अरविंद केजरीवाल बिनखात्याचे मुख्यमंत्री – जनतेत राहून मंत्र्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणार
नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल हे बिनखात्याचे मुख्यमंत्री बनले आहेत, अशाप्रकारचा बिन्खात्याचा मुख्यमंत्री असणे हि देशाच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना मानली जाणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल देशातील असे पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांच्याकडे एकाही खात्याची जबाबदारी नाही . शपथविधी नंतर एकही खाते न स्वीकारण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीच्या जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे केजरीवाल म्हणाले आहेत.आणि अन्य मंत्र्यांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून उत्तरदायित्व ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकही खाते नसल्याचा फायदा जनतेमध्ये राहून जनतेला समजून घेणे हा त्यांचा उद्देश आहे. थेट एकाही मंत्रालयाची जबाबदारी राहणार नसल्याने त्यांनी जनतेत राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बराच वेळ मिळणार आहे. त्यामुळे सरकार वेगाने काम करत असल्याचे वातावरण तयार होण्यासही मदत मिळणार आहे. यामुळे सरकारची प्रतिमा जनतेमध्ये सुधारेल त्याचबरोबर, जनतेचे मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांची प्रतिमाही तयार होईल.असे आप कडून सांगण्यात येते आहे दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक खाती केजरीवाल यांचे नीकटवर्तीय आणि विश्वासू मनीष सिसोदिया यांच्याकडे आहेत. सिसोदिया यांच्याकडे 49 दिवसांच्या सरकारमध्ये 2 खाती होत पण यावेळी त्यांना महत्त्वाच्या 5 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकारातून केजरीवाल सिसोदियांना दिल्लीतील नेतृत्त्वासाठी तयार करत आहेत. आम आदमी पार्टीमध्ये इतरही मोठे नेते असल्याचा संदेश त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.