पुणे-कापड दुकानांस लागलेल्या आगीत जळून मारणारे कामगार ,सुरक्षे अभावी मारणारे बांधकाम मजूर अशा विविध घटनांमधून कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्षच झाले आहे हे स्पष्ट होत आहे असा हल्ला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी चढविला .
कामगारांची साधी नोंद नाही,कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे पुन्हा समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.
रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळून झालेला अपघात आणि त्यामुळे झालेले १५ मृत्यू हे प्रशासनाचं अपयश आहे असं मला वाटतं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. आपण समाज म्हणून असंवेदनशील होत चाललो आहोत का? बिहारमध्ये जी घटना झाली त्यात १५० मुलं गेली. त्यावर बातम्या झाल्या पुढे काय झालं? त्याचा जाब कुणीही विचारत नाही. आज १५ लोक या अपघातात दगावली आहेत त्यावरही चर्चा होईल पण जाब कोणीही विचारत नाही.
मी जिल्हाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली. येत्या चोवीस तासात इमारतीचं आणि इतर ठिकाणचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे. साडेचार ते पाच लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही काही माणसाच्या जिवाची किंमत नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच अशा घटना घडू नयेत म्हणून काय खबरादरी घेतली पाहिजे? काय उपाय केले पाहिजेत त्याची काळजी प्रशासनाने आणि सरकारने घ्यायची आहे असंही त्या म्हटल्या आहे.