पुणे :‘दिव्य ज्योति परिवार’ आयोजित तसेच दिव्य ज्योति जागृति संस्थानतर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ची सांगता आज मंगळवारी झाली. ही सांगता प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज (संस्थापक व संचालक दिव्य ज्योति जागृती संस्थान) यांच्या शिष्या भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी यज्ञ, पूर्णाहुति, भागवत पूजन तसेच आरतीने ने झाली, अशी माहिती चिदानंद स्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली.
हा कार्यक्रम रोज सायंकाळी 5 ते 9 या वेळेत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे संपन्न झाला.
दि. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होता. यामध्ये आध्यात्म, विज्ञान, भक्तिरस आणि सुमधूर संगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले होते. यावेळी अनिल शिरोळे (खासदार), शिवाजीराव आढळराव-पाटील (खासदार), मुक्ता टिळक (महापौर), राहुल जाधव (पिंपरी-चिंचवड महापौर), योगेश गोगावले (भाजप शहराध्यक्ष), माधुरी मिसाळ (भाजप आमदार), रवींद्र धंगेकर (नगरसेवक), लक्ष्मण जगताप (आमदार, पिंपरी-चिंचवड), दिलीप मोहिते-पाटील (आमदार, खेड तालुका) उपस्थितीत होते.
या सप्ताहामध्ये भागवत माहात्म्य सांगून सद्य चालू परिस्थितीबाबत लोकांचे प्रबोधन करून समाज जागृतीचे संदेश प.पू. सर्वश्री आषुतोश महाराज यांच्या शिष्या भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांनी दिले.
कलश यात्रा, भागवत महात्म्य (परीक्षित को शाप), कपील देवहूति संवाद, वृत्रासूर कथा, प्रल्हाद प्रसंग आणि होळी उत्सव, बलिवामन कथा, कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण बाल लीला, गोवर्धन उत्सव, मथुरा गमन व कंस वध, रुक्मिणी विवाह, भागवत पूजन, पुर्णाहुती यज्ञ व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या सप्ताहात संपन्न झाले.
प.पू. सर्वश्री आशुतोष महाराजींच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीला मानव समाजाला जीवन जगण्याची कला शिकवितात. आज मनुष्य जीवन अनेक समस्यांनी व्यापलेले आहे. उदा. भ्रष्टाचार, नशाखोरी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार, चरित्रहिनता, गो-हत्या, तसेच पर्यावरणाचा असमतोल या सारख्या अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांमध्ये आहे. आज 21 व्या शतकातही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यलीला मानव समाजाला अध्यात्म ज्ञानाद्वारे (ब्रह्मज्ञानाद्वारे) शाश्वत भक्ती मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ठरत आहे. आध्यात्मिक रहस्यांनी ओतप्रोत असलेल्या लीलांना श्रीमद्भागवत महापुराणाच्या आधारे समाजा समक्ष प्रकट करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रमुख उद्देशासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता असे चिदानंद स्वामी यांनी सांगितले.