महाराष्ट्रात टप्प्या-टप्प्याने हटवला जाऊ शकतो लॉकडाउन-आरोग्य मंत्री राजेश टोपे

Date:

मुंबई. सर्वत्र लॉकडाउनमुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यात आरोग्य मंत्र्यांनी 21 दिवसांचा हा लॉकडाउन लवकरच हटवला जाणार असे संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन लवकरच हटवला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकार हा लॉकडाउन टप्प्या-टप्प्याने हटवण्याचा विचार करत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळी बोलताना राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केले नाही तर 14 एप्रिल रोजी सरकार लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेणार नाही उलट तो वाढवावा लागू शकतो असा इशारा त्यांनी दिला होता.

वेबकास्टवरून थेट संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, टप्प्यांमध्ये लॉकडाउन हटवण्यावर सध्या सरकार विचार करत आहे. तरीही प्रत्येक झोनमध्ये कठोर शिस्तीचे पालन करावेच लागेल. तोपर्यंत नागरिकांनी घरातच राहून सकस आहार घ्यावा आणि घरातच व्यायाम करावा असे आवाहन टोपे यांनी केले. ते पुढे म्हणाले, “अनेक आयुर्वेद तज्ज्ञ कोरोनावर उपचार पद्धत सांगू इच्छित आहेत. त्यांना जी काही माहिती द्यायची आहे, त्यांनी ती आयुष पोर्टलवर टाकावी.”

साहजिकच लॉकडाउन मागे घेत असताना तो पूर्णपणे उठवता येणार नाही. सगळ्याच लोकांनी एकदाच घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. त्यामुळे, लॉकडाउन शिथील करतानाचा निर्णय टप्प्यानेच लागू करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. देशात कोरोना व्हायरसचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सर्वात वाइट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 530 पेक्षा अधिक झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...