आधी चिखल, मग कमळ फुलवा, असे आता होणार नाही; विधानसभेतील पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा टोला

Date:

नागपूर : ‘चिखलात कमळ फुलते, असे म्हटले जाते. पण त्यासाठी आधी चिखल करा आणि मग कमळ फुलवा’, असे आता होणार नाही. कारण महाराष्ट्रात तीन पक्षांची ताकद एकत्र आली आहे. सर्वत्र गोंधळ घालून देश पेटवायचा आणि मग राज्य आणायचे ही शिवसेना किंवा अन्य दोन्ही पक्षांची भूमिका नाही. आम्ही भयमुक्त महाराष्ट्र घडवायला निघालो आहोत’, या शब्दांत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेतील पहिल्याच भाषणात भाजपला सुनावले.

विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडून आल्याने नवनिर्वाचित आमदार म्हणून आदित्य सभागृहात नेमके काय बोलतात, कसे बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बुधवारी रात्री आमदार आदित्य ठाकरे यांना राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवरील प्रस्तावावर विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली.

‘सभागृहातील दिग्गजांना नमन करतो, ज्यांनी मला सभागृहात पाठवले त्यांना नमन करतो’, अशी सुरुवात करून आदित्य ठाकरे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होत असताना महिनाभरातच मोठे नाट्य बघायला मिळाले. सत्तेची हाव काय असते, कशी असते, खोटे कसे बोलले जाते, मित्रपक्षाला कसे डावलले जाते याचा अनुभव घेत असतानाच कौटुंबिक संबंध कसे निर्माण होऊ शकतात, हेदेखील बघायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांनी महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी, नवी दिशा देण्यासाठी काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार स्थापन करण्यात यश आले आहे’, असे आदित्य म्हणाले.

‘जे पूर्वी सामना वाचत नव्हते, ते वाचायला लागले. आधीपासून सामना वाचला असता तर ते सत्ताधारी बाकांवर आमच्यासोबत राहिले असते’, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ‘महाराष्ट्रात लोकशाही नक्की काय असते ते या सरकारने दाखवून दिले आहे. आम्ही सारेच पक्ष दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. शेतकरी बांधवांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करायचे असेल तर आपल्याला काही गोष्टींवर विचार करायला पाहिजे. आता हवामान व तापमानातील बदलावर सभागृहाची एखादी बैठक हवी, त्यात या समस्येवर गांभीर्याने चर्चा व उपाययोजनांवर चर्चा व्हावी. २०५० पर्यंत मुंबई, कोकणासह अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यावर आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरे बोलत असताना शिवसेनेसह सत्ताधारी बाकांवर बऱ्यापैकी उपस्थिती होती. बहुतांश आमदार बाके वाजवून त्यांच्या प्रत्येक वाक्याला दाद देत होते. विरोधी बाकांवर मात्र या वेळी शुकशुकाट जाणवत होता.

प्लास्टिक बंदी, डिजिटल शिक्षणासाठी आग्रहाने मांडले मुद्दे

आदित्य यांनी प्लास्टिक बंदी, बेरोजगारी, शिक्षण, उद्योग या विषयांवरही मत मांडले. शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, ‘मुंबई मनपाच्या १२०० वर शाळांत आठ भाषांचे शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब दिले. हे अाॅनलाइन शिक्षण आता गावपातळीवर नेले पाहिजे. सोलरवर चालणारे टॅब आपण देऊ शकतो. मुंबईत ५०० शाळांत व्हर्च्युअल क्लासरूम आहेत. तेच तंत्रज्ञान गावपातळीवर नेले तर समान शिक्षण गावापर्यंत जाईल. व्हर्च्युअल क्लासरूम व डिजिटल एज्युकेशनचे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहाेत.’

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...