पुणे- खंडणीखोर नगरसेवकाच्या टोळीचा का लागेना तपास ? गोळीबार धनकवडीत झाला कि नाही ? सीएसआर घोटाळ्याबद्दल महापालिका आयुक्त कुणाल कुमार स्पष्टीकरण देणार कि नाही? अशा प्रश्नांनी सध्या पुण्याचे राजकारण ढवळून निघाले आहे .
‘सकाळ’ सारख्या पुण्यातील जुन्या आणि विश्वासार्ह अशा नामवंत दैनिकातून खंडणीखोर नगरसेवकाच्या टोळीने बिबवेवाडी परिसरात थैमान घातल्याचे वृत्त पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाने प्राधान्याने प्रसिध्द झाले . पण ना पोलिसांच्या, ना महापालिका प्रशासनाच्या स्तरावरून कोणीही याबाबत वाच्यता केली नाही … का केली नाही ? प्रकरण खरे नाही काय ? खरे असेल तर वाच्यता का नाही ? कारवाई का नाही ? सर्वत्र चिडीचूप कसे ? असा प्रश्न असतानाच धनकवडी मध्ये गोळीबाराची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये झळकली …इथे हि पुढे काय झाले ? हा प्रश्न आहेच . अर्थात कोणीही आपली विशेष बातमी काढली तर तिच्या पाठीशी राहण्याच्या जुन्या परंपरेतील पत्रकारांना ही या प्रश्नाने पछाडले आहे . तर महापालिका मुख्य सभेत अविनाश बागवे यांनी सिएसआर घोटाळाप्रकरणी प्रश्न उपस्थित करून महापालिका आयुक्तांपुढे वादळ उभे केले आहे … यावर आयुक्त काही खुलासा करणार आहे कि नाही ? मुख्यसभेत कोणकोणते प्रश्न उपस्थित होणार ? यावर हि आता खल होणार आहे . अशातच धनकवडी तील सुयोग हॉस्पिटल जवळील गजांत हॉटेल वर झालेली अतिक्रमण कारवाई का रोखण्यात आली ? कोणी हि कारवाई पूर्ण करू दिली नाही ? असे ही अनंत प्रश्न आता निर्माण होत आहेत ..
सोबत आपल्या न्यूज पोर्टलवर ..या बातम्यांची कात्रणे वाचा …