पुणे, १० सप्टेंबर- लोकमान्य टिळक यांनी देशसेवेसाठी केलेले महान कार्य लक्षात घेवून विधानसभा निवडणुकीत त्यांचे वारस असलेल्या रोहित टिळक यांना खरे तर बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र दुर्देवाने तसे झाले नाही म्हणून आता कसब्यातील जनतेनेचे टिळक यांना निवडून देवून लोकमान्य टिळक यांच्या देशसेवेची पावती द्यावी असे आवाहन अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी शुक्रवारी येथे केले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) उमेदवार डॉ. रोहित टिळक यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी प्रभाग क्रमांक ४८ मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत भाग घेतल्यानंतर नाडे गल्लीत मतदारांसमोर बोलताना गुलाब नबी आझाद पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या वारसदारालाच मतदार निवडून देतील आणि लोकमान्य टिळक यांच्यावरील आपली श्रद्धा सिद्ध करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने पुणे शहराची इतकी सर्वांगीण प्रगती केली आहे की, देशातील प्रत्येक व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर पुण्यात येउन रहावेसे वाटते असे सांगून आझाद म्हणाले, पुणेकर जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ केली आहे तशीच या विधानसभा निवडणुकीतही करावी.
काँग्रेस उमेदवार रोहित टिळक यांनी यावेळी बोलताना, विविध विकास कामापोटी जागा दिल्यामुळे अथवा रस्तारुंदीकरणामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना बेघर होऊ न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक ४८ मध्ये काढण्यात आलेल्या रोहित टिळक यांच्या या पदयात्रेला नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टिळक यांच्या या पदयात्रेत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, मिलिंद काची, माजी नगरसेवक गोपालदादा तिवारी, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, बबनराव दरेकर, इरफान सय्यद, शशिकांत गायकवाड, जयदीप परदेशी तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती.
टिळक यांच्या पदयात्रेने कसबा मतदारसंघ ढवळून निघाला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २३ आणि ३९ मध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. सूर्या हॉस्पिटल पासून सुरु झालेली ही पदयात्रा पवळे चौक, शेख सल्लाह दर्गा, कुंभारवाडा चौक, भोई आळी, साततोटी चौक, मनपा कॉलनी, दारूवाला पूल, ताराचंद हॉस्पिटल, डुल्या मारुती चौक आदी मार्गाने जाऊन दुधभट्टी भागात विसर्जित झाली. या पदयात्रेने कसबा मतदारसंघ ढवळून निघाला. ठिकठिकाणी सुवासिनींनी रोहित टिळक यांना ओवाळून त्यांचे हृद्य स्वागत केले. या पदयात्रेत श्री टिळक यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, नगरसेवक चंदू कदम, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, साजिद तांबोळी, माजी नगरसेविका विद्याताई भोकरे, स्वाती कथलकर , संदीप अटपाळकर, मयुर भोकरे, नरेश नलावडे, संजय आगरकर, छोटू वडके, संदीप लचके, साहिल तांबोळी , करण गायकवाड, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.