पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रमाता माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथीनिमित अभिवादन सभा झाली . यावेळी या महापुरुषांच्या प्रतिमेस माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . तसेच ,संकल्प दिन म्हणून सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सामुहिकपणे सामाजिक एकता आणि अखंडतेची शपथ घेतली . या शपथेचे वाचन माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .
पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील राणी लक्ष्मीबाई उदयानजवळील इंदिरा गांधी चौकामध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक सुधीर जानजोत , अविनाश बागवे , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख ,शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मंजूर शेख , करण मकवानी , प्रसाद केदारी , शैलेन्द्र बिडकर , संगीता पवार , विनोद मथुरावाला , गौतम महाजन , निझाम काझी , पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख , राजाभाऊ चव्हाण , वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर , अड. अनुपमा जोशी , प्रदीप परदेशी , सुजित यादव , स्मिता मुळीक , विठ्ठल थोरात , लतीफ शेख , अझीम गुडाकुवाला, अरविंद अंगीरवाल, अच्युत निखळ , क्लेमंट लाझरस , सुरेंद्र परदेशी , विनोद मोगरे , रशीद खिजर , जोस्वा रत्नम आदी मान्यवर , कॉंग्रेस शहर पदाधिकारी , महिला कॉंग्रेस ,युवक कॉंग्रेस , एन. एस. यू. आय . , सेवा दल व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार रमेश बागवे यांनी सांगितले कि , देशाची अखंडता टिकविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे , देशाच्या अखंडतेला धक्का लावण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे . त्यासाठी या सरकारची संकुचित वृत्ती बदलण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पक्षासाठी एकत्रित आले पाहिजे . राज्य हे लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे , परंतु सध्याचे सरकार हे वेगळा विदर्भ करण्याचे बोलते , तर दुसरीकडे एकता दौड काढता ? हा काय प्रकार चालला आहे , विरोधी निर्णय घेणाऱ्या या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित या . असे आवाहन त्यांनी केले . गुजरात सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हां त्यांनी कधीही वल्लभभाई पटेल यांची जयंती घेतली नाही आताच त्यांना जयंतीनिमित एकता दौड काढता , नगरला दलित हत्याकांड झाले , त्याची दखल अद्यापदेखील या सरकारने घेतली नाही , या हत्याकांडातील पिडीत कुटुंबीयाची भेट घेवून सांत्वन केले नाही . हे सरकार सत्तेसाठी असून त्यांना जनतेचे कोणतेच सुख दुख नाही .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी मानले .