पुणे-(अनिल चौधरी )
रायगड येथील मुरूड समुद्र किनारी सोमवारी (दि. 1) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 13 विद्यार्थ्यांवर आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सकाळी सापडलेल्या आणखी एका विद्यार्थ्याचे शव पुण्यात आणण्यात येत आहे.यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे .
रायगडमधील मुरुडच्या समुद्रकिना-यावर सोमवारी मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून अंत झाला होता. मृतांमध्ये दहा मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. सर्व विद्यार्थी पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
यामध्ये कोंढवा परिसरातील ४ मुले व दोन मुलींचा समावेश आहे .. कोंढवा बृदुक भागातील सईद फरीन हुसेन शेख वय २० हि इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात होती . घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती . नुकतेच दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे दु:खद निधन झाले होते . तिची आई घरकामे करून मुलीचे शिक्षण पूर्ण करत होती. तिला शिकून खूप मोठे व्हायचे होते . असे तिच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले .तिच्या पश्चात तिच्या तीन लहान बहिणी आहेत . याप्रंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी या कुटुंबासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले . आमदार योगेश टिळेकर यांनी तिची लहान बहिणीला नोकरी लावण्याचे आश्वासन दिले आहे . माजी आमदार महादेव बाबर , नगरसेवक भरत चौधरी , नगरसेविका संगीताताई ठोसर , प्रशांत ठोसर , तानाजी लोणकर , निलेश धांडेकर , सुखदेव लोणकर , दीपक कामठे , राकेश कामठे , पोपट लोणकर , संजय लोणकर ,बाळासाहेब मस्के , ह.भं.प. सुनील कामठे , उमेश दांडेकर , राजेंद्र बाबर , कोंढवा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी , नितीन अतकिरे यांनी फरीन शेख यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले .
या अपघातामध्ये मिठानगर येथे राहणारा मोहमद युसुफ अन्सारी इफ्तिकार वय २० वर्षे हा देखील मृत्यमुखी पडला आहे . याचे वडील कपड्याचे व्यापारी आहेत . याचे आई वडील टाटा जमशेदपूर येथे गेले होते . युसूफच्या बहिणीचे १९ फेब्रुवारी रोजी लग्न होते याच्याच संदर्भात त्याचे आई वडील झारखंड येथे गेले होते . त्यांना हि दुखद बातमी कळविली आहेत ते दुपारी येथे पोहोचतील असे त्यांचे नातेवाइकांनी माहिती दिली . तसेच तत्याला दोन मोठे भाऊ व दोन बहिणी आहेत . दोघेही भाऊ सॉफ्टवेयर इंजिनीअर आहेत . मोठा भाऊ कुवेत येथे इंजिनियर आहे . त्याला हि माहिती देताच तो त्वरित येथे आज सकाळी पोहोचला आहे . त्याच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक भरत चौधरी , महादेव बाबर , आमदार योगेश टिळेकर , आबा रोकडे , तानाजी लोणकर , संजय लोणकर , राहुल लोणकर , पोपट लोणकर , प्रशांत ठोसर पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकिरे यांनी कुटुंबाचे सांत्वन केले आहे .
साजिद सैपनमुल्क चौधरी वय २२ ,रा. कोंढवा मूळ गाव सोलापूर , अक्कलकोट हा युवक मृत्युमुखी पडला आहे . साजिद चे वडील ड्राव्हवर म्हणून नोकरी करतात व आपल्या कुटुंबाचा संसार रुपी गाडा हाकत आहेत . आपला मुलगा शिकून खुप मोठा इंजिनियर व्हावा व देशाचे नाव जगात मोठे करावे असेच त्यांना वाटत होते . परंतु त्यांचे स्वप्न हे स्वप्न राहिले . साजीद्ला एक बहिण आहे. अशी माहिती येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीला दिली . यावेळी आमदार योगेश टिळेकर ,महादेव बाबर , नगरसेवक भरत चौधरी महेश कामठे , राहुल लोणकर , संजय लोणकर यांनी कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
शेख इफ्तिकार अब्बास शेख वय २१ वर्ष हा मुरूडच्या समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचविले व तिसऱ्या सहकाऱ्याला वाचविताना पाण्यात बुडाला अशी माहिती त्याचा मजाज शेख ह्या त्याच्या चुलत भावाने दिली आहे. इफ्तिकार हा पोहण्यात तरबेज होता . त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असा होता. त्याचे वडील रेल्वे मध्ये नोकरी करत आहेत. त्याला एक भाऊ व एक बहिण आहे. नेहमीच तो सर्वांच्या मदतीला हजर असायचा असे त्याच्या मित्रांनी माहिती दिले आहे.
अन्सारी सुमैय्या अकिल हि देखील या अपघातात मृत्युमुखी पडली आहे . सुमैय्या च्या नातलगांनी कॉलेजच्या प्रशासानाला सवाल केला आहे कि , मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर अनेकदा अपघात होऊन सुद्धा याच ठिकाणी का सहल नेली ? येथे १३० विध्यार्थी असतना फक्त ११ शिक्षिक का गले ? .सुमैय्याला तीन बहिणी आहेत तसेच तिचे वडील सहासीटर चालवतात .अशी माहिती तिच्या नातेवाईकानी दिली आहे.
सैफ अहमद बादशहा मडकी वय २० वर्ष हा मृत्युमुखी पडला आहे. सैफ चे वडील टेलरिंगचे काम करतात . सैफ ला दोन भाऊ आहेत . यावेळी उपस्थित नागरिक अतिशय शोकमग्न होते .
कोंढवा परिसरातील ६ विध्यार्थी मृत्युमुखी पडल्यामुळे कोंढवा परिसरात शोककळा पसरली होती . सर्व परिसर शोकमग्न होता .
आ.योगेश टिळेकर , महादेव बाबर नगरसेवक भरत चौधरी , संगीता ठोसर , नगरसेविका आरती बाबर , साईनाथ बाबर , तानाजी लोणकर , पोपट लोणकर , नवनाथ लोणकर , राहुल लोणकर , शंकर लोणकर , प्रशांत लोणकर , संतोष गोरड , सत्पाल पारगे यांनी या सर्वाना श्रद्धांजली अर्पण केली.