पुणे -राज्यात हाय अलर्ट जरी केल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहिलेच पाहिजे , कोणतीही हाणी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे…अन्यथा एकही बळी गेला तर त्याचे पातक आपल्या माथ्यावर राहील….. असा सणसणीत इशारा महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी इथे दिला आहे.
महापलिका आयुक्त यांना आबा बागुल यांनी पत्र दिले असून या पत्रात बागुलयांनी असे म्हंटले आहे कि, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इ शा-यानुसार दि.१३ ते १७ ऑक्टोबर या
कालावधीत पुणे शहरात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे असे
कळविले आहे.त्यामुळे पुणे शहरात हाय अलर्ट घोषित करून आपत्ती व्यवस्थापन कार्यान्वित करावे अशी मागणी कोन्ग्रेस गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. मागील २ ते ३ वर्ष पुणे शहरात कमी वेळेत मुसळधार पाऊस (अतिवृष्टी) झाल्याने ओढे नाले
ओसंडून वाहून त्याकडेने असलेल्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तीय हानी झाली होती.
यावेळी पुणे मनपाची आपत्ती व्यवस्थापन वेळीच कार्यान्वित नसल्याने मोठया प्रमाणात गैरसोय झाली होती. नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांचा नाहक बळी देखील गेला होता. शहरात अचानक आपत्ती आल्यास त्यासाठी पुणे मनपाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असून या विभागास अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध करून दिली आहे. परंतू आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने जर शहरात एका जरी नागरिकाचा बळी गेला तर यास सर्वस्वी जबाबदार पुणे मनपा प्रशासन असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
या कालावधीत शहरात अतिवृष्टी झाल्यास ओढे, नाले, नदी याकडेने असणा-या
वसाहती येथील पुनर्वसन, तात्पुरते स्थलांतर तसेच योग्य प्रकारे दखल घेवून पुणे मनपाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी,