स्वर्गीय रमेश वांजळे यांनी खेडशिवापूर नाक्यावर टोल विरोधात आंदोलन केले होते , हा टोल नाका आता बंद करण्याची गरज आहे असा कल नागरिकांचा असतानाच मनसे उमेदवार राजाभावू लायगुडे यांनी म्हटले आहे कि राज्यभरात अनेक वर्षांपासून टोलवसुलीच्या बोजाखाली सर्वसामान्य जनता दबली जात आहे. मनसेच्या वतीने अनेकवेळा टोलमुक्तीसंदर्भात आंदोलने, निदर्शने करण्यात आली आहेत. मनसेच्या आंदोलनाला काही ठिकाणी यश येऊन अनेक टोलनाके बंदही करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील जनतेची टोलवसुलीपासून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ लायगुडे यांनी दिले आहे
प्रचारासाठी काहीच दिवस हाती असताना मनसेचे खडकवासल्याचे उमेदवार नगरसेवक राजाभाऊ लायगुड़े यांनी आज ६ ऑक्टोबरला
न-हे, सुखसागरनगर, स्टेट बँक काँलनी, बावधन, भुसारी काँलनी या भागात प्रचार केला. पदयात्रा काढून त्यांनी या भागातून शेकडोे मन सैनिकांनाच्या सोबत शक्ती प्रदर्शन केले.त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राजाभाऊ म्हणाले, “मी नगरसेवक म्हणून जनतेच्या कामांना व त्यांच्या स्मस्यां सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे आणि आज देखिल घेतोय. काही दिवसापूर्वी मा. राज ठाकरेनीं महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट जनतेसमोर सादर केली आहे. आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा आहे. मुख्यता खडकवासला मतदार संघाचा विकासाचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. आपन एखदा मला संधी द्या. जनतेचीच कामे करायची आहेत, असे भावनिक आवहान त्यांनी केले.
राजाभाऊंनी भर उन्हात जनतेशी संवाद सादत तेथिल रहिवाशी, व्यापारी व सामन्य जनतेशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ते म्हणाले, मी आपल्या या परिसरातील सर्व समस्या सोडवेन. या परिसरातील पाणी, कचरा, अंतर्गत रस्ते अशा अनेक प्रश्नांवर मी कामे करेन,असे त्यांनी आश्वासन दिले.
या वेळी प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता. गणेश नायकवडी, विशाल गायकवाड, जगदिश वाल्हेकर, संजय पायगुडे, विकास बा्पु दांगट, सुर्यकांत कोडीतकर, चंदन कड, रमेश करंजावणे, प्रजोत लगड , प्रविण दांगट, भरत लायगुडे, रुपेश घुले, राहुल वाळूंजकर, विरेंद्र सैंदाणे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.