पुणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोहन जोशी यांच्यासारख्या निष्ठावान व सामान्य
कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. ही
लढाई जिंकण्यासाठी मतदारांनी मोहन जोशींना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन
नगरसेवक आबा बागुल यांनी केले.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी
यांच्या प्रचारार्थ आयोजित पर्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत
होते.
मोहन जोशी यांच्या पदयात्रेला आज सकाळी ९.३० वाजता मॅरेथॉन भवन येथून प्रारंभ झाला. ‘पुणे की
खुशी, मोहन जोशी’ येणार येणार पंजा येणार, चौकीदार चोर है..अशा घोषणांचा निनाद, फटाक्यांची
आतषबाजी, देशभक्तीपर गीते तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे झेंडे अशा वातावरणात सुरू झालेली
ही पदयात्रा पुढे इंदिरा मिनीमार्केट, पर्वती दर्शन, मनमाना म्हसोबा चौक, पंचशील चौक, शिवदर्शन, राजीव
गांधी ई लर्निंग स्कूल, शिवदर्शन लक्ष्मीमाता मंदिर,मुक्तांगण शाळा, तावरे कॉलनी, अण्णाभाऊ साठे
नगर, ट्रेझर पार्क, दाते बसस्टॉप, सहकारनगर पोलीस चौक, नवजीवन चौक, पद्मावती वसाहत, वीरकर
सभागृह, चव्हाण नगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत मार्गे जाऊन छत्रपती मंगल कार्यालय येथे
तिचा समारोप झाला.
पदयात्रेच्या या मार्गावर ठिकठिकाणी महिला मोहन जोशी यांना कुंकूम तिलक लावून औक्षण करत
होत्या. अनेक चौकामध्ये फटाके वाजवून आणि मोहन जोशी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत
केले जात होते. शिवदर्शन येथे त्यांच्यावर गुलाब फुलांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. पदयात्रेच्या
मार्गावर ठिकठिकाणी महिला व कार्यकर्ते पदयात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी होत होते. तसेच पदयात्रेत
सहभागी कार्यकर्ते व नागरिकांना नागरिक उत्स्फुर्तपणे द्राक्षे., सफरचंदे, थंड पाणी व टाक देत होते .
मोहन जीशींशी हस्तांदोलन करण्यासाठी देखील झुंबड उडत होती.
पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले, देशातले सध्याचे सामाजिक वातावरण
बिघडले आहे. त्याला मोदी सरकारची धोरणे जबाबदार आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील २० टक्के गरीब जनतेला दारिद्र्य रेषेच्या
वर आणण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘न्याय’सारख्या योजनेचा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे. या
योजनेमुळे देशातील गरिबी संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पदयात्रेत अभय छाजेड, संजय बालगुडे, अश्विनी कदम, नितीन कदम, शशिकांत तापकीर, विनायक
हनमघर, अमित बागुल,हेमंत बागुल, राकेश ताकवले, वैजनाथ वाघमारे, ईश्वर घायाळ, दत्ता कांबळे, प्रमोद
गालिंदे, राणी खत्री, सतीश पवार, प्रकाश अरणे, सोनाली मारणे दीपक ओहाळ, साजीद कुरेशी, इम्तिहाज
तांबोळी, सागर आरोळे, शाम काळे, मामा परदेशी, स्वप्नील नाईक, ताई कसबे, संतोष गोळे, हरीश खर्डेकर,हरीश यादव, महेंद्र गावडे, महानंदा साखरे, रुपेश मारणे, फारूक शेख यांसह शेकडो पुरुष व महिला
कार्यकर्ते सहभागी झाले होते.