किती अधिकारी बदलणार ? त्यापेक्षा आत्मपरीक्षण करा – वसंत मोरे
पुणे- महापालिकेतील किती अधिकारी बदलणार त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत आजच्या मुख्य सभेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत , असे सांगून अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना बदलण्या ऐवजी त्यांच्या कडून चांगली कामे कशी करून घेता येईल हे बघितले पाहिजे असे मत मनसे चे गटनेते वसंत मोरे यांनी आज मुख्य सभेत सांगितले .
महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर झाले आणि सभागृहात हि त्याचे पडसाद उमटले . कामगार संघटनांनी अतिरिक्त आयुक्त उगले आणि मुळे नामक शासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणी रोष व्यक्त केला आहे .आणि सत्ताधारी भाजपने देखील या अधिकाऱ्यांना आता माघारी पाठविण्याची मोहीम हातही घेतली आहे या पार्श्वभूमीवर ते बोलत होते . पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले ….