पुन्हा ठरू नये कोणी पूरग्रस्त -राष्ट्रवादी चा नवा प्रस्ताव (व्हिडीओ)
पुणे-कोणत्याही स्वरूपाचे आढेवेढे न घेता ज्या ज्या लोकांचे संसार गेल्या काही दिवसात पावसाच्या पाण्याने ,नदी ,नाल्याच्या पुराने उघड्यावर पडलेत त्यांना 25 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य करत ,या पुढे कोणी पूरग्रस्त ठरू नये यासाठी योजना राबविण्याची मागणी आज शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि माजी आमदार बाप्पुसाहेब पठारे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना भेटून केली .
यासंदर्भात तुपे पाटील म्हणाले कि , ५ आणि ६ हजार रुपये अशी मदत शासन आणि महापालिका यांच्या कडून दिली जाते पण ती सद्यस्थितीत खूप तुटपुंजी आहे .आणि शिवाय यात हि पात्र -अपात्र असा घोळ घालून जेरीस आणले जाते . कित्येकांचे संसार उध्वस्त झालेत अशा सर्वांना 25 हजाराची मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे . शिवाय
आता यापुढे कोणत्याही वर्षी ५० हजार क्युसेस पाणी नदीला सोडले तरी कोणी पूरग्रस्त राहणार नाही ,कोणाचे संसार उध्वस्त होणार नाहीत , या साठी पूर रेषा ठरवून त्या त्या ठिकाणी नागरिकांसाठी मोकळ्या जागा करून ,संबधित पूरग्रस्तांना विश्रांतवाडी येथील नॉन प्लान स्कीम मध्ये घरे द्यावीत ..तसेच अन्य ठिकाणच्या पूरग्रस्तांना त्या त्या ठिकानाहून जवळची घरे देता येतील या साठी झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन योजनेतील वसाहतींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहेत . अशा वसाहतीत असंख्य जादा घरे बांधली गेलीत आणि ती मोकळी आहेत ,किंवा त्याचा वापर बिल्डर कडूनच केला जातोय अशी घरे पूरग्रस्तांना देता येतील . आणि पूर रेषेत पुन्हा अतिक्रमण होवू नये ,राडा रोडा कोणी टाकू नये यासाठी पूर रेषेतील जागा ताब्यात घेवून तिथे सुशोभिकरण,बागा ,अनुषंगिक प्रकल्प राबवून त्या जागा मोकळ्या ठेवाव्यात जेणे करून पावसाळा व्यतरिक्त त्यांचा नागरिकांसाठी योग्य उपयोग होवू शकेल .