अक्षमता यासाठी एखादे दाम्पत्य उपचार घेत असेल, तर त्यांना जुळी मुले होण्याची शक्यता 25 ते 30 टक्के असते. याचे कारण, आयव्हीएफ या उपचारामध्ये मल्टीपल ओव्ह्युलेशन हे तंत्र वापरले जाते. यात साधारणतः तीन निरोगी भ्रूण गर्भाशयात रुजविली जातात. या तीनपैकी कोणतीही दोन व्यवस्थितरुजतील अशी आशा असते. अनेकदा दोन्ही रुजून जुळी मुले जन्म घेतात. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे

एकच निरोगी भ्रूण रुजविणे शक्य झाले आहे. त्यामुळे जुळी जन्माला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

 गैरसमज : आयव्हीएफमधून जन्मलेल्या मुलांमध्ये जम्नजात दोष वा विकृती असते.

– उलटपक्षी, अत्याधुनिक आर्ट या तंत्रज्ञानातील प्रीइम्प्लॅन्टेशन जेनेटिक स्क्रीनिंग (पीजीएस) आणि प्रीइम्प्लॅन्टेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) या तंत्रांच्या माध्यमातूनबिजांची तपासणी करून अनुवंशिक दोष वा विकृती शोधून काढण्याची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे भ्रूण गर्भाशयात रुजवण्याअगोदरच त्यातील दोषांचे निदान करणे व त्यायोगेकेवळ चांगले, निरोगी भ्रूण रुजविणे शक्य झाले आहे. त्यामुळे निरोगी व जन्मजात दोष नसलेली मुले जन्माला येण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. खरे तर गुणसूत्रांमध्येदोष असल्याने 50 टक्के गर्भपात होतात. तसेच सदोष गुणसूत्रांमुळे बाळांमध्ये जन्मजात दोष निर्माण होतात. हे गुणसुत्रांमधील दोष अगोदरच ओळखण्याचे तंत्र विकसीत करण्याचेप्रयत्न वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. याकामी पीजीएस आणि पीजीडी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

गैरसमज : प्रजनन अक्षमता ही एक स्वतंत्र, एकटी समस्या असते.

– प्रजनन अक्षमता ही समस्या आरोग्याशी संबंधित इतर अनेक कारणांमुळेही उदभवते. लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यांच्याशी प्रजनन अक्षमतेचा जवळचा संबंध असतो. कर्करोगावरील उपचारांमुळे स्त्रियांमध्ये प्रजनन अक्षमता वाढते. कर्करोगविरोधी औषधांमुळे शुक्राणू व स्त्रीबीज यांची गुणवत्ता व संख्याही कमी होते. त्यामुळे स्त्री व पुरुष यांच्याप्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. स्त्रियांच्या शरीरात मुळातच स्त्रीबीज ठराविक प्रमाणातच निर्माण होते. त्यात केमोथेरपी व रेडिओथेरपीमुळे या स्त्रीबीजाचे थोडे वा संपूर्णनुकसान होते.

मूल जन्माला घालण्याच्या वयातील तरुण स्त्रियांना जेव्हा कर्करोगाचे निदान होते, त्यावेळी त्यांना वेळीच अंडी (जोडीदार नसलेल्या स्त्रियांसाठी) किंवा भ्रूण (विवाहित महिलांसाठी) गोठविण्याचा सल्ला द्यायला हवा. त्यायोगे कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर त्यांना आपण प्रजननासाठी अक्षमअसल्याचे समजल्यास या गोठवलेल्या बिजांचा उपयोग करूनघेऊन मातृत्वाचा आनंद घेता येईल. पुरुषांमध्ये कर्करोगावरील उपचार घेऊन झाल्यानंतर शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरळीत होते. अर्थात काही पुरुषांमध्ये शुक्राणुंचीगुणवत्ता घसरते. अशावेळी कर्करोगावरील उपचारांपूर्वी त्यांचे शुक्राणू गोठवून ठेवल्यास त्यांना नंतर त्याचा लाभ घेता येईल. ही शुक्राणू वा स्त्रीबीज गोठववून ठेवण्याची प्रक्रिया फारखर्चिकही नसते. तसेच केवळ कर्करोगावरील उपचार घेणाऱ्यांपुरताच हा मार्ग लागू नाही, तर इतरही आजारांवर उपचार घेणाऱ्यांना हा मार्ग अनुसरता येईल.

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटीविषयी ..

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही भारतात प्रजनन क्षमता निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठी सेवा देणारी संस्था आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआयटी – आर्ट) हेअत्याधुनिक तंत्रज्ञान स्पेनमधील आयव्हीआय या संस्थेच्या सहकार्याने भारतात आणण्याचे एनआयएफचे उद्दीष्ट आहे. या भागीदारीमुळे नोव्हाच्या आयव्हीएफ सेवांमध्ये वतंत्रज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरवरील स्वामित्व, प्रशिक्षण व गुणवत्ता व्यवस्थापन यांचा लाभही एनआयएफला होणार आहे. आयव्हीआयकडील नैपुण्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचंड अनुभव यांच्या सहयोगाने एनआयएफ भारतात तशीच जागतिक दर्जाची सेवा व धोरणे यांचा अवलंब करणारआहे.

आययूआय, आयव्हीएफ आणि अॅन्ड्रॉलॉजी या सेवा देण्याबरोबरच एनआयएफ ही संस्था भ्रूण व बीज साठवणुकीसाठीचे व्हिट्रिफिकेशन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते. तसेच भ्रूणस्वीकृत करण्यासाठी गर्भाशयाची क्षमता व योग्य वेळ आहे, हे तपासण्यासाठीचे इआरए तंत्रज्ञान, त्याचबरोबर भ्रूण गर्भाशयात रुजवण्यासाठीची पीजीएस व पीजीडी ही तंत्रेएनआयएफ उपयोगात आणते. ज्या रुग्णांमध्ये आयव्हीएफचे उपचार यापूर्वीअयशस्वी झाले आहेत, त्यांच्यासाठीही लाभदायक ठरू शकतील, अशा या प्रक्रिया आहेत. एनआयएफची सध्या देशात 20 केंद्रे आहेत. बंगळूरमध्ये 3, मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली येथे प्रत्येकी 2 आणि चेन्नई, कोईमतूर, हिस्सार, हैदराबाद, इंदूर, जालंधर, कोलकता, लखनौ, पुणे, सूरत व विजयवाडा येथे प्रत्येकी 1 अशी ही केंद्रे सुरू आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही

मनमोहन महिमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चित्रपट...

श्री ओंकारेश्वर मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन साजरा

पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक ; आकर्षक सजावट...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एकावर स्थानबद्धेची कारवाई

पुणे, दि. 9: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार एमपीडीए...