पाण्याचे संकट नैसर्गिक नाही तर भाजपाचे पाप – अरविंद शिंदे (व्हिडिओ)
पुणे- धरणे भरून वाहत असताना ,रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असताना ,गेली चार वर्षे सातत्याने पुरेसा जलसाठा असताना कसबा पेठ आणि पुण्याच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे निर्माण झालेले संकट हे नैसर्गिक नसून हे भाजपचे पाप आहे आणि ते महापौर आणि तत्कालीन कसब्याचे आमदार ,मंत्री यांच्या माथ्यावर आहे असा घणाघाती आरोप आज कसब्याचे कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केला .आज त्यांनी आपल्या प्रचारार्थ काढलेल्या बाईक रेली चा समारोप महात्मा फुले स्मारकाजवळ करताना केलेल्या भाषणातून केला .
महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना महापौर जबाबदार आहेत . आपण पुराव्यानिशी जाहीर पणे याबाबत खुलेआम प्रश्न विचारू त्यांनी उत्तरे देण्यास स्वतः किंवा आपला प्रतिनिधी येवून आमने सामने करावे असे आपले खुले आवाहन यावेळी त्यांनी दिले ..पहा ते नेमके काय म्हणाले ,ऐका त्यांच्याच शब्दात ….