पुणे-भाजपकडून आतापर्यंत तरी गिरीश बापट यांची उमेदवारी निश्चितीची खात्री मिळते आहे आणि बापटांनी त्यांच्या परीने प्रचार हि सुरु केला आहे, पण बापटांना खरे आव्हान होते ते, सामान्यांत मिसळणाऱ्या संजय काकडे यांचे . पण काकडे वर्षा बंगल्यावर गेले आणि तिथून कॉग्रेसच्या गोटातून हुतुतू सुरु झाली असावी असे दिसते आहे. नाही तर एव्हाना काकडे यांचा पक्षप्रवेश होवून बापटांना त्यांनी तगडे आव्हान ही पुढे उभे केले असते .पण निष्ठा कि व्यवहार्यता यातून बाहेर पडलेल्या कॉंग्रेसपुढे संदिग्ध्तेचे वातावरण निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काकडे यांचे नाव कॉंग्रेसच्या गोटातून दूर होत चालल्याचे समजते आहे . तर दुसरीकडे प्रचारास कमी अवधी राहिल्याने ओरडा सुरु झाला आहे . अशा कैचीत कॉंग्रेसची मान अडकविण्यात भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सध्या तरी यश आले आहे.या पार्श्वभूमीवर आता अरविंद शिंदे कि मोहन जोशी या नावात लढत सुरु झाल्याचे दिसते आहे .
पुण्यातून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत होईल असे मानले जाते .भाजपची उमेदवारी बापटांसारख्या जुन्या, मातब्बर नेत्याला दिली गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उमेदवारी निश्चित होताच बापटांनी सर्वप्रथम बड्या बड्या लोकांसाठी गेट टुगेदर ठेवले .नगरसेवक हि त्यात होते .आता कॉंग्रेसचीच उमेदवारी लटकून पडली आहे. बापटांना शह देण्यासाठी मराठा उमेदवार ,तरुण उमेदवार ,महापालिकेचे सभागृह अभ्यासू पद्धतीने गाजवणारा उमेदवार म्हणून शिंदे यांचे नाव आघाडीवर असू शकते .तर ज्येष्ठ,निष्ठावंत म्हणून मोहन जोशी यांचे नाव घेतले जाते . अभय छाजेड देखील रेस मध्ये आहेतच .राष्ट्रवादीने प्रवीण गायकवाड यांचे नाव पुण्याच्या उमेदवारीसाठी पुढे केले असले तरी एव्हाना ते हि मागे पडले आहे. त्यामुळे आजमितीला तरी शिंदे कि जोशी यावर कॉंग्रेस ची गाडी अडून पडली असावी असे दिसते आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे स्वतः या रेस मध्ये नाहीत पण जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते देखील बापटांना शह देवू शकतात असे चित्र आहे…..
शंभर हून अधिक नगरसेवकांचे बळ बापटांच्या पाठीशी ? …पहा फोटो …
(राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत कधी काय होईल सांगता येत नाही , पक्षाची दोघा-दोघांना अधिकृत उमेदवारी ऐनवेळी दिल्याचे प्रकार हि यापूर्वी दिसून आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारी देत नाही तोपर्यंत राजकीय वर्तुळातील वातावरणाच्या या बातम्या वाचकांनी आपपल्या परीने विचारात घ्याव्यात.mymarathi.net)