गीतरामायणकार ग. दि. माडगूळकरांचे स्मारक उभारणार-शहराची ‘योग सिटी’ म्हणून ओळख निर्माण करणार-
पुणे-
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे आणि आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांचे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक कोथरूडच्या महात्मा सोसायटीत लवकरच साकारेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. रामनवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदीरांना भेटी दिल्या. तुळशीबाग येथील राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्री. बापट बोलत होते.
यावेळी बोलताना बापट पुढे म्हणाले, ‘गदिमांनी आपल्या कार्याचे बहुतांश योगदान पुण्यात राहूनच दिले. ते केवळ पुण्याचेच नव्हे तर, उभ्या महाराष्ट्राचे थोर कवी होते. हे वर्ष गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात स्मारकाचे काम सुरू करून ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेले जाईल.’
पुणे शहराची ‘योग सिटी’ म्हणून ओळख निर्माण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक मान्यता मिळवून दिली. पुणे शहरात योगाचे प्रशिक्षण देणार्या प्रथितयश संस्था आहेत. योगावरील संशोधक, प्रशिक्षक, शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी योग साधना करणार्या नागरिकांची सं‘या मोठी आहे. या सर्वांना एका शृंखलेत गुंङ्गून योगाच्या प्रचार व प्रसारासाठी आवश्यक असणार्या सुविधा देऊन पुणे शहराची ओळख जगाच्या नकाशावर ‘योग सिटी’ अशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. पतंजली योग केंद्राने दिलेला पाठिंबा आपण विनम‘पणे स्वीकारत असून, पुणेकरांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही वर्तन माझ्या हातून घडणार नाही.
रामदेवबाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला पाठींबा दिला असून आम्ही गिरीश बापट यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे न्यासाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बापू पाडाळकर यांनी सांगितले.
भारत स्वाभिमान न्यासाने रामनवमी व रामदेवबाबांच्या संन्यास दीक्षा दिवसाचे औचित्य साधून शुभारंभ लॉन्स येथे आयोजित केलेल्या योग शिबिरात श्री. बापट बोलत होते. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे, महेश लडकत, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, संदीप खर्डेकर, न्यासाचे पश्चिम प्रांत प्रमुख भालचंद्र उर्ङ्ग बापू पाडाळकर, रामकुमारी राठी, गोविंदराव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.