पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी केलेल्या वनराईच्या वटवृक्षाच्या छायेत अनेक माणसेविसावली आहेत, अशा भावनाविद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केल्या.
मंगळवार दि. १४ ऑक्टोबर, रोजी वनराई कार्यालयाच्या इको हॉल सभागृहात डॉ. मोहन धारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी डॉ. मोहन धारियालिखीत ‘तेथेकर माझेजुळती’ या पुस्तकाचेप्रकाशन डॉ. शंकर अभ्यंकर झाले. डॉ. मोहनधारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनी हेपुस्तक प्रकाशित करून डॉ. मोहन धारिया यांचा ‘मरावेपरीकीर्तीरूपी उरावे’ हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न वनराईनेकेला. यावेळी अभ्यंकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचेकुलगुरूडॉ. दीपक टिळक होते. कॉंग्रेसचेजेष्ठ नेतेउल्हास पवार, आ. मोहन जोशी, उपमहापौर आबाबागुल, डॉ. शां. ब. मुजूमदार, डॉ. के. एच संचेती, डॉ. विनोद शहा, वनराईचेअध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहीदास मोरे, डॉ. विजय देव, ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, जितेंद्र गोस्वामी, प्रभाकर करंदीकर, विजय सावंत बहारी मलहोत्रा आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, डॉ. धारियांचे व्यक्तिमत्व राजस होते. त्यांचे व्यक्तिमत्वपाहिल्याबरोबर आदर करावा असेहोते. त्यांचेअंत:रंग पराकोटीचेसात्विक होते. राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेली माणसे आपल्या विशिष्ट विचारधारेच्या पलीकडे जातनाहीत; परंतुप्रत्येक विचारधारेमध्येकाहीतरी चांगलेअसतेअशी डॉ. धारिया यांची भावना होती. इतर विचारधारेतलेव आपल्या विचारधारेतलेचांगलेघेवून त्यातून समाजपयोगी कामेकरावीतअसा त्यांचा विचार होता. विश्लेषणात्मक चरित्र व चारित्र्य ते मांडायचे. त्यांचे चिंतन हेसर्वस्पर्शी व सर्वव्यापी असायचे, असेगौरोद्गार डॉ. अभ्यंकर यांनी काढले. त्यांच्यासारखी निस्पृह माणसेसमाजात फार कमी आहेत त्यामुळेनीतिमत्तेचा ह्रास होत चाललाआहेअशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजसत्तेचा मोह कुणाला सुटत नाही परंतुडॉ. धारियांनी तोसोडला. तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी व खेडी स्वायत्त करण्याचा ध्यास त्यांनीघेतला.
डॉ. दीपक टिळक म्हणाले, डॉ. धारीयांच्या समोर नतमस्तक व्हावे असे त्यांचेआयुष्य होते. पर्यावरणाच्या संदर्भातील त्यांचेविचार हेमूलगामी होते. आचार, विचार व उच्चार या तीनहीगोष्टी एकत्रित असणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. डॉ. धारियांच्यामध्ये या तीनही गोष्टीसारख्याच होत्या. राजकारण सोडल्यानंतर त्यांनी झपाटल्यासारखेस्वत:ला वनराईच्या कार्यातझोकून दिले. लोकसंग्रह हा लोकहिताचा आहेहेजाणून त्यांनी ज्ञानपूर्वक, लोकहितवादी कामेनिस्वार्थपणेकेली.उल्हास पवार म्हणाले, उपेक्षित, वंचित, दलित समाजाचे पुनरुत्थान हा डॉ. धारियांच्याजीवनाचा महत्वाचा भाग होता. राजकीय नितीमुल्येकशी जपावी याचा आदर्श त्यांनी घालून दिला. तर डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, सर्वांना एक आयुष्य व्यवस्थित जगलेतर त्यामध्येधन्यतावाटते. मात्र, डॉ. धारिया यांचा जीवनपट मांडताना ते एकाचवेळी राजकारणी, समाजकारणी वपर्यावरणीय धारिया असेजीवन एकाच जन्मात जगले. एकाआयुष्यात अशा तीन क्षेत्रात काम करणेफार कमी लोकांना जमते. त्यांची आयुष्याची कृतार्थताया तीन गोष्टीमध्येच आहेअसेही तेम्हणाले. यावेळी डॉ. विजय देव, डॉ. सतीश देसाई, जेष्ठपत्रकार एस. के. कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, जितेंद्र गोसावी, डॉ. शैलेश गुजर
यांनीही डॉ. धारियांच्या आठवनींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचेप्रास्ताविक श्रीराम गोमरकर यांनी, सूत्रसंचालन प्रकाश जगताप तर आभार किशोर धारिया यांनीमानले.