राजा परांजपे यांनी अभिनयातील कृत्रिमपणा घालवला—- सुहास जोशी

Date:

पुणे- अभिनयातील कृत्रिमता घालवून नैसर्गिक अभिनय कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व. राजा परांजपे हे होते असे सांगून आज जे दर्जेदार चित्रपट आपण बघतो त्याचा पाया राजा परांजपे यांनी घातला असे गौरोद्गार जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले.

राजा प्रतिष्ठानच्या वतीने ७ व्या राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन व राजा परांजपे पुरस्कार सुहास जोशी यांच्या हस्ते अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, दिग्दर्शक अभिजीत पानसे, गायक स्वप्नील बांदोडकर यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी  त्या बोलत होत्या. अभिनेते प्रवीण तरडे, राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, अजय राणे हे यावेळी उपस्थित होते.

सुहास जोश म्हणाल्या, राजा परांजपे, ग. दी. माडगुळकर व सुधीर फडके या त्रिकुटाने चित्रपट म्हणजे काय हे लोकांच्या गली उतरविले होते. या त्रिकुटाने मराठी माणसाची सांस्कृतिक बुद्धी वाढवली. राजा परांजपे यांचे चित्रपट पाहत आम्ही मोठे झालो. आपण नैसर्गिक अभिनयाच्या बाबतीत नेहेमी आरडा ओरडा करतो परंतु राजा परांजपे यांनी अभिनयातील कृत्रिमपण घालवून नैसर्गिक अभिनय कसा असतो हे आपल्या कसदार अभिनयातून दाखवून दिले. हातात कुठलेही तंत्र नसताना त्यांनी जे काम केले त्याला तोड नाही. आजचा जो मराठी सिनेमा आपण बघतो त्याचा पाया राजाभाऊंनी घातला असे त्या म्हणाल्या.

सचिन खेडेकर म्हाणाले, चित्रपट बनविताना सर्व पिढीतल्या लोकांना राजा परांजपे बरोबर घेऊन जात. चित्रपट बनवताना त्यांचा दूरदर्शी दृष्टीकोन असायचा लक्षात राहणारे काम आजच्या पिढीकडूनही होत आहे. आजचा मराठी प्रेक्षक हा मराठी, इंग्रजी, हिंदी चित्रपट बघतो. मात्र, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मराठी चित्रपटांनाच पराधान्य देतो. आजच्या चित्रपटातील कलात्मक दृष्टी जरी बदलली असली तरी सामाजिक जाणीव टिकवून प्रबोधनाबरोबरच मनोरंजन व्हावे हा प्रयत्न असतो.
अभिजीत पानसे म्हणाले, हा सन्मान मिळण्यासारखे मी फार मोठे काही केले असे मला वाटत नाही. राजा परांजपे यांच्यासारख्या थोर माणसाच्या नावाचा पुरस्कार मला ‘रेगे’ सारख्या एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो.

स्मिता तांबे व स्वप्नील बांदोडकर यांनी राजा परांजपे पुरस्कार मिळाला याचा खूप अनाद झाला असल्याच्या आणि जबाबदारी वाढल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

मराठी प्रेक्षकांनी अभिरुची जपून ठेवली म्हणूनच वेगळे काम करण्याची हिम्मत होते —सचिन खेडेकर

मराठी प्रेक्षकांनी आपली अभिरुची आजपर्यंत जपून ठेवली आहे त्यामुळेच माझ्यासारख्या कलाकाराला वेगळे काम करण्याची हिम्मत होते असे मत सचिन खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. चारही राजा परांजपे पुरस्कारार्थींची प्रवीण तरडे यांनी मुलाखत घेतली त्यावेळी खेडेकर यांनी हे मत व्यक्त केले.

‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिका शेवटपर्यंत कशी पेलली याबाबत बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, यामध्ये गिरीश जोशी आणि महेश मांजरेकरांचा मोठा वाटा आहे. नट म्हणून नटाला बुद्धी असावी ती दिग्दर्शकाचा आदेश समजून घेण्याची. बऱ्याचदा नट स्वतंत्र, स्वयंभू असल्याचा विचार करतो तसे मी केले नाही म्हणून तो अभिनय चांगला झाला.

मात्र, हा सांघिक प्रकार आहे. सर्वांचा परिणाम म्हणून माझे काम चांगले झाले.
गाण्याबरोबरच अभिनय का केला नाही या प्रश्नाला उत्तर देताना स्वप्नील बांदोडकर म्हणाला, ‘प्ले बॅक’ गाताना मी अभिनय करतच असतो फक्त तो पडद्यामागचा असतो. नृत्य आणि अभिनय यापैकी काय आवडते याबाबत बोलताना स्मिता तांबे म्हणाल्या, नाच हे माझी आवड आहे आणि अभिनय ही ‘पॅशन, आहे. मला काम आवडते ते मला करायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिनेत्री सर्वारी जमेनीस व त्यांच्या सहकलाकारांनी कथ्थक नृत्याद्वारे विविध बंदिशी सादर केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

: 🔴 १४ जूनचा प्रयत्न फसला... १८ जूनला झाला घात?⚠️...

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे |...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना...