पुणे- सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे भारताला उत्पादन क्षेत्रात अपेक्षित प्रगती करण्यात मर्यादा येत असल्याचे मत व्यवस्थापन तज्ज्ञ कर्नल अशोक सोमण यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मावती प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मावती बनहट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजित भारत उत्पादन क्षेत्रात हब होऊ शकतो का? या विषयावर सोमण बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, पद्मावती प्रतिष्ठानच्या कौमुदी बनहट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमण पुढे म्हणाले, ‘उत्पादन क्षेत्रात चीनने मोठी प्रगती केली आहे. एकपक्षीय सत्ता, भारताच्या चार पट क्षेत्रङ्गळ, सरकारकडे जमिनीची मालकी, कार्यक्षमता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दळणवळण व्यवस्था, मोठ्या प्रमाणात सबसिडी यामुळे चीनला हे यश शक्य झाले आहे. राजकीय इच्छाशक्ती, आधुनिक तंत्रज्ञान, दळणवळणाच्या सुविधा व कार्यकुशलता वाढविल्यास भारत उत्पादन क्षेत्राचे हब होऊ शकेल.’
सोमण पुढे म्हणाले, ‘कृषी, सेवा व उद्योग क्षेत्रात संतुलित विकास केल्यास अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकते.’ १९७२ पासून दरवर्षी पद्मावती व्या‘यानाचे आयोजन करण्यात येत आहे.