अर्थिक नाहक खर्च न करता सत्यशोधक पद्धतीने विवाह करावे -रघुनाथ ढोक
पुणे- सप्तपदी माळी वधु वर सुचक केंद्र आणि अतुल व यश चाकणकर आयोजित वधु वर मेळावा श्री धारेश्वर बँक्वेट येथे संपन्न झाला.
याप्रसंगी 100 वधु वरांनी सहभाग घेतला.याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ मंजिरी धाडगे यांचा व महाराष्ट्र शासनाच्या फुले साहित्य चरित्र ,साधने प्रकाशन समिती वर रघुनाथ ढोक यांची निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अक्रृरशेठ कुदळे,विकास दांगट,जेष्ठ समाजसेवक दत्तात्रय चाकणकर,रामराज्य बँकेचे बाळासाहेब रायकर ,रमेश खेडेकर ,सतिश चाकणकर, समीर धाडगे उपस्थित होते.
यावेळी मंजिरी धाडगे म्हणाले की वरांची संख्या खूप वाढली असून वधु ची संख्या सर्व समाजामध्ये कमी होत चालली आहे .मुलामुलींनी मोठया अपेक्षा ,शिक्षण या वर जास्त विचार न करता तडजोड भूमिका घ्यावी तर ढोक यांनी काळाची गरज म्हणून मेळावा सहभाग घेऊन नाहक खर्च न करता वेळ ,श्रमाची बचत करून सत्यशोधक पद्धतीने व सामुदायिक विवाह केले पाहिजे असे आवाहन केले.
मेळाव्याची सुरवात सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले यांचे अखंड गीत गाऊन केले तर मेळावा यशस्वी करण्यासाठी सौ व श्री.किशोर भास्कर,दत्ता बनकर,हरिभाऊ दुधाळ ,अतुल चाकणकर ,आकाश ढोक ,नीता पाटील,श्रीमती कांडपीळे ,सुत्रसंचालन बारामती च्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती आशा नवले यांनी केले.