पुणे-पुण्याच्या पोलीस कमिशनरांच्या मानगुटीवर बसलेले हेल्मेटसक्ती चे भूत उतरविण्यासाठी पालकमंत्री बापट यांनी काहीही न करण्याची घेतलेली भूमिका भाजपला आगामी निवडणुकीत मातीत घालणारी असून , जर कमिशनरांना खरोखरच लोकांच्या जिवाची काळजी असेल तर अगोदर त्यांनी आपल्या हद्दीत सुरु असलेले बेकायदा दारू आणी मटक्याचे अड्डे पूर्णतः बंद करावेत .दारू आणि मटका यामुळे लाखो संसारे धुळीस मिळत असून ,त्यांना ठाऊक च नसेल आपल्या हद्दीत असे बेकायदा धंदे सुरु आहेत तर त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील रायटर ची नार्को टेस्ट करावी असे आवाहन हि करण्यात येते आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या अंगात हेल्मेट सक्ती राबविण्याचे भूत संचारले आहे . आणि त्या कारवाई अंतर्गत लाखोची दंड वसुली त्यांनी सुरु केली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारू -आणि मटका धंदे सुरु असतील त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित करण्याचा फर्मान मात्र ते सोयीस्करपणे विसरलेले असावेत .किंवा पुण्यात कुठेच अशा पद्धतीचे दारू आणि मटका अड्डे नाहीतच असा त्यांचा ‘अत्यंत मधुर आणि गोड ‘ समज असावा .पण तमाम पुणेकरांना याची जाणीव आहे त्याची जाणीव मात्र या आयुक्तांना नाही हे विशेष . आयुक्त साहेब आपण पुण्यात आल्या पासून असे किती बेकायदा दारू आणी मटका धंदे बंद केलेत ?आणि ते ज्यांच्या हद्दीत चालू होते त्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांवर कुठे आणि कशी कारवाई केली ? याची उत्तरे तुम्ही देऊ शकलेला नाहीत .किंवा बेकायदा दारू आणि मटका अड्ड्यांनी संसारे उध्वस्त होतात यावर त्यांचा विश्वास नसावा . असे असले तरी असे धंदे सुरु ठेवावेत असा कुठला न्यायालयीन आदेश आहे काय ? या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावे .लोकंच्या जिवाची काळजी करणारे आयुक्त पुण्याला लाभणे हे खरे तर पुणेकरांचे नशीबच म्हणावे लागेल.पण मग गेली असंख्य वर्षे हेल्मेट सक्ती करण्या ऐवजी हेल्मेट ऐच्छिक ठेवावे .. अशी मागणी करत आयुष्यभर लढा देणारे सुर्यकांत पाठक ,संदीप खर्डेकर ,अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला आणि आम्ही वेडे आहोत काय ?याचे उत्तर द्यावे . आणि जर तुम्हाला हेल्मेट सक्ती राबवू नये यासाठी वारंवार वर्षानुवर्षे चळवळ करणारे वेडे वाटत असतील तर त्यांना एकदाचे ‘हे वेडेअसल्याचे ‘आपल्या सहीचे प्रमाणपत्र देवून टाकावे .
न्यायालयाचा निर्णय आजचा नाही , यापूर्वी अनेक आयुक्तांनी अशी सक्ती राबविण्याचा अट्टाहास धरला होता . त्या अट्टाहासाचे काय झाले ? ते या ‘ वेड्यांपुढे’ का नमले .. नमले तर त्या त्या आयुक्तांना देखील .. वेड्यांपुढे कमजोर ठरलेले आयुक्त म्हणून आपल्या सहीचे प्रमाणपत्र देवून टाका .
वाहतूक समस्येने त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या मानगुटीवर हेल्मेटचे ओझे टाकण्यास तुम्ही खूपच आतुर झाला आहात . हि खरोखरच तुमची तळमळ आहे कि, आणखी कोणी तुमचा बोलविता धनी असेल तर तसे सांगून टाका.. म्हणजे तुमच्या मानगुटीवर वरचे तरी हे ओझे उतरेल .तेव्हा अट्टाहास सोडा.. भाजपचे सरकार घालवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जनतेला त्रास देण्याचे कारण नाही . जनता समर्थ आहे .. कोणाचे सरकार घालवायचे आणि कोणाचे आणायचे याचा निर्णय जनता घेईल . तुम्ही कशाला या त्रांगड्यात पडता ? त्या पेक्षा दिवसेंदिवस वाढलेल्या चोऱ्या, गुन्हे , बेकायदा दारू धंदे , मटका अड्डे या कडे लक्ष द्या ..तिथे कायदा राबवा ..अशा प्रकारातून कोण किती हप्ते वसूल करताहेत हे पाहून त्यांच्यावर कारवाई करा .
तुमच्या कार्यालया समोर एका महिलेने पेटवून घेण्याची वेळ का आली ? त्यावर मंथन करा . दारू धंद्याविरोधात तक्रार केली म्हणून दारू धंद्यावाल्यांनी तिचा छळ सुरु केला आणि तिने तुमच्या कार्यालया समोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला .. या ची थोडी तरी बाळगा .. तुमच्या पोलिसांचे कोणाला सहाय्य आहे हे यावरूनही तुमच्या लक्षात येत नाही काय ?जनतेची खरी काळजी घ्या, तसा आता नव्या वर्षात तरी संकल्प करा साहेब ..आणि दर महिन्याला जनतेसमोर अहवाल ठेवा किती मटका अड्डे आणि बेकायदा दारू धंदे कायमचे बंद केले ,आणि त्ये ज्यांच्या हद्दीत सुरु होते त्या त्या पोलीस प्रमुखांवर काय काय कारवाई केली ते कळू द्यात .. म्हणजे मग पटेल कि खरोखर तुम्हाला जनतेची काळजी आहे म्हणून.. हेल्मेट सक्ती करून उगाच आपला जनतेच्या हिताचा कळवळा दाखवू नका , ये पब्लिक है ..सब जानती है …तेव्हा अट्टाहास सोडा .. भाजप सरकार चे काय करायचे ते जनतेवर सोडा …
..आम्ही कित्येक वर्षे जेव्हा जेव्हा सक्ती राबविण्याचे भूत अवतरले तेव्हा तेव्हा त्याला पळवून लावले आहे , आता तुमच्या मानगुटीवर बसलेले भूत हि पुन्हा पळवून लावण्याची जबाबदारी ‘त्याच त्याच ‘आमच्या सारख्यांना पार पाडावी लागणार आहे .तेव्हा पहा समजुतीने घ्या .. तुम्ही चांगले अधिकारी आहात ..चांगले म्हणूनच रहा .. जनता जनार्दनाची खरी काळजी वाहा … आज तर एवढेच पुरे